Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ग्रामीण जनतेच्या हालअपेष्टा, साडेसात दशकानंतरही कृषीक्षेत्र आजही डगमगतच आहे, ग्रामीण भागातील शेतीला पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात सरकारचे दिशाहीन धोरण,हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे ठरले आहे.आजवर अनेक अर्थतज्ञानी कृषी क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून तो मजबूत रहावा,यासाठी सरकारकडून असलेल्या अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकल्या नाहीत,सतत सांगत आले.पण सरकारने कृषी क्षेत्राच्या धोरणात कोणतेही बदल केले नाहीत.संयुक्त पुरोगामी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोन्ही सरकारच्या उदासिनतेमुळे आज देशाच्या कृषी क्षेत्राची पार वाताहत झाली आहे.किमान आधारभूत भाव ( एमएसपी ) वरून दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या भयानक आंदोलनानंतरही सरकारला शहाणपण आलेले दिसत नाही.त्यामुळे आता पुन्हा हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारण्याचे संकेत दिले…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार आहेत.पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे,त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या पथकाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घाईघाईने या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात येत आहे.तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी व शहा या दोघांनी ” मिशन महाराष्ट्र,” हाती घेतले आहे.या अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे. अवघ्या दीड तासाच्या त्यांच्या या दौऱ्यात ते अत्यंत वेगाने १२ प्रकल्पाचे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक अपडेट्स, राज्य विधानसभा निवडणूक ; येत्या  आठवड्याभरात निवडणुकीचे बिगुल वाजणार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तयारीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.निवडणूक आयोगाचे राजीवकुमार हे आजपासून आपल्या पथकासह महाराष्ट्र दौरा करणार आहेत.या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्ष व संबधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा २६ ते २८ सप्टें.दरम्यान महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे.या दौऱ्यात निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. २६ सप्टें.रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होत आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ सप्टें.रोजी सकाळी १०.०० वाजता निवडणूक मुख्य आयुक्त राजीवकुमार राज्यातील राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार आहेत.त्यानंतर दुपारी १.००…

Read More

दीपक मोहिते, वरुणराजाची अवकृपा, अनेक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके धोक्यात, गेल्या तीन दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मुंबई,ठाणे,पालघर, रायगड,सोलापूर,नाशिक व इतर अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.या अस्मानी संकटामुळे राज्यातील खरीप पीके धोक्यात आली आहेत.दरम्यान हवामान विभागाने सलग तीन दिवस अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.मुंबई व ठाणे सारख्या महानगरात सर्वत्र पाणी साचून राहिल्यामुळे कालपासून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.अनेक भागात रेल्वेरुळावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे उपनगरीय सेवा देखील विस्कळीत झाली आहे.हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाने शैक्षणिक संस्था ( शाळा…

Read More

दीपक मोहिते, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट ; आज शैक्षणिक संस्थाना सुट्टी जाहीर, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.त्या अधिकाराचा वापर करत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाविद्यालये,शाळा,अंगणवाड्या व इतर शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली…

Read More

दीपक मोहीते, ” रणसंग्राम,” जागावाटपानंतर महायुतीमध्ये होणार उद्रेक, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोकसभा निवडणुकीसारखा फटका बसेल,अशा भितीतून गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यात दौरे सुरू झाले आहेत.काल त्यांनी नागपूर येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी,हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही या दोघांनी राज्यात सतत दौरे केले होते.पण त्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.ज्या विदर्भात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहतात,त्या विदर्भात भाजपची प्रचंड पीछेहाट झाल्यामुळे शहा यांनी आता विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील राजकीय वातावरण महाविकास आघाडीला पोषक आहे,हे पाहून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मतदार,सरकारच्या भुलभुलैय्यात अडकणार नाहीत, राज्यात तीन इंजिनचे सरकार,सध्या पैश्याच्या खिरापती वाटण्यात मश्गुल असून,त्यांच्या या अशा वागण्याचा राज्याच्या तिजोरीवर किती भार पडत याच्याशी त्यांना कसलेही देणेघेणे नाही.आज या सत्तेसाठी बेफाम झालेल्या सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे पाप केले आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशी उधळपट्टी सुरू केली आहे.त्यांच्या या अशा वागण्यामुळे राज्याची विविध क्षेत्रात पीछेहाट सुरू झाली आहे.त्यामुळे राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही.राज्यात विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटींची बिले गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असून ठेकेदारांनी नवीन कामे सुरू करण्यास साफ नकार दिला आहे.तसेच त्यांच्या संघटनांनी आमची बिले मिळाली नाहीतर आंदोलन करण्याचा…

Read More

दीपक मोहिते, परतीचा पाऊस, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, काल रात्रीपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.१५ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत.तर शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.दरम्यान हवामान विभागाने उद्या ऑरेंज व परवा रेड अलर्ट जाहीर केला आहे.हा परतीचा पाऊस असून तो यंदाही शेतीला फटका देणारा ठरणार आहे,अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यमानाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.पावसाचे आगमन उशीराने होणे,मध्येच पावसाचे गायब होणे व शेती बहरल्यानंतर जाता जाता पिकांना फटका देणे,असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले,त्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीमधून अजित पवार गटाला बाहेर काढण्याचे षडयंत्र, गेल्या दोन ते तीन दिवसात दिल्लीत घडलेल्या वेगवान घडामोडीमुळे महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी आपल्या मनातले जागावाटप राज्यस्तरीय नेत्यांच्या मुखातून बोलायला सुरुवात केली आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार गट सावध झाले आहेत.भाजपच्या मनातले जागावाटप कसे आहे ? व हे दोन्ही गट का धास्तावले आहेत ? व या दोन्ही गटाचे या जागावाटपावर काय म्हणणे आहे ? या तीन प्रश्नाचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करूया. भाजपच्या दिल्लीश्वराच्या मनातील जागावाटप- १) भाजप-१६०, यापैकी १२५ जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे राज्यस्तरीय भाजप नेत्याना टार्गेट, २) शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )…

Read More

दीपक मोहिते, बदलापूर लैगिंक अत्याचार ; आरोपी अक्षय शिंदे पोलीसांच्या गोळीबारात ठार, विरोधकांकडून संशय व्यक्त, बदलापूरच्या शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावल्याने पोलिसांनी अक्षय शिंदेचा एनकाऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलीसांवरही गोळीबार केल्याची माहिती आहे.तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता पोलीस त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.त्यानंतर पोलिसांनी कळवा रुग्णालयात दाखल केले.तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची बंदूक हिसकावुन अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर केलं.पोलिसांच्या पायांवर गोळीबार झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत…

Read More