Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” निवडणूक विश्लेषण,” भाग क्र.२, संघाचे निवडणुकीत सक्रिय होणे,भाजपच्या पथ्यावर.. या निवडणुकीत मोदी फॅक्टर,नसताना भाजपने एवढे मताधिक्य कसे मिळवले ? याप्रश्नावर नजर टाकली असता,संघ अदृश्यपणे मोलाची कामगिरी करत होता,हे आपल्या लक्षात येईल.त्यांच्या ब्रह्मास्त्रापुढे मराठा व ओबीसी फॅक्टर देखील निष्प्रभ ठरले.गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात मराठा फॅक्टर प्रभावी ठरला होता.तो या निवडणुकीत पूर्णतः निष्प्रभ ठरला.ओबीसी फॅक्टर ही फारसा चलनात आला नाही.या दोन्ही समाजाचे ध्रुवीकरण करण्यात संघ यशस्वी ठरला.या निवडणुकीत संघाने महायुतीच्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले.त्यांच्या या आदेशाचे महायुतीच्या नेत्यांनी तंतोतंत पालन केले व जरांगे पाटील यांचे खच्चीकरण झाले.पूर्वी अंतरवाली सराटी गावात पत्रकारांची तोबा गर्दी होत…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण, भाग क्र.१ आपला मतदार क्षणिक आर्थिक लाभात आनंद मानणारा… विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून सर्वसामान्य मतदार देखील चक्रावून गेले आहेत.हा जो निकाल लागला आहे,त्याला लाट म्हणता येणार नाही,तर त्सुनामीच म्हणावे लागेल.कारण या त्सुनामीने लोकशाही पद्धतीच्या राजकारणाचा पायाच मुळासकट उध्वस्त करून टाकला आहे.आजवर राज्याच्या इतिहासात अशाप्रकारचे राक्षसी बहुमत व विरोधकांचे शिरकाण कधीच पहायला मिळाले नाही.विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षात घेता,त्यांना साधे विरोधी पक्षनेतेपद मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. या वावटळीत अनेक जुने वृक्ष उन्मळून पडले.सत्ताधारी महायुतीने अशी कोणती जादू केली की मतदारांनी त्यांना भरभरून मते दिली.लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रु.देण्याची योजना फलदायी ठरली का ? २ कोटी लाभार्थी…

Read More

दीपक मोहिते, अत्यंत विस्मयजनक निकाल, २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले,या निकालाने उभ्या महाराष्ट्राला अक्षरशः धक्का बसला.असा एकतर्फी निकाल कसा काय लागू शकतो,यावर दिवसभर लोकांमध्ये चर्चा सुरू होती.या निकालामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असावे,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात,आ.बच्चू कडू,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,आ.वैभव नाईक,आ.रोहिणी खडसे व दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले. राज्य विधानसभेत महायुती – २२८,महाविकास आघाडीच – ५६ व इतर ०५ असे बलाबल निर्माण झाले आहे.मुंबईसह कोकण विदर्भ,प.महाराष्ट्र,उ.,महाराष्ट्र,मराठवाडा या सहाही महसूल विभागात महायुतीने या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.” लाडकी बहीण योजना,” महायुतीला फलदायी ठरली…

Read More

दीपक मोहिते, ” रणसंग्राम इतिश्री,” एक अभ्यासपूर्ण लेख,” राज्यातील प्रमुख लढती ; ” कौन बनेंगे,मुकद्दरके सिकंदर ? ” उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे,अनेक उमेदवारांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे.निकालाची वेळ अवघ्या अठरा तासावर येऊन ठेपली आहे.अनेक उमेदवारांनी नवस केले आहेत,तर अनेक उमेदवार मंदिराच्या फेऱ्या मारत आहेत.अशावेळी या निवडणुकीत आघाडी व युतीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे वृत्त धडकल्यामुळे उमेदवार भितीच्या सावटाखाली आले आहेत.महाविकास आघाडीने आपल्या सर्व उमेदवारांना कर्नाटक राज्यात स्थलांतरित केले आहे.विधानसभा त्रिशंकू झाल्यास अपक्षांचा भाव तर वधारलेच पण खरेदी विक्रीचा घोडेबाजार देखील सुरू होईल.त्यामुळे महाविकास आघाडीने यावेळी धोका होऊ नये,यासाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे. चला तर आपण राज्यातील प्रमुख लढतीवर…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाइन,” सर्व्हे पोल हे एक थोतांड असून व “अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग असतो, निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थांचे गेल्या दोन दिवसापासून अक्षरशः पीक आले आहे.काही संस्था या राजकीय पक्षाकडून मलिदा घेऊन आपले अंदाज व्यक्त करत असतात.या संस्थांपैकी अनेक संस्था,विविध वृत्तसंस्थाशी संबंधित असतात व या सर्व संस्था संबंधित राजकीय पक्षांना अनुकूल ठरतील,असे अंदाज व्यक्त करतात,असा आजवरचा अनुभव आहे.त्याबदल्यात या संस्थांना काय मिळते ? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो.त्यांच्या या अंदाजाला काडीचाही आधार नसतो,पण मतदारांच्या मनात गोंधळ उडवून देणे,असा उद्देश असतो.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या संस्थानी सर्व्हे पोल जाहीर केले,ते तद्दन खोटे ठरले.त्यामुळे अशा…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक विश्लेषण,” वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला ? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीची मतमोजणी अवघ्या ३६ तासावर येऊन ठेपली आहे.या निवडणुकीच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली असून वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार ? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.पालघर जिल्ह्यात यंदा ६५.९५ % मतदान झाले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ % मतदान झाले होते.यंदा त्यामध्ये ४.९१ % ने वाढ झाली आहे.हे वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात जाईल,यावर राजकीय पक्षात चढाओढ आहे. २००९ पासून सलग झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा जागांपैकी सर्वाधिक जागा ( ३ ) जागा बहुजन विकास आघाडी जिंकत आली.तर १२९ विक्रमगड विधानसभा एकत्रित राष्ट्रवादी…

