Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्ही झालो बटिक, महानगरपालिकेचे पक्षपाती धोरण ; मॅरेथॉनच्या रंगात अचानक बदल, वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्रमांत राजकीय अजेंडा नसावा,अशी अपेक्षा नवनिर्वाचित भाजप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी व्यक्त केली होती.आम्ही आमचा रंग असावा,असा अजिबात आग्रह धरणार नाही.मात्र अन्य राजकीय पक्षांचा रंगही दिसू नये,असं आ.स्नेहा दुबे-पंडित यांनी काल आपल्या भाषणात म्हटलं होतं.पण नेमके घडलं उलटे,मॅरेथॉनचे बूथ,स्टॉल्स व झाडांना भगवा रंग लावण्यात आला.पूर्वी महानगरपालिका प्रशासन हिरवा व पिवळा रंग लावत असे,पण आयुक्तांना या रंगाची उपरती झाली व भगव्या रंगाने त्याची जागा घेतली. महापालिकेचे उपक्रम राजकीय पक्ष निरपेक्ष असावेत,अशी त्यांची अपेक्षा होती.प्रत्यक्षात मात्र भाजपने आपले “रंग,” सत्तेत आल्या आल्या आपले रंग दाखवण्यास…

Read More

दीपक मोहिते, शिंदे गटाची मुस्कटदाबी, खातेवाटपातही भाजपकडून एकनाथ शिंदे गटाची कोंडी, मुख्यमंत्रीपदावरून रंगलेले नाट्य आता निवळले असले तरी खातेवाटपावरून पुन्हा नळावरच्या हमरीतुमरीला पुन्हा सुरुवात सुरुवात झाली आहे.आमदारांचा शपथविधी पार पाडण्यासाठी आज तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.या अधिवेशनानंतर सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाकडे लागले आहे. महायुतीत मलईदार खात्यांवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याचा हट्ट धरला आहे.पण आजवरचा अनुभव लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस हे खाते,इतर कोणालाही मिळू देत नाहीत.त्यामुळे शिंदे यांना गृहखातं मिळणे,कठीण आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून त्यांना सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक खाती जातील,असा अंदाज आहे.गृह विभागासाठी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील पाच वर्षे धोका नाही, गेल्या आठ दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेतले,त्यांना दिवसभरात १८ तास प्रसिद्धी दिली.त्यांच्या बातम्या चालवल्या,त्या लक्षात घेता एकनाथ शिदे व अजित पवार हे दोघेही या काळात घनघोर अंधारात गुडूप झाल्याचे दिसून आले. आज राज्यात ” सबकुछ देवेंद्र,” असे वातावरण पाहायला मिळत आहे.आगामी काळात ” दिल्लीमे नरेंद्र,” और महाराष्ट्रमे देवेंद्र,” ” और ये दोनो है,तो सबकुछ मुमकिन है,” असे घोषवाक्य झाले तर आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये. आज दिल्ली दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वजन वाढले आहे.त्यांना विचारल्याशिवाय मोदी व शहा हे दोघे राज्यासंदर्भात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई तालुक्याच्या वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर ; वाहतूक पोलीस केवळ वसुलीच्या मागे, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे.वाहतूक पोलीस हे ” मलिदा गोळा करण्याच्या संस्कृती,” मध्ये गुंतले आहेत.त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हे वाहतूक पोलीस गायब होत असतात.वाहतूक पोलिसांची खाबुगिरी व वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, यामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.या प्रकरणी पोलीस आयुक्त व महानगरपालिकेचे आयुक्त या दोघानी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात येत आहे. वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात वसई,विरार,नालासोपारा,या तीन महानगराच्या पूर्व व पश्चिम भागात सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.स्टेशन परिसर पूर्व व पश्चिम,बोळींज,पूर्वेस…

Read More

जव्हार प्रतिनिधी, साखरशेत येथे सुरू असलेल्या शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा समारोप, पालघर जिल्ह्यातील केंद्रशाळा साखरशेत न.१ येथे गेले १० दिवस सुरू असलेल्या शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारंभ काल पार पडला. सदर उपक्रम जि.प.शाळा साखरशेत १,ता. जव्हार येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार करिश्मा नायर (आय.ए. एस.),पंचायत समिती जव्हार सभापती विजयाताई लाहरे, उपसभापती दिलीप पाडवी, आणि साखरशेत ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.या प्रशिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले,ज्याचे प्रात्यक्षिक उपस्थित मान्यवरांसमोर सादर करण्यात आले.प्रशिक्षक शरद पाटील ( संभाजीनगर, औरंगाबाद,) यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त…

