- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
तलासरी प्रतिनिधी, तलासरी भागात बिबट्याचा दोघांवर हल्ला, तलासरी भागात बोर्डी वनविभागाच्या हद्दीत बिबट्याने हल्ल्यात दोन जण जखमी झाले.त्यांना तात्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील बलसाड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची खबर लागताच तलासरी पोलीस आणि बोर्डी वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटना स्थळी पोहोचले. आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेतात पाला गोळा करण्यास गेलेल्या गुलाब मधुकर वरठा,रा.करजगांव, मानपाडा येथे राहणाऱ्या महिलेवर बिबट्याने अचानक मागून हल्ला केला.यावेळी प्रसंगावधान राखून त्या महिलेने हल्ला परतवून लावला आणि आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्या पळून गेला.यात महिलेच्या पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापत झाली.याघटनेनंतर थोड्याच वेळात बिबट्याने धामणगाव आपटोलपाडा येथे आपल्या वाडीत काम करणाऱ्या राज्या काकड्या…
दिपक मोहिते, रयतेची निव्वळ फसवणूक, देवाभाऊ,” अजब तुझे सरकार,” राज्य सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्या संदर्भात प्रत्येक विभागाचा लेखाजोगा मांडला आहे.अनेक विभागाने पैकीच्या पैकी गुण मिळवत बाजी मारली आहे.आपण या लेखाजोगात पहिल्या पाच क्रमांकावर विराजमान झालेल्या पाच विभागावर बोलणार आहोत.हे पाच विभाग कोणते आहेत,याची सर्वप्रथम माहिती घेऊ या.. महिला व बालकल्याण,सार्वजनिक बांधकाम,कृषी,परिवहन व मत्स्य व बंदरे,असे ते पाच विभाग आहेत.या पाच विभागाची गेल्या १०० दिवसात कामगिरी कशी होती ? यावर एक प्रकाशझोत…. १ ) महिला व बालकल्याण – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवत तत्कालीन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली.( प्रत्येक महिलेला दरमहा १५००/- रु. ) त्यामुळे निवडणुकीत…
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना- आकाश छाजेड, काल केंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला त्याचे संपूर्ण श्रेय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आहे.गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी,यासाठी प्रयत्नशील होते.देशांमध्ये जातीची लोकसंख्या त्याच्या तुलनेत भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी लढाई लढली. देशातील वंचित घटक व सुशिक्षितांसाठी राहुल गांधींनी हा लढाई लढली.जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती.या राहुल गांधींच्या लढ्याला काल यश मिळाले म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जाते,असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे…
जव्हार प्रतिनिधी, आदिवासी क्रांतिकारक चौक येथे अभिवादन कार्यक्रम, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज युवा आदिवासी संघाच्या वतीने विक्रमगड येथील आदिवासी क्रांतिकारक चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राघोजी भांगरे यांच्या बलिदानाचे स्मरण करून युवा पिढीने त्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती सुरेश कोरडा, जामसर ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल थेतले,युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष राजू भोये,माजी अध्यक्ष हेमंत घेगड व मनोज कामडी,का यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने…
दीपक मोहिते, भाजपवाल्याना राष्ट्रहितापेक्षा पक्षीय हित मोठे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या मिडियाने दोन देशात आता युद्धाला तोंड फुटणार,मोदी प्रत्येक दहशतवाद्याला हुडकून ठोकणार,पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे,अशा बातम्या पेरल्या.पण त्याचवेळी पाकिस्तानची आर्मी आपल्या टेहळणी चौक्यावर बेछूट गोळीबार करत होती. आपणही सारे लवकरच युद्ध सुरु होईल,अशी अपेक्षा बाळगून होतो.या घटनेला अकरा दिवस उलटल्यानंतरही आपल्या तपास यंत्रणाना अद्याप त्या पाच नराधमांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही.हे आपल्या तपास यंत्रणा तसेच लष्कराचे अपयशच म्हणावे लागेल.पूर्वी दोन देशात युद्ध सुरू करणे,सहजशक्य होत असे.आता तशी स्थिती नाही.कारण काही किरकोळ अपवाद वगळता प्रत्येक देश आता अन्वस्त्रधारी देश बनला आहे.त्यामुळे युद्ध होणे,आजच्या घडीला कोणालाही परवडणारे नाही.पाकिस्तानला बेचिराख करण्याची…
दीपक मोहिते, मिडिया/सोशल मीडिया, ” शाप की वरदान ?, ” चार महिन्यापूर्वी निवडणुकीची धामधूम आता थांबली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील,हे सांगणे आता ब्रम्हदेवालाही शक्य नाही.चार महिन्यापूर्वी सोशल मिडियावर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील निवडणुकापर्यंत आग ओकणार नाहीत.एकमेकांच्या उखाळ्या- पाखाळ्या ऐकण्यात महिना कधी निघून गेला,ते कळलेही नाही. या निवडणुकीत सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले.निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया,हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते स्विकारलेही आहे.पूर्वी पक्षांची मुख्यालये,ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत,आता त्याची जागा सोशल मीडियाच्या वॉररुमने घेतली आहे.या वॉररूम्स आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत. ” होत्याचे नव्हते व नव्हत्याचे…
सुरेश वैद्य,पालघर, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उदघाटन, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी,याकरिता जिल्हास्तरावर ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,” स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा.डॉ.हेमंत सवरा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२…
संजय लांडगे,वाडा वाडा एसटी आगारात पाणपोईची सोय, वाडा बस आगाऱात असलेली पाणपोई नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.याविषयी माध्यमामध्ये वृत्त झळकल्यानंतर त्याची दखल चार्मोद्याग कामगार सेनेचे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड यांनी घेतली.जगदंबा कंपनीचे मालक मालपाणी यांच्याकडून वॉटर कूलर आरो सिस्टम उपलब्ध करून दिला. या पाणपोईमुळे नागरिक व प्रवाश्यांना २४ तास थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे. आज कामगार दिनाचे औचित्या साधून पाणपोईचे लोकार्पण जगदंबा कंपनीचे व्यवस्थापक सुशील तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.या यावेळी वाडा आगाराचे कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मनिष धानू,डहाणू महाराष्ट्र दिनी ५ लाख सीड बोल्स निर्मितीचा संकल्प, महाराष्ट्र दिनानिमित्त ” पर्यावरण वाचवा,” वसुंधरा सजवा,” या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात नवीन प्रयोगाला सुरूवात झाली आहे.या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते,खासदार डॉ.हेमंत सवरा,जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.विजेत्यांना प्रशस्तीपत्रासह ” सीड बॉलचा डबा,” देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,संगीता भागवत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये चर्चेत येणारे नाव म्हणजे ” सीडबॉल मॅन,” दीपक देसले यांचे.जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा, कोसबाड ( ता. डहाणू )…
संजय लांडगे,वाडा वाड्यात अक्षय तृतीया निमित्त आयोजित शिवजयंती उत्साहात साजरी, शिवसेना ( उबाठा ) वाडा शाखेतर्फे अशोकगड येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शिवपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवचरित्राचा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचवणे, त्यांचे विचार,त्यांचा इतिहास प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असल्याचे मत ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले. स्व.धर्मवीर आनंद दिघे यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा चालू केली.वाडा शहर शाखेतर्फे दरवर्षी ती उत्साहात साजरी केली जाते. ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष…
