Author: दीपक मोहिते

दिपक मोहिते ” हल्लाबोल, ” नवा जव्हार जिल्हा निर्माण करताना सरकारने सारासार विचार करावा, पालघर जिल्हा,हा देशातील ३६ व्या क्रमांकाचा जिल्हा आहे.दहा वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला.नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असा जिल्हा निर्माण केला.वास्तविक जिल्ह्याचे विभाजन करताना तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांनी भौगोलिक परिस्थितीचा सारासार विचार करून नागरी, सागरी व डोंगरी असे त्रिभाजन करायला हवे होते. या जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ व विकासाची मंदावलेली गती पाहून सरकारला आता पुन्हा जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्याची उपरती झाली आहे. २०१४ साली चव्हाण सरकारने जिल्हावासि्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर…

Read More

दीपक मोहिते, आम्ही मतदान का म्हणून करावे ? राज्य व केंद्रात सध्या जे काही चाललंय,आयाराम गयारामांचा उच्छाद लक्षात घेता,आम्ही मतदारांनी का म्हणून मतदान करावे ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.आजच्या घडीला कोण कूठे आहे ? याचा थांगपत्ताच लागत नाही.ज्या उमेदवाराला आपण मत दिले,तो उद्या कुठे असेल ? याचा भरवसा नाही. या सर्व घडामोडीमध्ये पराभव कोणाचा होत असेल तर तो मतदारांचा होत असतो.विचारसरणी व सामाजिक बांधिलकी ही केंव्हाच सरणावर गेली आहे.कोण खरं आणि कोण खोटं ? या वादाशी मतदारांना कोणतेही देणे-घेणे नाही.पण गेल्या दशकभरात त्यांच्या मताचा अनादर केला गेला,हे मात्र सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.त्यामुळे आपली लोकशाही प्रगल्भ आहे,असे बोलणे चुकीचे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” देशाची वाटचाल सध्या आर्थिक संकटातून होत आहे…. देशात आज सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वसामान्य नागरिक भांबावलेला स्थितीत सापडलेला आहे.बिकट आर्थिक स्थितीत सापडलेल्या आपल्या देशाला या स्थितीतून बाहेर पडण्यास प्रदीर्घ कालावधी लागणार आहे.कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखणे,असा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार वाटचाल करत आहे.आजच्या घडीला त्यांच्या सरकारचे आर्थिक व परराष्ट्र धोरण दिशाहीन होऊन हेलकावे खाऊ लागले आहे. काही मूठभर उद्योगपतीना केंद्र सरकारकडून दिले जाणारे झुकते माप,आपल्या अर्थव्यस्थेच्या गळ्याला नख लावणारे आहे.काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत जीएसटीला विरोध करणारा भाजप आपले सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या नागरिकांवर भरमसाठ जीएसटी लादतो, याला काय म्हणावे ? मात्र दोन महिन्यापूर्वी याच…

Read More

मीरा भाईंदरमध्ये जनता दरबाराचे आयोजन, दीपक मोहिते, मीरा – भाईंदर शहरात भाजप आ.नरेंद्र मेहता यांच्यातर्फे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत शहरातील लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने काल सकाळी ११.०० च्या सुमारास अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास आमदार,मीरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त,पोलीस,तलाठी,वन व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच मीरा – भाईंदर शहरातील नागरिक☝️ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनता दरबारमध्ये उपस्थित नगरिकांनी गणेश नाईक यांचे आपल्या तक्रारीकडे लक्ष वेधले, पालकमंत्र्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली व त्याचे निवारण केले.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मीरा – भाईंदर शहरात यापूर्वी देखील जनता दरबार आयोजित करण्यात आले होते,त्यामुळे शहरातील लोकांना जनता…

