- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
- पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक प्रक्रिया वेगात सुरु,
- पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार,
- जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली,
- वसई – विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांचा धावता दौरा,
Author: दीपक मोहिते
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” वर्ष उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल नाही ; ” ये रे माझ्या मागल्या,” सुरूच, लोकसभा निवडणुका होऊन आता सव्वा वर्ष तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २४ नोव्हे.२०२४ रोजी लागला.या वर्षभराच्या काळात लोकांच्या आशा – अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या का ? त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न मार्गी लागले का ? त्यांना दिलासा मिळाला का ? या तिन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते.नव्याने निवडून आलेले खासदार व आमदार यांचे सध्या केवळ इव्हेंटस सुरू आहेत. डहाणूचे आ.कॉ.विनोद निकोले व विक्रमगडचे हरिश्चंद्र भोये हे दोन आमदार वगळता…
वाडा प्रतिनिधी, वाड्यातील नागरिकांची स्वदेशी पणत्यांना पहिली पसंती दिवाळी हा सण गेल्या सोम.पासून सुरु झाला आहे.दिवाळीच्या सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून दिवाळी हा सण प्रकाशाचा व तेजाचा सण समजला जातो. प्रथा-परंपरेनुसार वसूबारस ते भाऊबीजेपर्य॔त दिवाळी सण साजरा होत असतो.या दरम्यान प्रत्येक घरात पणत्या लावून आवर्जून रोषणाई केली जाते.दिवाळी सणानिमित्ताने कुडूस बाजारपेठेत पणत्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या असून नागरिकांनी खरेदी करत असतांना स्वदेशी पणत्यांनाच पसंती दिली आहे. सध्याच्या युगात वीजेवर चालणारी इतकी साधने असतांनाही दिवाळीत आपण पणत्या आवर्जून लावत असतो.कारण विजेच्या दिव्यात आपल्या तेजाने दुस-या दिव्याला प्रकाशित करण्याची शक्ती नाही.जी सामान्य पणतीच्या ज्योतीत आहे.एका पणतीची ज्योत हव्या तितक्या इतर पणत्यांना प्रकाशित…
जव्हार प्रतिनिधी, दिवाळी फराळ व घरगुती साहित्य विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद. जव्हार तालुक्यातील ग्रामीण महिला स्वावलंबनाचा सुगंध पसरवत आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) आणि पंचायत समिती जव्हार तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांनी पंचायत समिती आवारात आकर्षक ” दिवाळी महोत्सव स्टॉल प्रदर्शन,” भरवले आहे.या ठिकाणी जव्हार तालुक्यातील एकूण १० महिला बचत गट सहभागी झाले असून,पारंपरिक दिवाळी फराळ,बांबू,आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या,सुगंधित अगरबत्ती,रांगोळी,झाडू, साड्या,तोरण अशा अनेक घरगुती व उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.या सर्व वस्तू महिलांनी घरगुती पद्धतीने प्रेमाने तयार केल्या असून,त्यांच्या दर्जेदार व पारंपरिक स्वादामुळे ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्यावतीने…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास आघाडी सोबत जाणे,बहुजन विकास आघाडीला परवडणारे नाही, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.पालघर जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष बहुजन विकास आघाडीला सोबत घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.अशाप्रकारचा निर्णय झाल्यास त्यातून काय व कशाप्रकारचे आउटपुट मिळेल,हे आजच्या घडीला सांगता येणार नाही.पण असा निर्णय झाल्यास बहुजन विकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता मात्र अधिक आहे. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आ.हितेंद्र ठाकूर या दोघांचे एकमेकांशी किती सख्य आहे,हे जगजाहीर आहे.अशा परिस्थितीत त्यांची होणारी आघाडी या निवडणुकीत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य निवडणूक आयोगाची बैठक ; काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजलं असून सारे राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.मतदारयादीतील गैरप्रकार प्रकरणी निवडणूक आयोग सध्या अडचणीत आले आहे.विरोधी पक्षाने या प्रश्नी दाखवलेली एकजूट ही प्रशंसनीय ठरली आहे.स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथमच निवडणूक आयोगाच्या कारभारावर काळे ढग जमल्याचे पाहायला मिळाले.विरोधकांच्या रेट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला नमते घेत काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घ्यावी लागली.या बैठकीत काही प्रमुख नेत्यानी मतदारयादीतील अनेक गैरप्रकाराकडे आयोगाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.पण या बैठकीतून चांगले काही निष्पन्न होईल,असे वाटत नाही. एकेकाळी तत्कालीन निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन यांनी आपल्या निष्पक्ष कारभाराने जगाचे लक्ष वेधून घेतले होते,तोच…
