- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.२ ग्रामीण शिक्षण व्यवस्था, ग्रामीण भागातील जि.प.च्या प्राथमिक शाळा वाचवण्याचे नव्या सरकारपुढे मोठे आव्हान, राज्याचे शिक्षण विभाग,हे कायम निद्रावस्थेत असलेले पाहायला मिळते.गेल्या काही वर्षात या विभागाचा कारभार इतका सैरभैर झाला आहे,की ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था मोडीत निघते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यास अधिकारीवर्गाचा भ्रष्ट कारभार व लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत ठरली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात खाजगी शाळांचे वारेमाप पीक आले आहे.राज्य सरकारच्या या विभागाने खाजगी शिक्षण संस्थांना मुक्तहस्ते परवानग्या दिल्यामुळे खाजगी शाळा पावसाळ्यात रानात उगवणाऱ्या छत्र्यासारख्या उगवल्या.परिणामी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद हळूहळू मृत्युशय्येवर जाऊ लागल्या.आजच्या घडीला राज्यातील हजारो शाळांनी अखेरचा श्वास घेतला…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, महायुतीच्या सरकारचा शपथविधी ; घोडं अखेर गंगेत न्हालं.. तब्बल १२ दिवसानंतर आज अखेर तीन इंजिन सरकारचा शपथविधी आझाद मैदानात पार पडला.फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर चेहरा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.यावेळी उपस्थित असलेल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली असली तरी,या समारंभावर नाराजीची गडद छाया पडली होती.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर गंभीर चेहरा करून बसलेले पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते.भाजपला मिळालेल्या जागा लक्षात घेता मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार,हे नक्की होते.पण एकनाथ शिंदे त्यास तयार नव्हते.त्यांनी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१, ” शेतीसिंचन,” शेतीसिंचनासाठी पाणी ; नवनिर्वाचित खासदार व आमदारांनी सरकार दरबारी प्रयत्न करायला हवेत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या निवडणुकीत भाजपने वसई,नालासोपारा व विक्रमगड तर शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट ) पालघर व बोईसर,अशा एकूण पाच जागा जिंकल्या.सहावी डहाणूची जागा मात्र त्यांना जिंकता आली नाही.ही जागा मार्क्स.कम्यु.कडेच राहिली.या निवडणुकीतही भाजपला मार्क्स.कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या तलासरी तालुक्यात दमदार कामगिरी करता आली नाही.त्यामुळे ही जागा त्यांना जिंकता आली नाही. आता निवडणुका पार पडल्या असून भाजपने या जिल्ह्यावर आपली चांगली पकड निर्माण केली आहे.जिल्हापरिषद,अनेक पंचायत समित्या,नगरपरिषदा, नगरपंचायती महायुतीच्या ताब्यात आहेत.मात्र…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिच्चारे एकनाथ शिंदे,नियती कोणाला सोडत नाही,हेच खरं… काल सायंकाळी एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक सुधारली व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात बंड करताना ते सुरत – गोवामार्गे गुवाहातीला गेले होते.यावेळी तसं न करता हेलिकॉप्टरने थेट आपल्या ” दरे,” गावी निघून गेले.” जैसी करनी,वैसी भरनी,” चा एक एपिसोड येथे संपला. त्यांना जडलेला आजार हा राजकीय होता,की त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या.यावर सध्या उलटसुलट चर्चा होत आहे.असो,पण आज एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जाणे कितीला पडले,यावर राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.राजकरणात कोण कोणाचा नसतो,हे शिंदे यांनीच अडीच वर्षांपूर्वी…
दीपक मोहिते, ” रस्सीखेच,” पालघरचे पालकमंत्रीपद पुन्हाकडेच,रविंद्र चव्हाण यांची पुन्हा वर्णी लागणार… पालघरचे पालकमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग,अशा दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.पण आता नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे सोपवले जाणार आहे.त्यामुळे पालघरच्या पालकमंत्रीपदी रविंद्र चव्हाण यांना पुढे चाल मिळण्याची दाट शक्यता आहे.शिंदे गटाचे पालघरचे आ.राजेंद्र गावित हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत,पण जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकहाती जिंकणाऱ्या रविंद्र चव्हाण यांना पहिली पसंती मिळेल असे वाटते. पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांनी वरील दोन्ही जिल्ह्यात सरस कामगिरी केली,तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात चांगले…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता मलईदार खात्यासाठी तीन इंजिनच्या सरकारमध्ये मॅरेथॉन स्पर्धा सुरू… निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण ? व कोणती खाती कोणाला ? या दोन प्रश्नाची उत्तरे शोधण्यात महायुती अपयशी ठरली आहे.