Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विरार लोकल …नाबाद १५८ वर्षे, पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी विरार लोकल आज १५८ वर्षाची झाली.गेली दिड शतक अविरतपणे धावणारी विरार लोकल व तीचा डौल आजही कायम आहे.पश्चिम रेल्वेला आणि प्रवाशांंच्या जिवनाशी एकरूप झालेल्या या लोकलचा प्रवाशांना मात्र विसर पडला होता. मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या पुढाकाराने हिंदुस्थानातील पहिली रेल्वे बोरीबंदर मार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी धावली.त्यानंतर तब्बल १४ वर्षानी म्हणजेच १२ एप्रिल १८६७ रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली विरार लोकल धावली.आताही पहिली विरार लोकल पकडणे म्हणजे तारेवरची कसरत. प्रचंड गर्दीत या लोकलमध्ये सीटवर बसायला सोडा,डब्यात शिरायलाही जागा मिळत नाही.तरीही प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ही लोकल त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप…

Read More

दीपक मोहिते, ” इथे रंगले मानापमानाचे नाट्य,अवघा महाराष्ट्र ओशाळला,” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काल राज्याचा दौरा पार पडला.या दौऱ्यात अमित शहा यांनी किल्ले रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन केले.पण त्यांच्या या दौऱ्यादरम्यान तीन इंजिन सरकारमधील सुंदोपसंदी उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली.यावेळी रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे माध्यमामध्ये सर्वत्र खमंग चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या तीन इंजिन सरकारच्या मंत्र्यामध्ये मंत्रीपदे,मलईदार खाते व पालकमंत्रीपदावरून चांगलेच धमासान सुरू झाले होते.रायगड व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे वगळता अन्य समस्या कशाबशा मार्गी लागल्या.पण रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र सुटू शकला नाही.नाशिक येथे शिवसेना ( शिंदे गट ) – भाजप व रायगडमध्ये राष्ट्रवादी…

Read More

दीपक मोहिते, राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत ; कोंडी होऊनही ईडीच्या भितीने शिंदे गट महायुतीमध्ये, संजय राऊतांनी काल सायंकाळी केलेल्या पोस्टमध्ये एक बकरा लाकडावर उभा असल्याचं पाहायला मिळत आहे.राऊत यांनी या पोस्टमध्ये बकऱ्याचा फोटो अटॅच करुन, ” खबर पता चली क्या ?” अशी चार शब्दांची कॅप्शन दिली आहे.तसेच त्यांनी या पोस्टच्या खाली, ” ए. सं.शिं. गट…” असं लिहिलेलं आहे.संजय राऊत हे सामान्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचा शिंदेंच्या नावाच्या अद्याक्षरांवरुन ” ए.सं.शिं. गट,” असा उल्लेख करतात. त्यावरुनच त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो एकनाथ शिंदेंना डिवचण्यासंदर्भात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राऊत यांच्या या पोस्टवरुन तर्क-वितर्क लढवले जात असतानाच त्यांनी ही पोस्ट…

Read More

वसंत भोईर,वाडा चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात दाखल, ज्या कांद्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते,असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. कांदा माळा बनवून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. दोन किलो वजनाची एक माळ १३० रु.प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. अनेक संकटावर मात करत जांभळा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला आहे. भात पीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. वाडा तालुक्यात चांबळा, डाकवली,असनस,चिखला, गातेस,केळठण या काही मोजक्याच गावात पांढऱ्या कांदा लागवड करण्यात येत असते.पोषक वातावरण आणि पारंपारिक लागवड,यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकवून…

Read More

दीपक मोहिते, तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका भाजप व अण्णाद्रमुक एकत्रितपणे लढणार, अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडापाडी के.पलानीस्वामी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचा सुपडा साफ झाला होता.दक्षिणेकडील एकाही राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही.त्यांना दक्षिणेत बिलकुल जनाधार नाही.त्यामुळे भाजप स्थानिक प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करत असतात. अण्णाद्रमुकने घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी आत्माघाती ठरण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आल्या नव्हत्या.उलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व द्रमुक यांच्या युतीला मोठा विजय मिळाला होता.या निवडणुकीत द्रमुकला २६.९३,अण्णा…

