- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, प्रगल्भ लोकशाही भारतीय संविधान ; पाच दशकानंतर पुन्हा ढग जमू लागले आहेत… संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हें.रोजी भारतभर साजरा करण्यात येत असतो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हें.१९४९ रोजी संविधान सभेने स्विकारला.त्यामुळे २६ नोव्हें. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.परंतु आता पाच दशकानंतर पुन्हा काळे ढग जमु लागले आहेत.त्यामुळे भारतीय जनतेने सजग राहण्याची गरज आहे. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा ” भारतीय संविधान दिन,” साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, मतदार नोंदणी प्रभावीपणे व्हायला हवी, २ डिसें.रोजी होऊ घातलेल्या पालघर,डहाणू व जव्हार,या तीन नगरपरिषदा व वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत १ लाख १६ हजार ६६० मतदार आपला हक्क बजावणार आहेत.या चारही शहराची लोकसंख्या लक्षात घेता मतदारांची संख्या इतकी कमी का ? असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो.दरवर्षी राज्य निवडणूक आयोग,राज्यात मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत राबवत असतो.” मतदान हे पवित्र काम असून ते पार पाडले पाहिजे,” असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत असते.पण,आयोग या महत्वाच्या आवाहनाचे स्वतः पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षात रेल्वेला लागून असलेल्या वसई,पालघर व डहाणू तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व या तिन्ही…
दीपक मोहिते, आम्ही वसईकर खरंच दुर्देवी, तिघांची तोंडे तीन दिशेने ; विकासकामाना अद्याप वेग नाही… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका नजीक आल्या असून सारे राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या की दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुका होतील.त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतील. महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे फेब्रु.महिन्यात होतील,असा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकामध्ये नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून वर्षभरात लोकहिताची किती कामे झाली ? प्रलंबित विकासकामाना चालना मिळाली का ? व लोकांच्या अपेक्षा १०० % नाही तर वर्षभरात किमान १० ते १५ % कामे झाली का याविषयचा लेखाजोगा लोकांसमोर…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे ( उबाठा ) उत्तम पिंपळे,भाजपचे कैलाश म्हात्रे व शिवसेनेचे ( शिंदे गट ) उत्तम घरत हे तिघेजण आपले नशीब अजमावत आहे. वास्तविक हे तिघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. या तिघांपैकी उत्तम घरत यांनी चारवेळा उपगराध्यक्ष तर उत्तम पिंपळे यांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे.या निवडणुकीत हे तिघेही एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. त्यामुळे पालघर शहरातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची दाट शक्यता आहे.पालघरच्या शहरी भागात शिवसेनेला वाखणण्याजोगा जनाधार होता.पण पक्षफुटीनंतर या जनाधारचे विभाजन झाले.त्याचा फायदा या निवडणुकीत भाजपला होण्याची शक्यता आहे.भाजपने,शिवसेनेच्या कैलाश म्हात्रे यांना रिंगणात उतरवून आपण या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे…
दीपक मोहिते, दीपक मोहिते, पालकमंत्र्यांचे जनता दरबार व जिल्ह्याचे दौरे ; काहीही निष्पन्न होणार नाही… पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,हे गेले वर्षभर जिल्ह्याचे धावते दौरे करत आहेत.त्यांचे हे दौरे,केवळ एकप्रकारचे इव्हेंटच ठरले आहेत.दौऱ्यामागचे उद्देश तडीला जातात का ? याविषयी पालघरवासियांच्या मनात संभ्रमावस्था आहे.पण हे दौरे फार महत्वाचे आहेत,असे त्यांना वाटत असले तरी या दौऱ्याचे फलित काय ? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर केवळ ” माहीत नाही,” असेच मिळते. प्रशासन त्यांच्या दौऱ्यावर वारेमाप खर्च करत असते,हा पैसा खरोखरच कारणी लागतो का ? मध्यंतरी पालघर येथे झालेल्या जनता दरबाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.आपल्या समस्यांची सोडवणूक होईल,अशी भाबडी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भूमिपूजनाचा सुळसुळाट व पाहणी दौऱ्याचा सुकाळ,प्रत्यक्षात सर्वत्र शुकशुकाट, गेल्या वर्षभरात वसईकर नागरिक,हे भूमिपूजनाचा सुळसुळाट व पाहणी दौऱ्याचा सुकाळ पाहून अक्षरशः कंटाळून गेले आहेत.