Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, मंत्रिमंडळाचे घोडं अखेर गंगेत न्हालं, नव्या मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी पार पडला.आज एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली,त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.पण या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ भाजपच ” सबकुछ,” अशी स्थिती होती.गणेश नाईक व पंकजा मुंडे या दोघांचे प्रदीर्घ वनवासानंतर पुन्हा एकदा पुनर्वसन झाले.मात्र भाजपच्या गोतावळ्यात सुधीर मुनगुंटीवार व रविंद्र चव्हाण मात्र पाहायला मिळाले नाहीत.त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.पण सुधीर मुनगुंटीवार यांना नारळ देण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सुरुवातीला भाजपच्या १५ जणांना मंत्रिपदे मिळणार,असे ठरले असताना ती संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली व अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.शिंदे गटाचे अब्दुल सत्तार,दीपक…

Read More

संजय लांडगे,वाडा शहर, जळलेल्या भाताच्या भाऱ्यांची आमदारांनी केली पाहणी, वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्याच्या उडव्यांना अज्ञाताने आग लावण्याची घटना काल घडली होती.या घटनेची माहिती आ.शांताराम मोरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.मात्र पंचनामा करण्यासाठी जागेवर कुठलाही अधिकारी पोहोचला नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. जामघर येथे शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताची भारे रचून ठेवण्यात आले होते.अज्ञात इसमाने पाचशेहून अधिक भारे जाळले होते.या घटनेमध्ये किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.आज आ.शांताराम मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.मात्र दोन दिवसांपासून घटनास्थळी एकही अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी…

Read More

संजय लांडगे, वाडा येथे महिलांसाठी कर्करोग तपासणी व निदान शिबीर संपन्न, रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाऊन सीलॅण्ड,डॉ. कॅप्टन रितू बियानी ( संस्थापक कर्करोग संस्था, पुणे) व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथे आज परिसरातील महिला वर्गासाठी मोफत कर्करोग तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात महिला वर्गामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.याबाबत महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळून या गंभीर आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.कर्करोगाचे वेळेत निदान होणे आणि योग्य उपचार पद्धती घेणे,अशी दक्षता घेतल्यास या दुर्धर आजारावर मात करणे, सहजशक्य आहे. महिलावर्गामध्ये हेच प्रबोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू आणि ज्येष्ठ…

Read More

सुधीर केदारे,इगतपुरी, कै.मधुकरराव पिचड ; आदिवासी विकासाचे शिल्पकार कै.मधुकरराव पिचड यांना आपल्यातून जाऊन १० दिवस झाले असले तरी त्यांचे कार्य, विचार,आणि योगदान यांचा ठसा समाजावर सदैव कायम राहील.पिचड हे केवळ राजकारणी नव्हते तर ते समाजसेवेचे प्रतिक होते. त्यांनी आयुष्यभरात आदिवासी,गोरगरीब,आणि वंचित घटकांसाठी झटून कार्य केले. मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्राच्या माजी आदिवासी विकासमंत्री म्हणून राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले.त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला नवी दिशा मिळाली आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला. त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करताना आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेटला मंजुरी मिळवली. आदिवासी समाजाच्या गरजा आणि प्रगतीची कवाडे उघडली गेली.ज्यामुळे अनेक विकासप्रकल्प राबवणे शक्य झाले. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” एकनाथ शिंदे यांची खरोखर दया येते हो …. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर आता त्यांचा मुक्कामही ” वर्षा,” या सरकारी निवासस्थानाहून ” मुक्तागिरी,” या बंगल्यात हलवण्यात आला आहे.नियमाप्रमाणे त्यांना ते निवासस्थान सोडावे लागणारच होते,काल त्यांचे सामान हलवण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांशी खूप जवळीक साधली होती.ते उठसूठ दिल्लीला जात असत.मोदी व शहा हे दोघे मुंबईत आले की हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत असत.त्यांच्या या प्रेमाने शिंदेही गहिवरून जात असायचे.पण त्या बिचाऱ्या शिंदेंना कुठे माहीत होते की हे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्याची वाटचाल अधोगतीच्या दिशेने… आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.कोणाला संधी व कोणाला डच्चू मिळणार ? याविषयी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.१५.१२.८ असे सूत्र ठरले असून महायुतीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना मान्य आहे. आज नागपूर येथे राजभवनावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन वाईट घटनांचे सावट पडले आहे.परभणी येथे भारतीय संविधानाचा झालेला अपमान व त्यानंतर झालेली दंगल,तसेच बीड येथे सरपंच संतोष देशमुख,या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे झालेली हत्या.या हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे हे वाचवत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.या दोन्ही घटनांना आता जातीय राजकारणाचा रंग देण्यात येत आहे.संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येबाबत स्थानिक आ.सुरेश धस यांनी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आर्टिस्ट कॅम्पचे यशस्वी आयोजन, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कला अकादमीतर्फे महापालिकेच्या कलाशिक्षक व ख्यातनाम चित्रकारांच्या सहकार्याने जव्हार व परिसरात ११ ते १४ डिसेंबर २०२४ अश्या चार दिवसांचा भव्य आर्टिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पच्या माध्यमातून स्थानिक वारसा,ग्रामीण सौंदर्य,तसेच आदिवासी जीवनशैलीला कला माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे आणि अजय वाणी यांनी भेट देऊन कलाशिक्षक व चित्रकारांनी साकारलेल्या कलाकृतींची पाहणी केली. जय विलास पॅलेस,हनुमान पॉइंट,शिरपामाळ,जव्हार बाजार,के.व्ही.हायस्कूल व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार,तसेच वारली चित्रशैलीतील विविध कलाकृतींनी या कॅम्पची शोभा वाढवली.पाहणीदरम्यान उपशिक्षणाधिकाऱ्यांनी कलाकारांचे कौतुक केले.या कॅम्पमध्ये स्थानिक वारली कलाकार…