मुख्यमंत्रीपद भाजपला द्यायचे ठरल्यानंतरही उमेदवाराचा चेहरा कोण ? हे जाहीर करण्यात भाजपचे केंद्रीय नेते मागेपुढे का करत आहेत,याचा उलगडा होत नाही.एकनाथ शिंदे हे मुंबईला परतले असले तरी त्यांचा राजकीय आजार अद्याप आटोक्यात आल्याचे दिसत नाही.अडीच वर्षांपूर्वी आपण जो डाव खेळलो,तो डाव आपल्यावर बुमरॅग होईल,असे त्यांना वाटले नव्हते.पण तो अखेर उलटलाच,” उसके घर देर है,पर अंधेर नही,” याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना गेल्या आठ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मनसे ; आता पुन्हा सावरणे जरा कठीणच… या निवडणुकीतील निकाल पाहता राज यांची मनसे पुन्हा निवडणुका लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.पालघर व ठाणे जिल्ह्यात मनसेचा झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन त्यांचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला होता.पण अचानकपणे त्यांना नैतिकतेचा विसर पडला व त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.पण त्यांच्या या कृतीचे पालघर म्हणा की ठाणेवासियाना बिलकुल आश्चर्य वाटले नाही. सर्वच्या सर्व म्हणजे १२८ उमेदवाराचा पराभव होणे,हा प्रकारच मुळात जिव्हारी लागणारा होता,त्यापैकी ६० ते ७० उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होणे,हे तर त्याहून जिव्हारी लागणारे ठरले.पण या पराभवातून राज व त्याचे फंटर्स काही…
दीपक मोहिते, भयाण वास्तव, पाणीटंचाई ; वेळीच सावध न झाल्यास जगभरात हाहाकार उडेल…. राज्याच्या यंदा चांगला पाऊस होऊनही अनेक जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.जगातील अनेक देशांनाही या समस्येने चांगलेच घेरले आहे.दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन या शहरात चार दिवस आड पाणी सोडण्यात येत आहे.पण आपण पाणी बचत,पाण्याचा अपव्यय टाळणे,भूगर्भातील पाण्याचा अविरत होणारा पाणीउपशा व पर्यावरणाचे संवर्धन या महत्वाच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. जगात सध्या नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली असल्याचे जाणवू लागले आहे.झाडांची कत्तल,डोंगर पोखरणे,वनजमिनी बळकावणे व भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपशा,अशा कारणांमुळे मानवी जीवन आता धोक्यात आले आहे.यामध्ये भूगर्भातील पाण्याचा होणाऱ्या अविरत उपशामूळे आज अनेक…
दीपक मोहिते, विरार येथे महिलांसाठी कार्यशाळा संपन्न, यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्यातर्फे खास महिलांसाठी व्यवसाय विषयक उपक्रम अंतर्गत विनामूल्य अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रशिक्षण आज साईबाबा मंदिर हॉल कारगिल नगर मनवेलपाडा विरार पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेस स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे,यंग स्टार ट्रस्टच्या रुचिता नाईक,मिलिंद पोंक्षे, भूषण चूरी,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता मनीष राऊत,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या,मनवेल पाडा विभागातील महिला वर्ग उपस्थित होता. सदर कार्यशाळेस उपस्थित महिलाना रुचिता नाईक यांनी अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळा संघटक सचिव व ट्रस्टचे समन्वयक अजिव पाटील यांच्या…
दीपक मोहिते, भयानक वास्तव, पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या व बुरशी, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थांच्या शरीरात क्रयशक्ती वाढावी,त्यांना कुपोषणाची लागण लागू नये,यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही दशकापूर्वी पोषण आहार योजना सुरू केली.पण शिक्षण विभागाचे अधिकारी व पुरवठादार यांच्या मिलीभगत मुळे या योजनेतील गैरप्रकाराला अक्षरश: उत आला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या २ हजार ३७१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये,गेल्या सहा महिन्यापासून जिवंत अळ्या आणि बुरशी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या.त्याची दखल घेऊन अनेक शाळांनी आपल्या वरिष्ठाना कळवले होते.तरीही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या फूडचे वाटप सुरूच आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी,गरीब मुलांच्या…