दर दोन दिवसाने अमुक तमुक विकासकामांना देवाभाऊंनी कोट्यवधी रु.दिल्याच्या रील्स पाहून डोके अक्षरशः भणाणून गेले आहे.त्यामुळे सध्या वसईकर नागरिकांची स्थिती ” सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,” अशी झाली आहे. गेल्या वर्षाभरात वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामापैकी एकही विकासकाम मार्गी लागू शकले नाही,असे यापूर्वी कधीच घडले नव्हते.केवळ रील्स बनवून प्रसिद्धी माध्यमावर पोस्ट करणे,हे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासारखे आहे.आज तालुक्यातील हैराण झाली आहेत,कारण त्यांची लहानसहान कामेही वेळेवर होत नाहीत.लोकप्रतिधीनीचे साधे पत्र मिळण्यासाठी जर नागरिकांना पंधरा…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढतोय… फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एक दिवसाच्या या दौऱ्यात त्यांच्या चार जाहीर सभा होत आहेत.या सभेत ते आपल्या भाषणात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीमध्ये सध्या धमासन सुरू झाले आहे.त्यास पालघर जिल्हाही अपवाद राहिला नाही.जिल्ह्यात भाजप व शिंदे गटामध्ये सख्य उरलेले नाही. शिंदे गटाच्या अनेक राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे भाजपकडून जोरदार प्रयत्न होत आहेत.त्यामुळे महायुतीचे घटक व विरोधी पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सुमारे तीन हजार समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.परंतु त्यांच्या प्रवेशाला काही कारणामुळे स्थगिती देण्यात…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, जव्हारकरांची पहिली पसंती कोणाला ? जव्हार तालुका हा आता विकासाच्या वाटेवर आहे,पण विकासाला अपेक्षेनुसार गती मिळालेले नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचे जीवन अद्याप , ” जैसे थे,” स्थितीतच आहे.रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे दरडोई उत्पन्न वाढू शकले नाही.हा तालुका निसर्गरम्य तालुका म्हणून ओळखला जातो,पण सरकारने पर्यटन दर्जा देऊन पर्यटनावर आधारित व्यवसाय निर्माण केले नाहीत.त्यामुळे आजही ग्रामीण भागात अठरापगड दारिद्र असून स्थानिक भूमिपुत्र हलाखीचे जीवन जगताहेत.सुमारे १०७ वर्षांपूर्वी सरकारने शहरात नगरपरिषद स्थापन केली.पण तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नामुळे भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.त्याचे दुष्परिणाम स्थानिकांना आजही भोगावे लागत आहेत. पर्यटन वाढीला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असते तर हा…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, कालचे मित्र,आज प्रतिस्पर्धीच्या भूमिकेत, पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आतापासून सुरु झाला आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मतदार मात्र या निवडणुकीसंदर्भात फारसा उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी गळ्यात गळा घालून फिरणारे व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे जिवलग मित्र,या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नगरसेवकांच्या अनगोंदी व भ्रष्ट कारभाराने सतत प्रकाशझोतात असलेली पालघर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.भाजप व शिंदे गट ही निवडणुक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहेत.या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप युती करण्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे दोन्ही…
दीपक मोहिते, विरार – मरीन ड्राइव्ह दरम्यान सी – लिंकच्या कामाला हिरवा कंदील, वसई विरारकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे.सध्या मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असतो,आता तो त्रास कमी होणार असुन त्यांना अवघ्या पाऊण तासात मुंबई गाठता येणार आहे.राज्यसरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढला आहे.उत्तन वसई विरार सी – लिंक या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.या प्रकल्पाला संबंधित विभागाच्या परवानग्या मिळाल्या असुन फक्त पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली नव्हती.मात्र,आता या विभागानेही परवानगी दिल्याने या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु होणार आहे.या प्रकल्पामुळे पालघर, वसई-विरार आणि डहाणू भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना विरारवरुन थेट मरीन…
