- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जिल्हा परिषद/ पंचायत समिती,रणसंग्राम – मोखाडा तालुका, मोखाडा तालुका ; स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही विकासाच्या प्रतिक्षेत… मोखाडा तालुका हा अतिग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात अनु.जमाती समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे तालुक्याला आदिवासी दर्जा मिळाला आहे.नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्यानंतरही या तालुक्याचा मागासलेपणा आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.या तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय भातशेती असून या व्यवसायावर हजारो आदिवासी कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवतात.या तालुक्याच्या विकासासाठी वर्षाकाठी शेकडो कोटी रु.देण्यात येतात,पण राजकीय मंडळी व नोकरशाही त्याचा फडशा पाडतात.तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत तो पैसा पोहोचत नाही.त्यामुळे स्थानिक आदिवासी भूमिपुत्र आजही उपेक्षित जीवन जगत आहे. हा तालुका पालघर व नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर वसला आहे.विकासाचे अनेक…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१९, प्रभाग क्र.१९ ; परप्रांतीयांना आंदण, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा प्रभाग गेली अनेक वर्षे विकासाच्या बाबतीत कायम मागासलेलाच आहे.त्यामुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांचे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.या प्रभागाची ओळख ” बकाल,” अशी करण्यामध्ये या दोघांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली.अनेक परप्रांतीय गुंडांनी या परिसराचे अक्षरशः लचके तोडले तर मनपा अधिकाऱ्यांनी आपल्या सात पिढ्या बसून खातील,इतका रग्गड पैसा कमावला.वसईच्या विकासाचा कसा सत्यानाश केला जातो,हे या प्रभागावरून स्पष्ट होऊ शकते. वन,आदिवासी व सरकारी जमिनी,गुंड व नोकरशाही हातात हात घालून कसे लुटतात,हे या प्रभागात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पाहता आपल्या लक्षात येते.तोडण्यात आलेली अनधिकृत…
दीपक मोहिते, बदल हवा,पण तो व्यवस्थेला मारक असता कामा नये, बातम्याचे हेडिंग वाचकांच्या मनाला भावेल,असे करणे,ही पण एक कला आहे,पूर्वीची जुनी माणसे यामध्ये तरबेज होती.काळ जसजसा बदलत गेला,तसे सारं काही बदलत गेले.पूर्वी पत्रकारितेला “” आदर्श पत्रकारिता,” असे गोंडस नांव होते,हल्ली त्या पत्रकारीतेचे बारसं होऊन ” गोदी मिडिया,” असे नामकरण झाले आहे. ” बदल ही काळाची गरज असते.” असे म्हंटले जाते,पण हा बदल आता लोकशाही व्यवस्थेला मारक ठरणारा आहे,हे आपण विसरत चाललो आहोत. जयंतराव साळगावकर आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे एकाच दिवशी निधन झाले ( अर्थात एक नैसर्गिक आणि दुसरे आपण जाणतोच ) दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये हेडिंग,काळ निर्णय आणि काळ निर्दय काही…
दीपक मोहिते, नको ती महानगरपालिका,नको ती निवडणूक, आमच्या नशिबी हे दुष्टचक्र कशासाठी – करदात्यांचा आक्रोश, गेले अठरा दिवस आपले news27.in media वसई तालुका व पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती,महानगरपालिकाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचाली,प्रभागनिहाय विकासकामे,तसेच लोकप्रतिनिधींची निष्क्रियता व अधिकारी वर्गाचा खादाडपणा याविषयी सविस्तर विवेचन करत आहे.मनपाच्या एकूण २९ प्रभागांपैकी १८ प्रभाग तर जिल्हा परिषदेच्या ५७ गटापैकी ४६ गट आपण प्रसिद्ध केले असुन उर्वरीत प्रभाग व गट येत्या दहा दिवसांत पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी आपण गेल्या चार ते पाच दिवस प्रभाग व गटात फेरफटका मारून या दोन्ही निवडणूकासंदर्भात मतदारांच्या राजकीय पक्षाकडून काय अपेक्षा आहेत ? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.जवळपास…
दीपक मोहिते, विरार,वसई व नालासोपारा पश्चिम भागातील अनधिकृत इमारतीवरही कारवाई करा… वीस दिवसांपूर्वी विरार पूर्व भागात इमारत कोसळून १९ रहिवासी मृत्यूमुखी पडल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले व अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेला चांगलाच वेग आला. गेल्या वीस दिवसात प्रशासनाने लाखो फुटाचे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. पूर्व भागातील चाळमाफियाची बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत, तालुक्याच्या पश्चिम भागात ज्या बिल्डर्सनी अतिरिक्त अनधिकृत मजले आपल्या इमारतीवर बांधले आहेत, त्यावर मात्र निष्कासनाची कारवाई करण्यात येत नाही. या अशा अनधिकृत मजल्यांची सखोल चौकशी व्हावी,व या बिल्डर्सवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आले…
