- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, अर्थसंकल्प ; ” ख़ुशी कम, जादा गम,” शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या या अर्थसंकल्पामध्ये सरकारने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गासाठी दिलासा देणारा नाही. भारताची दिशा ठरवणारा दस्तऐवज म्हणून भाजपचे नेते गुणगान गात असले तरी हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्याचा खेळ असल्याचे जाणवते. या अर्थसंकल्पातून सरकार दुरगामी विकासाचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न असल्याचे जरी सांगत असले तरी तो तसा नाही. आर्थिक स्थैर्यासोबत मूलभूत गरजांवर भर…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ; भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) सरस ठरणार, राज्यातील १२ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका येत्या ७ फेब्रु. रोजी होत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्यात घेण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यामुळे पहिल्या टप्यातील निवडणुका या आठवड्यात होत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजी नगर, परभणी धाराशिव व लातूर या जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे ) या दोन प्रमुख पक्षानी अभूतपूर्व यश प्राप्त केले. त्यामुळे तमाम राजकीय पक्षांचे…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” महानगरपालिका निवडणुका ; राज्यात भाजपची चौफेर फटकेबाजी, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार सर्वाधिक महानगरपालिका जिंकून पहिला क्रमांक पटकावला.या निवडणुकीत ठाणे,वसई – विरार व कल्याण – डोंबवली वगळता इतर २६ महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी एकहाती झेंडा फडकावला आहे.तसेच,उर्वरित तीन महानगरपालिकेत दमदार एन्ट्री केल्यामुळे शिंदे यांची शिवसेना व बहुजन विकास आघाडीला भविष्यात धोका होऊ शकतो.उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपला काठावरचे बहुमत असले तरी सोबत असलेल्या शिंदे गटाचे नगरसेवकांना ते आपल्या जाळ्यात ओढतील, अशी शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. येथे त्यांना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नाही. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाला बहुमतासाठी केवळ…
दीपक मोहिते, नॅशनल डेस्क, अजितदादाच्या जाण्यानंतर राजकीय हालचालींना वेग,सुनेत्रा पवार आज सांयकाळी शपथविधी होणार, अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर महायुतीमधील सत्तास्पर्धेला चांगलाच वेग आला आहे.उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन खाती कोणाकडे सोपवण्यात येणार ? यावर खलबते सुरू झाली आहेत.उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देण्यात यावी,अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मागणी मान्य करतील,अशी शक्यता आहे.पण अर्थ व नियोजन खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ देणार नाहीत. कारण अर्थमंत्रीपद हे गृहमंत्रीपदा इतकेच महत्वाचे आहे. २०२४ मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्रीपद आपल्याला मिळावे,त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी त्यांची डाळ शिजू…
दीपक मोहिते, नॅशनल डेस्कसाठी, बॉटमलाईन, अजितदादा गटाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात आता उलथापालथी होण्याची शक्यता आहे.ही दुर्घटना घडण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.त्याच सुमारास महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजपचे पार्थ पवार यांचे जमिनीचे गैरव्यवहार उजागर होणे तर अजित दादा पवार यांनी भाजपवर पलटवार करत पुणे मनपात भाजपने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला.तेव्हापासून भाजप व अजितदादा पवार यांच्यातील संबंध ताणले गेले होते.तेव्हापासून अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली होती.अजित पवार व शरद पवार हे दोघे काका – पुतणे एकत्र आल्यास राज्यात आपल्या विरोधात प्रभावी पर्याय उपलब्ध…
दीपक मोहिते, ” संवेदना,” एका वादळाची अचानक झाली एक्झिट… काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला.त्यांच्या अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला.दादा इतक्या लवकर एक्झिट घेतील,असे कोणालाही वाटले नव्हते,पण काळाने घात केला.अशाप्रकारे एका वादळाचा शेवट झाला.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.धाडस,अभ्यासूवृत्ती, स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत व प्रशासकीय यंत्रणेवर पकड ठेवण्याचे कसब,या गुणामुळे त्यांनी अगदी लहान वयातच खूप काही साध्य केले होते.धाडसी वृत्तीमुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.पण आपल्याकडून चूक झाली,हे सांगण्याचे धाडस त्यांच्या अंगी होते.त्यांच्या या स्वभावामुळे ते यशाची एकेक पायरी यशस्वीपणे चढू शकले.निधीवाटपात ते अन्य पक्षाच्या आमदारावर अन्याय करतात,असा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा काळवंडत चालला आहे… गेल्या दोन दशकापासून महाराष्ट्र नासवण्याचे ऐतिहासिक काम, या राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी केले व आजही करतच आहेत. त्यामुळे एकेकाळी पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.भगवा की हिरवा, अशा वादामुळे आपण एकमेकांकडे आता संशयाने पाहायला लागलो आहोत, ही बाब राज्याच्या पिछेहाटीला कारणीभूत ठरली आहे.या सर्व गदारोळात माझ्या तिरंगाचा कोणीच कसा विचार करत नाहीत,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उभा ठाकला आहे. आज, आपण सारे एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचलो आहोत.भारतीय संविधानात हिरवा किंवा भगवा या दोन्ही शब्दाला स्थान नसताना मात्र ज्या लोकांनी राज्य नासवण्याचा विडा उचलला आहे, अशांना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेश नाईक यांचा बोलवता धनी कोण ? गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.एकाच मंत्रिमंडळात असलेल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यामध्ये असलेला बेबनाव दररोज समोर येऊ लागला आहे.वनमंत्री गणेश नाईक हे तर ताळतंत्र सोडत शिंदे यांना लक्ष्य करत आहेत.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या कुरापतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.मात्र,त्यांचे सहकारी ( संजय शिरसाट,प्रताप सरनाईक व शंभूराज देसाई ) मात्र गणेश नाईक यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.ही सारी मंडळी दर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.जनतेचे सामूहिक नेतृत्व करताना ही मंडळी संविधानाने आखून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाड हिंसाचार ; उच्च न्यायालयाने सरकारची लक्तरे वेशीला टांगली, रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या सत्तास्पर्धेत जे रणकंदन सुरु आहे,त्याला आवर घालण्याऐवजी सरकार व आपली पोलीस यंत्रणा खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या नगरपरिषद निवडणूकी दरम्यान महाड येथे शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) यांच्यामध्ये झालेल्या राड्यावरुन उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहखाते व भरत गोगावले यांना सुणावणी दरम्यान चांगलेच झापले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यावर टीप्पणी केली आहे.” राज्याचे मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत का ? ते आपल्याच युतीमधील…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना शिंदे पिता – पुत्राने घाम फोडला… उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय कोणाला फायदेशीर ठरला ? याविषयी चाचपणी केली असता उद्धव ठाकरे यांचे या निवडणुकीत फार मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ हा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाला ९ जागा कमी पडत आहेत.त्यामुळे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक गळाला लावले आहेत.दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणखी दोन नगरसेवक बेपत्ता झाले आहेत.त्यामुळे ५३ नगरसेवक असलेल्या शिंदे…