Read More

नदीम शेख,पालघर, कौतुकास्पद उपक्रम, विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यासाठी सहकार्य. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी एक चांगलं घर असण्याची आवश्यकता आहे,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गृहनिर्माण क्षेत्रात काम करणारी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया,ही एक आघाडीची ना-नफा तत्वावरची संस्था आहे. सॅमसंग सी.अँड टी.या संस्थेसोबत भागीदारी करत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये सावरे,कंचाड आणि हमरापूर या गावांत राहणाऱ्या वारली आदिवासी कुटुंबांचे जीवन समृद्ध करण्यासाठी १५ घरे आणि जिल्हा परिषदेच्या ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा संकल्प केला आहे.पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या या दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी समुदायासाठी आवश्यक सुविधांची उभारणी,या प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमावर बोलताना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे राष्ट्रीय संचालक…

Read More

दीपक मोहिते, आश्रमशाळा ; भयाण वास्तव, भाग क्र.,३, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरलेल्या आश्रमशाळा योजनेत सुधारणा करा, कालच्या भाग क्र.२ मध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भयानक वास्तव प्रकाशात आणले, आजच्या भागात आश्रमशाळा या चांगल्या योजनेचा गेल्या पाच दशकात कसा करायचा बट्ट्याबोळ करण्यात आला,याविषयी माहिती घेणार आहोत.ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे,शिक्षणासोबत दोन वेळचे जेवण,कपडेलत्ते त्यांना मिळावेत,त्यांच्या निवासाची सोय व्हावी,यासाठी राज्यसरकारने १९७२-७३ साली ही योजना सुरू केली.त्यासाठी सरकार दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात हजारो कोटी रु.ची आर्थिक तरतूद करत असते.ही योजना सुरू करण्यामागे ग्रामीण भागाचा मूलभूत विकास व्हावा,त्या भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत,असा उद्देश होता.गेल्या ५० वर्षात तो कितपत यशस्वी…

Read More

मनोज कामडी, जागतिक एड्स दिनानिमित्त पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन, जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, दुसऱ्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. आर. बांदल,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे व डॉ.राजगुरू (मनोर), वाय.आर.जी.केअरच्या जानवी मॅडम,जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे रतन गाढवे,तसेच एम अँड ई रवि विशे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते या फेरीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दाखवण्यात आला.प्रभात फेरी दरम्यान एक चित्ररथ फिरवण्यात…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यातील नरेगाच्या कामांची पाहणी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर,रविंद्र शिंदे यांनी आज वाडा तालुक्याला भेट देऊन नरेगाच्या कामांची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प. ) चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( नरेगा ) अतुल पारसकर,गटविकास अधिकारी पं.स.वाडा,इ.अधिकारी उपस्थित होते.ही पाहणी झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत सुरु असलेल्या डीएस-गवळी पाडा,बाळा कडु यांच्या शेताजवळील बंधाऱ्यातील गाळ काढणे,या कामाला भेट दिली.सदर कामावर १४८ मजुर हजर होते.या भेटी दरम्यान रविंद्र शिंदे यांनी मजुरांची विचारपुस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच पं.स.वाडा,ग्रामपंचायत परळी अंतर्गत सुरु असलेल्या एनएस-कदल नाला सरळीकरण करणे,या कामाला भेट…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वर्गाचा मॉनिटर आता शिपायाच्या भूमिकेत, देवेंद्र फडणवीस यांना मानलं बुवा,त्यांनी गेली अडीच वर्षे कार्यरत आलेल्या वर्गाच्या मॉनिटरला थेट शिपाई बनवले. बारा दिवस आढेवेढे घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिपाई म्हणून काल सूत्रे हाती घेतली व भाजपवाल्यांचा जीव भांड्यात पडला.दुसरा आणखी एक शिपाई गुलाबी जाकीट घालून ” जी साब,जी साब,” बोलण्यासाठी सज्ज झाला आहे.या सर्व घटनाक्रमाने स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.आजवर एकाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अशी पाळी आली नव्हती,ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली.असो ” राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य,” असते.एका मराठ्याला अशाप्रकारची मानहानी स्विकारावी लागली,याचे मनोज जरांगे पाटलाना देखील वाईट वाटले असावे.ज्या शिंदे…

Read More