वसंत भोईर,वाडा गारगाई पाणी प्रकल्पासाठी तानसा अभयारण्यातील साडेचार लाख झाडांची कत्तल, मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे.या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन विस्थापित होणाऱ्या एक हजाराहून अधिक कुटुंबियांनाही सद्यस्थितीत असलेल्या घरबाव जमिनीची किंमत,फळझाडे व जमिनीची किंमत किती द्यायची हे निश्चित करण्यात आले आहे.मात्र या प्रकल्पासाठी या परिसरातील जंगल व अभयारण्यातील सुमारे साडेचार लाख झाडांवर कु-हाड चालवली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांत जागा खरेदी करुन त्याठिकाणी तिप्पट झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे. वाडा तालुक्याचा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे.या प्रकल्पासाठी…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद/ पंचायत समिती,रणसंग्राम,वाडा तालुका, वाड्याचा गड महायुती राखणार… २००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत वाडा तालुक्याचा काही भाग भिवंडी तालुक्याला जोडला गेला.त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाले.सध्या या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ०६ गट आहेत तर पंचायत समितीचे १२ गण आहेत. वाडा तालुका हा कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात आहे.तसेच भातपिकासोबत नागली व रब्बी हंगामात विविध पिके घेण्यात येत असतात.८० ते ९० % भूमिपुत्र शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने औद्योगिकरणाला चालना दिली,त्यानंतर काही गावात ” डी,” झोन अस्तित्वात आले.पण कामगार संघटनांचा…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१८, प्रभाग क्र.१८ हा सर्वात गलिच्छ प्रभाग,प्रचंड प्रमाणात अनधिकृत चाळींचे सुळसुळाट, या प्रभागात केवळ आणि केवळ अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट असल्याचे पाहायला मिळते.हे जे अनधिकृत बांधकामाचे अमाप पीक आले आहे,त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींची ” अर्थपूर्ण निष्क्रियता,” जबाबदार आहे.या अशा प्रभागात स्थानिक भूमिपुत्र अल्पसंख्यांक होत गेला तर मुस्लिम व उत्तर भारतीय समाज बहुसंख्यांक झाला आहे.या लोकांनी वन,आरक्षित जमिनीवर सरसकट अनधिकृत चाळी उभारण्यात आल्या.त्यामुळे प्रभागाला बकाल स्वरूप आले आहे.रस्ते व गटारे नसताना चाळमाफियांनी सरसकट चाळी बांधल्या.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अनधिकृत बांधकामांना वीज व पाणी या दोन्ही नागरी सुविधा उपलब्ध होत गेल्या.यावरून या महानगरपालिका व महावितरण विभागात भ्रष्टाचाराची पाळमुळे…
वाडा प्रतिनिधी, हजारो गरीब कुटुंबे मोफत योजनांपासून वंचित गेल्या १८ वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे न झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी,ग्रामीण आणि दुर्गम भागात अंत्यत हलाखीचे जीवन जगत असलेल्या हजारो कुटुंबियांना त्याचा फटका बसला आहे.१८ वर्षापुर्वी दारिद्र्य रेषेखालील यादीत नावे नसल्याने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत नाही, तर या यादीतील काही कुटुंबे,आज जी कुटुंबे सधन झाली असुन ते अद्याप शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. २००७ साली शासनातर्फे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला होता.यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेल्या वाडा, जव्हार,विक्रमगड,मोखाडा या चार तालुक्यात ६५ हजाराहुन अधिक कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत होते.गेल्या १६ वर्षात या ६५…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१७, बहुजन विकास आघाडीसमोर प्रभाग टिकवण्याचे मोठे आव्हान, नालासोपारा शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पसरलेल्या या प्रभागात गेल्या पंधरा वर्षात असंख्य लोडबेअरिंग इमारती ( अनधिकृत ) उभ्या राहिल्या,त्या कोणी बांधल्या ? या अनधिकृत इमारतींना वीज व पाणी कसे मिळाले ? त्याबदल्यात महानगरपालिकेला घरपट्टीच्या स्वरूपात किती महसूल मिळाला ? व या प्रभागात असंख्य इमारतींना शास्ती का लावण्यात आल्या नाहीत,इ.प्रश्न गेली अनेक वर्षे अनुत्तरितच आहेत आणि त्याची उत्तरे पुढेही मिळणार नाहीत.कारण या गोरखधंद्यात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व अधिकारी आखंड बुडाले आहेत.महानगरपालिकेचे पाणी काही लोकप्रतिनीधीच कसे विकतात ? याविषयीचे मजेदार किस्से या प्रभागात ऐकायला मिळतात. असो,या…