Read More

दीपक मोहिते, ” राज – का – रण,” ” आग लागल्याशिवाय धूर बाहेर पडत नाही,” भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसेवाटप करण्याच्या प्रकरणात भरारी अडकवण्यासाठी कट कारस्थान करणाऱ्या अज्ञात शक्ती कोण आहेत,याचा शोध घेण्यात यावा,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे.त्यामुळे हे प्रकरण त्यांच्याच नेत्यांनी घडवून आणल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.अशात आ.हितेंद्र ठाकूर यांनी मला अनेक फोन आले की विनोद तावडे ५ कोटी रु.घेवून विरार येथे येत आहेत. त्यामुळे पाळत ठेवून त्यांना आम्ही रंगेहाथ पकडले,असे माध्यमांना सांगितले.त्यामुळे सगळ्याच्या भुवया वर गेल्या आहेत.या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे,हे…

Read More

दीपक मोहिते, महाराष्ट्राची दशा आणि दिशा, काही किरकोळ अपवाद वगळता जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी, काल झालेल्या मतदानात टक्केवारी घसरल्यामुळे या निवडणुकीचा निकाल कसा लागेल,याविषयी सारे राजकीय पक्ष धास्तावले आहेत.त्यामुळे २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.सर्व्हे करणाऱ्या काही संस्थानी महायुती पुन्हा सत्तेत येईल,अशी शक्यता व्यक्त केली आहे,पण त्यामध्ये तथ्य नाही. मुंबई सारख्या शहरात मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे येथे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे गट व भाजप उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला.येथे भाजपचे संजय केळकर हे डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसून आले आहे.या मतदारसंघात शिवसेनेचे ( उबाठा ) राजन विचारे,बाजी मारण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे गटाचे प्रताप…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात एकुण ६५.९५ % मतदान, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार,कुठेही अनुचित घटना नाही, पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या ६ मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून एकूण ६५.९५ % इतके मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. काल सकाळी ७.०० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली.संध्याकाळी मतदानाची वेळसंपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान काळात कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व मतदारसंघात मतदान सुरळीतपणे पार पडले. सकाळी मतदानाच्या सुरुवातीस जवळपास सर्व मतदान केंद्रांवर तुरळक मतदार पाहायला मिळाले.दुपारी १.०० नंतर मतदारांच्या रांगा लागल्या व मतदानाला चांगलाच वेग आला. पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय अंदाजे मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

Read More

दीपक मोहिते, दु.३.०० वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यात ४६.८२ % मतदान, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ३.०० वाजेपर्यंत सरासरी ४६.८२ % मतदान झाले होते.आज अनेक मतदानकेंद्रातील ईव्हीएम मशीन संथगतीने काम करत होत्या,त्यामुळे मतदार रांगेत ताटकळत उभे होते.खूप विलंब झाल्यामुळे अनेक मतदार कंटाळून निघून गेले.त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली.दुपारी ३.०० वाजेपर्यंत १२८ डहाणू – ५३.०२ %,१२९ विक्रमगड – ४९.६ %, १३० पालघर – ४७.६३ %, १३१ बोईसर – ४७.३६ %, १३२ नालासोपारा – ४०.९६ % व १३३ वसई – ४७.६४ % मतदानाची नोंद झाली.सर्वाधिक मतदान हे १२८ डहाणू ( ५३.०२ % ) येथे झाले.तर सर्वात कमी मतदान १३२ नालासोपारा मतदारसंघात ( ४०.९६ %…

Read More