तलासरी प्रतिनिधी, विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी – प्रा.डॉ.राजपूत, आदिवासी प्रगती मंडळ संचालित,कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ग्रंथालय व माहितीशास्र विभागाअंतर्गत, भारतरत्न माजी राष्ट्रपती.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ” वाचन प्रेरणा दिन, ” म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्व कळावे,या हेतूने दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.त्यासाठी आज येथे या वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी आपल्या मनोगतात अतिशय प्रतिकूल परीस्थितीत स्वप्नांचा पाठलाग करत ध्येय कसे गाठावे,यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होय.त्यांनी यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश…
वसंत भोईर,वाडा भाताचे भारे बांधण्याच्या बंध विक्रीतून मिळतोय आदिवासींना रोजगार, शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध ( बांबूपासून तयार केलेला दोर ) विक्रीतून अनेक आदिवासी कुटुंबियांना किमान दोन महिने चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबांचे उपजिविकेचे हे एक साधन बनले आहे. भात कापणी हंगामाला सुरुवात झाल्याने येथील आदिवासींचा बंध विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे,तर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर भाताचे नुकसान केल्याने अनेक शेतकऱ्यांनी बंधचा वापर केला नव्हता.यंदा मात्र भात पिकाचे चांगले उत्पन्न आल्याने भारे बांधण्यासाठी बंधची मागणी वाढली आहे. बहुतांश शेतकरी ५०० ते १००० बंध खरेदी करतात. त्यामुळे वाडा,विक्रमगड तालुक्यातील शेकडो आदिवासींना चालू वर्षी चांगला…
वसंत भोईर, वाडा दिवसभर काम,पण मिळेना पगार…किती दिवस बिनपगारी राबणार ? ग्रामपंचायत स्तरावर महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकीत राहिल्याने सेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने जरी मासिक आठ हजार रु.मानधन व दोन हजार रु.प्रवास व प्रोत्साहन भत्ता जाहीर केला असला,तरी प्रत्यक्षात अनेकांना हे मानधन अद्याप मिळालेले नाही. परिणामी,ग्रामरोजगार सेवक बिनपगारी काम करीत आहेत. ग्रामरोजगार सेवक हे ग्रामपंचायतीचे समन्वयक म्हणून काम करतात.वैयक्तिक लाभाच्या योजनापासून ते सार्वजनिक कामांच्या लेखाजोख्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. हे अर्धवेळ काम असले तरी प्रत्यक्षात त्यांना दिवसभर पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागते. दरम्यान,महिनो महिने मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी त्यांच्यापुढे…
दीपक मोहिते, ” राजकीय उलथापालथी,” बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते फोडण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात पक्ष सोडणे व दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे,या अशा अवैध प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे.कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुका जिंकायच्याच,या इर्षेने पेटलेल्या भाजपने महायुती सरकारमधील घटक पक्षासह इतर राजकीय फोडण्याचे जोरदार सत्र आरंभले आहे.त्यांच्या या उलाढालीला इतर पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चांगलेच बळ मिळत आहे.एकीकडे भाजप,आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना दुसरीकडे इतर पक्ष मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.वसई तालुक्यात भाजपने गेल्या तीन महिन्यापासून बहुजन विकास आघाडीला चांगलेच लक्ष्य केले आहे.या काळात त्यांच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी…
वसंत भोईर, वाडा ग्रामस्थानी तब्बल तीन तास रोखला खानिवली- कंचाड रस्ता, वाडा तालुक्यातील खानिवली – कंचाड रस्त्याची पूर्ण वाताहात होऊन ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा व अवजड वाहतूक बंद करा या मागणीसाठी काल देवळी फाटा येथे ग्रामस्थांनी रोको आंदोलन केले. दरम्यान वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. खानिवली – कंचाड या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघात वाढले असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे.तत्पूर्वी अनेक वेळा अर्ज विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आज अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी…