Read More

दीपक मोहिते, राज्याच्या अर्थखात्याच्या कारभाराविषयी मंत्र्यामध्ये असंतोष, एखाद्या कॅबिनेटमंत्र्याने आपल्या अखत्यारीत असलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळावे,यासाठी कटोरा घेऊन अर्थखात्याच्या प्रधान सचिवांच्या दारात जावे लागणे,ही बाब महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभेशी नाही,तसेच ती लाजिरवाणी अशीच आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सध्या चांगलीच धावपळ होत आहे.सरनाईक हे राजशिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला गेले.सचिवानं मंत्र्याला भेटण्यासाठी यावं,असा राजशिष्टाचार आहे.मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरनाईकांनी राजशिष्टाचार मोडून ते अर्थ खात्याच्या सचिवांच्या भेटीला गेले. अर्थखात्याच्या सचिवांची भेट घेतल्यानंतर,आता एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी १४४ कोटी रु.सरकारकडून तातडीनं देण्यात येणार आहेत. तसेच यापुढे एक महिना आधीच निधी एसटी महामंडळाला दिला जाणार आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा पगार…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्हाला फोटोशूट नकोय ; पाणी हवंय – ग्रामस्थांचा आक्रोश, कासा येथे जाऊन रोहित्र लोड करत असताना समोर उभे राहून फोटोशूट करण्याने कामण,चिंचोटी,देवदळ, भागातील गोरगरीब जनतेची तहान भागवता येणार नाही.त्यासाठी स्वतःच्या सरकारच्या उरावर बसण्याची हिंमत दाखवण्याची गरज आहे. आज वसई,नालासोपारा या परिसरात पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवू लागली आहे.ग्रामीण भागातील जनतेच्या घश्याला कोरड पडली आहे.ज्या पाण्याच्या प्रश्नावर रान उठवत आमदार निवडून आले आहेत,ते आमदार सध्या फोटोशूटमध्ये मग्न आहेत.निवडणुकीच्या प्रचारात ” आम्ही लवकरात लवकर पाणी आणू,” अशा सिंहगर्जना करणारे तथाकथित नेते आता केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहेत.दुसरीकडे टँकर लॉबीनेही टँकरचे भाव भरमसाठ वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात मराठी माणूस अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर… परराज्यातून मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात स्थानिक भूमिपुत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.ज्या प्रचंड वेगाने हे स्थलांतरण होत असल्यामुळे वसई,नालासोपारा,बोईसर भागात मराठी माणूस आता अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या वरील तीन विधानसभा मतदारसंघात परप्रांतियांच्या मतदानामुळे जिल्ह्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले.या निवडणुकीत परप्रांतियांची मते निर्णायक ठरली होती.पालघर जिल्ह्यात १९७० च्या दशकात उद्योग व कारखानदारीला वेग आला.तारापूर-बोईसर भागात महा.औद्यो.विकास महामंडळ तसेच वसई भागात लघुउद्योगाला चालना मिळाली,आणि रोजगारानिमित्त या भागात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली.कालांतराने बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्या परप्रांतियांची वाढती…

Read More

दीपक मोहिते, ” वास्तव, ” गेले अकरा वर्ष,कालचक्र उलट्या दिशेने फिरत राहिले, काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्यामुळे मोदीना आता त्यांची भिती वाटू लागली आहे.अधिवेशनात राहुल गांधी,प्रियांका गांधी व त्यांच्या टीमने भारतीय संविधान, वक्फ बोर्ड,वाढती महागाई, बेरोजगारी,रुपयाचे अवमूल्यन,अरुणाचल व लडाख भागात चीनची होणारी घूसखोरी,आदी ज्वलंत विषयावर संसदेत प्रखर हल्ले चढवले.या हल्ल्याना मोदी,अमित शहा यांची टीम समर्थपणे तोंड देऊ शकले नाही.या अधिवेशनात सरकार बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळाले. येत्या १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेची अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे.या एक तपाच्या वाटचालीत ते भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत.उलट…

Read More

महिलांना प्रवास तिकीट दरात ५०% सवलत मिळावी- आ.स्नेहा दुबे वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रवास तिकीट दरात ५०% सवलत देण्याची मागणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच आयुक्त पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडाळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५०% सवलत जाहीर केली असून महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच एम.एम.आर.डी.ए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका प्राधिकरणानेही अशी सवलत देण्यास सुरुवात केली आहे, असे असताना आपल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत अद्याप दिली नाही, याकडे आयुक्तांचं लक्ष…

Read More