- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
कोगदे गावचे डॉ. अजय डोके झाले पहिले आयएएस अधिकारी, जव्हार प्रतिनिधी- पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम कोगदे गावातील सुपुत्र डॉ. अजय काशीराम डोके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, ते कोकण विभागातून आयएएस होणारे पहिले आदिवासी, तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाजातून तिसरे आयएएस अधिकारी ठरले आहेत. या अभूतपूर्व यशाच्या निमित्ताने कोगदे गावात भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक आदिवासी वाद्यांचे निनाद, सांबळीच्या गजरात गावकऱ्यांनी डॉ. डोके, त्यांच्या पालक, तसेच गुरू सुरेश भोये यांचे जल्लोषात स्वागत केले. गावकऱ्यांनी आरती ओवाळून, फुलांचा वर्षाव करत त्यांचा सन्मान…
दीपक मोहिते, बारमाही नद्या वाहत असूनही जिल्ह्याच्या घश्याला कोरड, दरवर्षी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना,पाणीटंचाई, अवकाळी पाऊस,अतिवृष्टी,वादळे शेतीची हानी इ.अस्मानी संकटांना सामोरे जावे लागत असते.ही सारी संकटे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या पाचवीला पुजली आहेत.नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आलेल्या घटनेस आता एक तप पूर्ण झाले आहे.पण जिल्ह्याचे प्रश्न व समस्या आजही जैसे थे स्थितीतच आहेत. या सर्व समस्यांपैकी दरवर्षी निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई आजही ” जैसे थे,” स्थितीत आहे.जिल्ह्यात वैतरणा,सूर्या,पिंजाळ, तानसा व देहर्जे,या बारमाही नद्या वाहत असताना दरवर्षी जिल्ह्याच्या घश्याला मात्र कोरड पडत असते.जिल्ह्याच्या भूगर्भातही पाण्याचा मुबलक साठा आहे,पण दरवर्षी ग्रामीण भागातील विहिरी,तलाव,बंधारे मधील पाण्याची पातळी खोलवर जाते.नवा जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” पालकमंत्री असा असता कामा नये, आपल्या पालकमंत्रीपदाचा वापर पक्षवाढी व शिंदे गटाला नामोहरम करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात पालघर जिल्ह्यात नाराजीचे सूर उमटत आहेत.जिल्ह्यात नूकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हावासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ग्रामीण भागातील लोक या अस्मानी संकटामुळे पार खचून गेले असताना पालकमंत्री मात्र तिरंगा यात्रेत मश्गुल असल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती व स्थानिक भूमिपुत्राच्या राहत्या घरांचे अतोनात नुकसान झाले.या नैसर्गिक संकटात शंभरहून अधिक घरावरील पत्रे व शेड्स उडून गेले,जनावरांचे अनेक गोठे जमिनदोस्त झाले.या वावटळीत अनेक कुटुंबे बेघर झाली,सर्वत्र हाहाकार उडाला.पण या संकटसमयी पालकमंत्री गणेश नाईक मात्र या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात फिरकले…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” नरकातला स्वर्ग ” ; सत्ताधाऱ्यांची झोप उडाली, खा.संजय राऊत यांच्या ” नरकातला स्वर्ग,” पुस्तकाचे काल मुंबईत प्रकाशन झाले.त्यांच्या या पुस्तकातील लिखाणाने भल्याभल्यांची झोप उडवून दिली आहे.खा.राऊत यांनी आपल्या या पुस्तकात अनेक विलक्षण घडामोडीवर प्रकाश टाकला आहे.त्यामुळे भाजपच्या अंधभक्ताचा पोटशूळ उठला आहे.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यामध्ये समावेश आहे.फडणवीस यांनी तर ” बालवाङ्मय मी वाचत नाही,आणि सध्या तसं माझं वयही नाही,” अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.हे पुस्तक अद्याप बाजारात आलेले नाही,ते आल्यानंतर प्रचंड गदारोळ उठण्याची शक्यता आहे. या पुस्तकात खा.राऊत यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,हे एका प्रकरणात बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर…
सचिन परब वसई, दुसऱ्या आंबा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद, पालघर जिल्ह्यातील शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम वसई शेतकरी सोसायटी करत आहे.त्यासोबत आपला माल ही थेट ग्राहकांना विकत असल्यामुळे शेतकरी व ग्राहकांना फायदा होत असल्याचे प्रतिपादन सहकारी संस्था,वसई तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांनी वसई शेतकरी सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंबा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले. वसई तालुक्यातील वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीच्या ८५ व्या वर्षाचे निमित्त साधून संस्थेच्या देवतलाव येथील आवारात आज पासून आंबा महोत्सव भरवण्यात आले आहे या आंबा महोत्सवाचे उदघाटन वसई तालुका सहकारी संस्था उपनिबंधक अमर शिंदे आणि भाजपचे महामंत्री हेमंत म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. वसई शेतकरी सोसायटीच्या…