Read More

संजय लांडगे, वाडा शहर, वाडा येथे भाताच्या भाऱ्यांना अज्ञात व्यक्तीने लावली आग, वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्यांना अज्ञात इसमाने आग लावण्याची घटना आज दुपारच्या सुमारात घडली आहे. या घटनेत पाचशेच्यावर भाताचे भारे जळून खाक झाले.किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे लाखो रु.चे नुकसान झाले आहे.याबाबत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना पंचनामा करण्यासाठी कळवण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.या तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भात शेतीचा व्यवसाय करत असतात. वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे शेतकरी भात लागवड करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात.आज दुपारी अज्ञात इसमाने भाताचे…

Read More

दीपक मोहिते, वाढवण ग्रीनफिल्ड महामार्ग ; भूसंपादनाच्या मोजणीवेळी धारकांनी उपस्थित राहावे, प्रकल्प व्यवस्थापक,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना इकाई,पनवेल या भूसंपादन संस्थेतर्फे वाढवण बंदर प्रकल्पाच्या डहाणू तालुक्यातील प्राप्त झालेल्या भूसंपादन प्रस्तावानुसार सक्षम प्राधिकारी ग्रीनफील्ड महामार्ग ( वाढवण बंदर प्रकल्प ) तथा उपजिल्हाधिकारी ( भुसंपादन ),सुर्या प्रकल्प डहाणू यांच्यातर्फे भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.याबाबत उपअधीक्षक भूमि अभिलेख,डहाणू,यांच्या कार्यालयाकडून संपादनात येणाऱ्या मालमत्तेची ( जमिन, झाडे,बांधकामे,विहीर व बोअरवेल इ.) संयुक्त मोजणीची कार्यवाही करण्यात येणार असून सर्व संबंधितांना त्यांच्या अखेरच्या ज्ञात पत्त्यावर मोजणी नोटीसा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.तसेच नोटीसा न मिळाल्यास याव्दारे सर्व संबंधीत धारक व लगत धारक यांना संयुक्त मोजणीवेळी हजर राहणे बाबत सुचित…

Read More

वसंत भोईर,वाडा ग्रामीण, शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी तलाठ्यातर्फे सातबारावर नोंद करून देण्याची मागणी, शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी धान ( भात,नागली ) खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते.ही नोंदणी करताना संबंधित शेतकऱ्याने ई – पीक पाहणी करून घेणे, आवश्यक असते.मात्र अनेक शेतकऱ्यांची मोबाइलद्वारे केली जाणारी ई – पीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे होवू शकलेली नाही,तर मोबाईलला अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने काही शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी होवू शकली नाही.अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर तलाठ्यांतर्फे पीक पाहणी नोंद करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून याविषयी राष्ट्रवादीचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी मागण्याचे निवेदन वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना…

Read More