Read More

दीपक मोहिते, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा विजय,तर राज्यातील विरोधकांना नेस्तानबूत करणारा विजय… बिहार राज्यात भाजप व जेडीयुने मिळवलेला विजय हा अपेक्षितच होता,पण तो इतका जबरदस्त असेल,असे कोणालाही वाटले नव्हते.ज्या पद्धतीने जनसुराज,काँग्रेस व राजदने भाजप व जेडीयु समोर आव्हान उभे केले होते,ते पाहता नितीशकुमार व अमित शहा या दोघांची चांगलीच दमछाक होईल,असे वाटले होते.पण फासे उलटे पडले व ही लढत एकतर्फी झाली.या निवडणुकीतील निकालानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.या निकालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून भाजप व जेडीयु यांना मिळालेल्या या विजयात आयोगाचे मोठे योगदान असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत भाजपने १०१…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण ( बिहार ) बिहारमध्ये भाजप – जेडीयूचा डंका वाजला,आरजेडी – काँग्रेसचा सुपडा साफ, अपेक्षेप्रमाणे बिहार राज्यातील निवडणुकीचा निकाल लागला आहे.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १९५ जागा मिळाल्या असून त्यामध्ये भाजप – ८९,जेडीयू – ७९, लोकजनशक्ती पक्षाला २१,जागा जिंकता आल्या.तर इतर ०७ जण निवडून आले आहेत.येथे महागठबंधनला ४१ जागा जिंकता आल्या.त्यामध्ये आरजेडी – ३२,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०४,विआयपी – ०,सिपीआय – ०,मार्क्स.कम्यु.- ०,सिपीआय ( मार्क्सवादी व लेनिनवादी ) – ०५,या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ५३ % तर महागठबंधनला ३५ % तर अपक्षाना १२…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत निरव शांतता, वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या २ डिसें.रोजी होत असून गेल्या १० डिसें. पासून उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज चौथ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही.सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. वाडा नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून येणार आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडी,भाजपा,शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.मात्र अनेक पक्ष आतापर्यंत उमेदवार निश्चित करू शकले नाहीत.काही ठिकाणी एका प्रभागात अनेक जण इच्छुक आहेत,तर काही ठिकाणी राजकीय पक्षांकडे उमेदवार नाहीत.त्यामुळे दुस-या प्रभागातील उमेदवाराची चाचपणी सुरू…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” या खड्ड्याचे करायचे तरी काय ? वसईकरांचा आक्रोश…. वसई तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व भोगाव्या लागत असलेल्या मरण यातना तसेच मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या खड्ड्याचे करायचे तरी काय ? अशा विवंचनेत वसईकर नागरिक सापडले आहेत.आमची या त्रासातून सुटका करण्याऐवजी राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसत आहेत.त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारीही चांगलेच निर्ढावले आहेत.या अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून मिळणाऱ्या टक्केवारीमध्ये केवळ रस आहे.त्यांना या ज्वलंत विषयाचे सोयरसुतक नाही.अशा सर्व परिस्थितीमध्ये करदाते मात्र हालअपेष्टा सहन करत आहेत.आमचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे,आम्हाला प्यायला शुद्ध पाणी मिळावे,दर्जेदार आरोग्य,वैद्यकीय व शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या,यासाठी करदात्यांनी यंदा परिवर्तन घडवून आणले,पण आज त्यांच्यावर कपाळावर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकत्र येण्याचा निर्णय स्वागतार्ह,पण ” उशिराने सुचलेले शहाणपण,” वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले आहे.त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याचे वर्णन उशिराने सुचलेले शहाणपण,” असेच करावे लागेल.गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणारे हितेंद्र ठाकूर व उद्धव ठाकरे हे भाजपला रोखण्यासाठी या निवडणुकीत एकत्र आले आहेत.त्यांच्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीत सामील होण्याची शक्यता फार कमी आहे.कारण त्यांचा मनसेला सोबत घेण्यास तीव्र विरोध आहे.मनसे सोबत आली तर गुजराती,मारवाडी,जैन, मुस्लिम व दाक्षिणात्य मतदार आपल्यापासून दुरावतील,अशी भिती काँग्रेसजनांना वाटत आहे. ही भिती रास्तच आहे.मराठी भाषेची…

Read More

दीपक मोहिते, ” सुखद बाब,” माजी आ.ठाकूर यांचे पुन्हा सक्रिय होणे,पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येणार…. बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते व वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत.बहुजन विकास आघाडीसाठी ही एक सुखद बाब आहे.त्यांच्या सक्रिय होण्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही चांगलेच ताजेतवाने झाले असून ठाकुरांच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्राणाची बाजी लावतील.हितेंद्र ठाकूर हे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून दूर होते.त्याचे परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भोगावे लागले.गेल्या निवडणुकीत ते स्वतःच्या प्रचारातही फारसे उतरले नव्हते.त्यामुळे त्यांना अवघ्या २ ते ३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.त्यांचा हा पराभव मतविभागणीमुळे झाला होता.पण,पराभव…

Read More