Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-खरोंडा पूल गेला वाहून, जव्हार तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील अरुंद पुलांवर पाणी आल्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.पिंपळशेत खरोंडा परिसरातील खरोंडा, माडवीहिरा,हुंबरण या गावांना जोडणारा पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. परिणामी या मार्गाने येजा करणारे शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांचे हाल झाले. हेदीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीकामामध्ये अडचणी येत आहेत.ग्रामस्थांनी आठवण करून दिली की, सन २०२२-२३ या वर्षी २७ जुलै २०२३…

Read More

जव्हार, प्रतिनिधी, जव्हार येथे विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गोरठण येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी माl अशोक पाटील ( जि.प. पालघर ) यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना जीवनात निश्चित ध्येय ठेवण्याचे व आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.या प्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबन, इंग्रजी संवादकौशल्य, संगणकाचा वापर आणि सततच्या चाचण्यांमधून आत्मविश्वास वाढवणे, याविषयी महत्त्व पटवून दिले. दर शनिवारी इंग्रजी संवादाचा सराव करणे, संगणकाचा अधिकाधिक वापर करणे, इंग्रजी,गणित व विज्ञान या विषयांच्या दर महिन्याच्या चाचण्या घेणे, स्वतःची ओळख निर्माण करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करणे, अशा सूचना केल्या. अशोक पाटील यांनी भेटी दरम्यान शाळेतील भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.शिक्षक…

Read More

सुरेश काटे, तलासरी, वडवली पुनर्वसन शाळेत सुसज्ज ग्रंथालय, तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन या शाळेत बुधवारी आधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमास तलासरी तालुक्याचे सहा. गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे,गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते आणि यशराज रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यशराज रिसर्च फाउंडेशनने तलासरी तालुक्यातील २५ शाळांमध्ये दर्जेदार वाचनसाहित्याने समृद्ध ग्रंथालये उभारण्याचा उपक्रम हाती घेतला होता आणि तो यशस्वीपणे पूर्ण करून २५ शाळांना दर्जेदार ग्रंथालय निर्माण करून दिली आहेत. या ग्रंथालयात आवश्यक फर्निचर,टेबल,खुर्च्या,कपाटे, ग्रंथालय चालवण्याची संपूर्ण प्रणाली,आकर्षक भिंत पेंटिंग, स्टेशनरी,घड्याळ,चटई तसेच घरी पुस्तक वाचनासाठी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात…

Read More

वसंत भोईर,वाडा लाळ्या-खुरकत रोगप्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ, वाडा तालुक्यात लाळ्या खुरकत रोगाची बाधा होऊ नये यासाठी गुरांच्या लसीकरणाच्या ७ व्या फेरीचा शुभारंभ नुकताच पालघर येथे करण्यात आला. जिल्हा पशुसर्वचिकित्सालय येथील सहाय्यक आयुक्त डॉ. शिल्पा कारगिलवार यांच्या हस्ते नेहरोली येथे करण्यात आला.यावेळी पशुपालक तसेच पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. वाडा तालुक्यात २० व्या पशुगणनेनुसार २२ हजार ७४ गोवर्गीय तसेच १० हजार ९१८ म्हैस वर्गीय असे एकूण ३२ हजार ९९२ एवढे पशुधन आहे. काही दिवसापूर्वी तालुक्यातील चिखले,कोणे, मालोंडे,नेहरोली या गावामधील काही पशुपालकांच्या जनावरामध्ये खुरामध्ये जखमा झाल्यामुळे जनावरे लंगडत असल्याची माहिती पशुपालकांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दिली होती.जिल्हा स्तरावर याची तातडीने दखल घेऊन…