जव्हार प्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर – आ.हरिश्चंद्र भोये, जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा,हे डोंगरी व आदिवासीबहुल तालुके असून, येथे प्रामुख्याने हंगामी शेती केली जाते.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे नुकतीच खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत आ.हरिश्चंद्र भोये यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकल्या व विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बोलताना आ. भोये, आपल्या भाषणात म्हणाले, ” शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.कृषी विभागातील अधिकारी,कृषी सहाय्यक व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांना मार्गदर्शन करावे.मधमाशी पालन,फळबाग,फुलबाग लागवडीसाठी सहकार्य करावे. गरीब शेतकऱ्यांसाठी वॉल कंपाऊंडसारख्या सुविधांची मागणी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे करावी.पुढे ते म्हणाले, ” पीक विमा योजनांचा लाभ अनेक…
दीपक मोहिते, पुणे वनजमीन घोटाळा ; माजी महसूलमंत्री नारायण राणे अडचणीत, राजकारणी लोक सरकारी जमिनीची कशी लूट करतात,हे आपण आजवर घडलेल्या अनेक घटनावरून आपण अनुभवले आहे. पुण्यात ३० एकर वनजमिनी प्रकरणात सरन्यायाधीश रामकृष्ण गवई यांनी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांना चांगलाच दणका दिला आहे. ही जमीन विकासकांच्या घश्यात घालणारे राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. सरन्यायाधीश गवई यांनी ही जमीन वनविभागाची असुन ती वनविभागाला परत देण्याचे आदेश दिले आहेत. २७ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूलमंत्री असताना वनविभागाची ३० एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पण नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेंनी घेतलेला हा निर्णय काल…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदित्य ठाकरे यांनी ठोकला विजयी षटकार ; राज ठाकरे क्लीनबोल्ड, गेल्या महिन्यात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राज यांनी ” आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो,” असे जाहीर वक्तव्य केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर आपला राजकीय बाजार चांगलाच वधारला.राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व चर्चेला उधाण आले.उद्धव व राज,हे भाऊ लवकरच एकत्र येणार व राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे पाहायला मिळणार, असे अंदाज व्यक्त होऊ लागले.हे दोघे भाऊ परदेश दौऱ्यावरून परतले की या होऊ घातलेल्या युतीचा शुभारंभ होणार,अशी चर्चा महिनाभर सुरू होती.मात्र हे दोघे परत आल्यानंतर याविषयी फारशा हालचाली…
वसंत भोईर,वाडा गौरापूर गावाला वादळी वाऱ्याने झोडपले ; २४ घरांची पडझड, वाडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे.काल सायंकाळी वादळ वा-यासह जोरदार पाऊस पडल.यावेळी वा-याने गौरापूर गावाला अक्षरश झोडपून काढले.गाव व लोंढारे पाड्यातील सुमारे २४ घरांचे प्रचंड नुकसान झाले असून घरांची छप्परे उडून गेली आहेत.नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पार भिजले आहे. पुंडलिक उल्हास, उल्हास मथे,दत्तात्रय जाधव, मनोज पडवळे,हरी मोर,भरत मोर,भगवान मोर,नारायण जाधव,भिवा मथे,भारती पडवळे,दशरथ धापशी,जानू वणगे,कल्पेश जाधव,मजुंळा तांडेळ,अनिल मथे,बारकू मथे, शैलेश मथे,नंदू शेळके,वंदना मथे,संतोष मथे,निलेश मथे असे नुकसान झालेल्या नागरिकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास प्रचंड वादळ वारा सुटला होता.त्यामुळे गावात हाहाकार…
नवीन पाटील,सफाळे खा.सवरा यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित… पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ १३ मे पासून सफाळे विकास कृती समितीतर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते.आज खा.डॉ.हेमंत सवरा यांनी उपोषणस्थळी भेट देवून पर्यायी व्यवस्थेसंदर्भात काही आश्वासने दिल्यानंतर आंदोलकानी तात्पुरती स्थगिती दिली.मात्र दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल,असा इशाराही कृती समितीकडून देण्यात आला. सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ…
