Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी,भाग क्र.३, ” श्रीलंका,” फ्रंटलाईन, श्रीलंका ; देश अद्याप सावरू शकला नाही,चीनची संगत भोवली, बांगलादेशात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जे काही घडले तसेच दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत घडले होते.बांगला देशात जे काही घडले,त्याला अमेरिकेची फूस होती.तर श्रीलंकेतील घडामोडीमागे साम्यवादी चीन होता.या दोन्ही देशात जे काही घडले,त्यामध्ये एक साम्य होते,ते म्हणजे सत्तेत असलेले ” सरकार उलथवून टाकणे,” व दक्षिण आशियात पाय रोवणे.. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका या देशात निर्माण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो देश पार डबघाईला आला आहे.या देशावर कोसळलेले आर्थिक संकट,हे अत्यंत भयावह असून त्यातून सावरण्यासाठी त्याला पाच ते सहा अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे.अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आपला हात…

Read More

दीपक मोहिते, विधानसभा निवडणुकीचे पडघम, फ्रंटलाईन, लवकरच चार राज्याच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता, येत्या नोव्हें.महिन्यात महाराष्ट्रासह झारखंड,हरियाणा व जम्मू-काश्मीर या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे.या चारही राज्यातील मतदारयाद्या अद्यायावत करण्याचे काम येत्या २० ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. जम्मू व काश्मीर राज्यात २०१८ साली भाजप व पीडीपी युतीचे सरकार होते,भाजपने २०१८ साली युती तोडल्यामुळे सरकार गडगडले,तेव्हापासून या राज्यात राष्ट्पती राजवट आहे.हरियाणा राज्यात भाजप-जेजेपी युतीचे सरकार होते.येत्या ३ नोव्हें.२०२४ रोजी विधानसभेची मुदत संपत आहे.येथे गेल्या निवडणुकीत भाजप व जेजेपी युतीला अनुक्रमे ४१ व १० जागा मिळाल्या होत्या.भाजपने अन्य सात अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आरक्षणप्रश्नी महायुतीच्या नेत्यांची अवस्था,” इकडे आड,तिकडे विहीर,” राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मराठा व ओबीसी आरक्षणप्रश्नी अडचणीत आणण्यासाठी महायुतीचे राज्यातील नेते सध्या निरनिराळे हातखंडे वापरत आहेत.मात्र त्यामध्ये त्याना शरद पवार काही यश मिळू देत नाहीत.काल शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवा व या बैठकीला मराठा नेता मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही बोलवण्यात यावे,अशी थेट गुगलीच टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांना याविषयी प्रतिक्रिया द्यावी लागली तर छगन भुजबळ यांनीही सावध पवित्रा घेत,यातून काय निष्पन्न होणार ? असा उलट प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या काही संघटना,( मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी…

Read More

पालघर, मुंबई-अहमदाबाद महामार्ग बांधणीच्या कामात प्रचंड हेळसांडपणा, ६०० कोटीचा चुराडा,नागरिक बेहाल, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग १२ लेनचा करणे,तसेच दहिसर ते तलासरी या ११० किमी. अंतराच्या मार्गाचे काँक्रीटीकरण करणे,या कामासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी नोव्हे.महिन्यात ६०० कोटी रु.निधी दिला. त्यानंतर संबधित ठेकेदाराने काम देखील सुरू केले.पण या कामात कोणतेही नियोजन नव्हते,तसेच बांधकामात वापरण्यात आलेल्या नित्कृष्ट दर्जाचे साहित्य,यामुळे या महामार्गाची सध्या पार दुर्दशा झाली आहे.या कामाकडे प्राधिकरणाचे अधिकारी फिरकत नसल्यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहे.महामार्गाचे काम सुरू होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला पण केवळ ३५ ते ४० % च काम झाले आहे.या झालेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.काँक्रीटीकरण…

Read More

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी,( भाग क्र.२ ) नेपाळ, फ्रंटलाईन, नेपाळमध्ये चिनी ड्रॅगन हातपाय पसरतोय, भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या प्रत्येक देशासोबत कायम मैत्रीचे संबंध राखले.नेपाळ,बांगलादेश, भूतान,म्यानमार,श्रीलंका, मालदीव,अफगाणिस्तान व आपल्याला कायम शत्रूराष्ट्र समजणाऱ्या पाकिस्तानशी आपण मिळते जुळते घेत आलो.पाकिस्तान वगळता इतर देशासोबत आपले आजही मैत्रीचे संबंध आहेत.पण भूतान वगळता इतर सर्व देशांनी अमेरिका व चीनच्या आहारी जाऊन भारताला अनेकदा त्रास दिला.ज्या बांगला देशाच्या निर्मितीसाठी भारताने आपले सर्वस्व पणाला लावले,तो देशही आता आपल्या विरोधात उभा ठाकला आहे.दक्षिण आशियात भारताचा दबदबा निर्माण होता कामा नये,यासाठी अमेरिका व चीन,हे दोन देश कायम उचापती करत होते व आजही करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्या…

Read More

दीपक मोहिते, ” मॅडम,तुम्ही ” मेकअप,” का नाही करत ? ” मॅडम सौ.राणी सोयामोई कॉलेजमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या . त्यांच्या अंगावर हातातील घड्याळाशिवाय दुसरं कुठलही आभूषण नव्हत.इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याच वाटल की , त्यांनी तोंडाला पावडरसुद्धा लावली नव्हती. भाषण इंग्रजीत सुरू होत,त्या फक्त जास्तीत जास्त पाच मिनिट बोलल्या असतील.पण त्यांच्या पाच मिनिटाच्या भाषणातील शब्द,हे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे तर होतेच आणि दृढ संकल्पाने भरलेले होते. थोड्यावेळाने विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न – मॅडम आपलं नाव काय आहे ? माझं नाव राणी आहे,सोयमोई,हे माझं कुटुंबातील नाव आणि मी उडीशाची मूळनिवासी आहे….अजुन काही विचारायचं…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही-अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर दिला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही-अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर दिला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही- अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, आश्रमशाळा ; चांगली शिक्षण व्यवस्था कोलमडून पडता कामा नये, गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती.त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे अप्रिय घटना घडली नाही.आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारव जेवण हे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत असते.विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा होणे,जेवणात अळ्या सापडणे,अन्नाचा दर्जा सुमार असणे,असे प्रकार वारंवार घडत असतात.आदिवासी विकास मंडळ व एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी या मानवनिर्मित गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात.त्यामुळे आश्रमशाळा समूहयोजना यशस्वी ठरली का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. १९७२-७३ दरम्यान ही योजना स्विकारण्यात आली.डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या जनतेची सामाजिक व शैक्षणिक प्रगती व्हावी,असा…

Read More