Read More

दीपक मोहिते, ” युतीचा निर्णय अंगलट,” बेस्ट निवडणूक ; मराठी मतदारानीही उद्धव / राज यांना झिडकारले, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना ( उबाठा ) व मनसेचे चांगलेच पानिपत झाले.सत्तेच्या राजकारणात मतदार राज ठाकरे यांच्या पक्षाला थारा देत नाहीत,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.मराठी भाषिकांच्या अस्मितेला फुंकर मारत उद्धव व राज हे दोघे ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरले खरे,पण त्यांना बहुतांश मराठी मतदार असलेल्या बेस्टच्या कामगारांनी आपल्या पतपेढीत प्रवेश करू दिला नाही. वेळोवेळी आपली राजकीय भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांचा हात हातात घेणाऱ्या उद्धव याना या निवडणुकीत जबर फटका बसला.गेले ९ वर्षे पतपेढी आपल्या ताब्यात राखणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदारांनी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” दरवर्षी वसई पुराच्या पाण्यात का बुडते ? शासनकर्त्यांच्या हलकटपणापायी वसईकर होतोय उध्वस्त… दरवर्षी पाण्यात बुडणाऱ्या वसई तालुक्याला वाचवायचे असेल तर,शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था,राजकीय पक्ष व नागरिकांनी एकत्र येऊन संयुक्त प्रयत्न करण्याची गरज आहे.असे प्रयत्न होणार नाहीत,याची खात्री नसतानाही आपण वसईकर नागरिक भाबडी आशा बाळगून असतो. असो, या आणीबाणीच्या प्रसंगी राजकीय नेते व कार्यकर्त्यानी एकमेकांची उणी – दुणी काढण्याऐवजी नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या कामी स्वतःला झोकून दिल्यास नागरिकांना काही अंशी दिलासा मिळू शकतो.ते न करता एकमेकांना दोष देणे व नागरिकांचे ” आम्हीच कैवारी,” अशा अविर्भावात सध्या पाण्यात उभे राहून नेत्यांचे जे फोटोसेशन सुरु आहे,ते अत्यंत किळसवाणे आहेच,पण माणूसकीला…

Read More

दीपक मोहिते, सुविधांमुळे अतिवृष्टीमध्ये नागरिकांना मिळाला दिलासा, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आज प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील काही ठिकाणी सखल भाग व रस्त्यांवर पाणी साचले होते, तसेच काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. महानगरपालिकेतर्फे जलमय झालेल्या भागातील पाणी काढण्यासाठी ५४ संक्शन पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.संक्शन पंप लावून विविध ठिकाणी साचलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी जेसीबी द्वारे पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करण्यात आले असून काही ठिकाणी पाणी काढण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एनडिआरएफ ची एक टीम ही कार्यरत ठेवण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे जेथे नागरिक अडकले होते, त्या ठिकाणी महापालिकेच्या…

Read More

सुरेश काटे,तलासरी मुसळधार पावसामुळे तलासरीतील जनजीवन विस्कळीत, तलासरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासुन पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.तालुक्याच्या अनेक भागात नदी नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.तलासरी भागात आज दिवसभरात मि.मि.पावसाची नोंद झाली. तालुक्यात झालेल्या पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे तलासरी महसूल आणि पोलिसाकडून सांगण्यात आले. सततच्या पावसामुळे तालुक्यातील कोचाई – अन्वीर रस्त्यावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली असुन अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.तसेच सूत्रकार – वेलूगांव रस्त्यावरील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरून केंद्रशासित दादरा नगर हवेली कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.या परिसरात…

Read More

दीपक मोहिते, माणुसकीचा झरा, बहुजन विकास आघाडीकडून हजारो बाधित कुटुंबांना दिलासा, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वसई विरार परिसराला अक्षरशः झोडपून काढले.या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील लोकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले.अनेक भागातील नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबाच्या घरात आज चूल पेटू शकली नाही.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना लोकांच्या मदतीसाठी पाचारण केले होते. आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसभर भरपावसात बाधित कुटुंबांना अन्नपाकीटे वाटप,साचलेल्या पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग मोकळे करणे,जेसीबीद्वारे माती हटवणे इ.कामे वेगाने हातावेगळी केली.त्यामुळे लोकांना मोठ्याप्रमाणात दिलासा मिळू शकला. वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे नैसर्गिक…

Read More

आदिवासींच्या संसाराला गवताच्या काडीचा आधार, वसंत भोईर गवत विक्रीचा भूमिपुत्रांना आधार, पालघर जिल्ह्यातील आदिवासींना पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी दोन महिने शेती कामांमध्ये रोजगार मिळतो,मात्र उर्वरित दोन महिने त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे गांव परिसरातील हिरवे गवत कापून त्याच्या विक्रीतून संसारला आधार उपलब्ध होत असतो. प्रतिवर्षी येथील आदिवासींना या माध्यमातून चांगला रोजगार मिळतो. जिल्ह्यातील डहाणू,तलासरी, जव्हार,मोखाडा,विक्रमगड, वाडा या तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबे उन्हाळ्यातील आठ महिने रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करत असतात तर उर्वरित चार महिने आपल्या मूळगावी परतून शेती,मजुरी करतात.पावसाळ्यात शेतीची कामे संपल्यानंतर गांव परिसरातील माळरानावर उगविलेले गवत विक्रीतून प्रति दिवस, ३०० ते ५०० रु. कमवतात. या हंगामात कुठेही रोजगार उपलब्ध नसताना हजारो…

Read More