- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वसईकरांचे प्रेम हीच माझ्या विजयाची पोचपावती,” करून दाखवले व करतच राहणार,” आ.हितेंद्र ठाकूर आणि वसईचे मतदार,यामध्ये वर्षानुवर्षं असलेले ऋणानुबंध,आजवर कधीही तुटू शकले नाही व आणखी २५ वर्षे तुटूही शकणार नाही.ही नाळ इतकी घट्ट आहे की भल्याभल्यानी त्यांच्यासमोर हात टेकले.यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.वसईच्या जनतेने प्रत्येकवेळी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात भरभरून माप टाकले तर आ.ठाकुरानीही मतदारसंघात भरीव विकासकामे करून त्याची उतराई केली.आज वसई शहर नावारूपाला आलं आहे,ते केवळ आ.ठाकूर यांच्या अथक प्रयत्नामुळेच..हे वास्तव विरोधकही खाजगीत मान्य करत असतात.लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम व आ.ठाकूर यांच्यामध्ये असलेली असलेली कर्तव्य भावना,याचा सुरेख संगम,या मतदारसंघात पाहायला मिळतो.मुलांसाठी उद्याने,क्रीडांगणे, युवकांसाठी तरणतलाव,ज्येष्ठ नागरिकासाठी बैठक निवारा,रुंद…
दीपक मोहिते, सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख ६२ हजार ९६१ मतदार, पालघर जिल्ह्यातील आगामी ६ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २२ लाख ६२ हजार ९६१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.एकूण मतदारांपैकी ११ लाख ७५ हजार ६२७ पुरुष तर १० लाख ८७ हजार १०७ महिला मतदार आहेत.तसेच २२७ तृतीय पंथीय मतदार या निवडणुकीत आपल्या मतांचा वापर करतील. १२८ डहाणू विधानसभा हा अनु.ज.साठी आरक्षित आहे.येथे २ लाख ९८ हजार ५६१ मतदार आहेत.पुरुष-१ लाख ४८ हजार ५३७,महिला-१ लाख ४९ हजार ९९० तृतीय पंथीय-३४, १२९ विक्रमगड- एकूण ३ लाख १३ हजार ६१३,पुरुष-१ लाख ५६ हजार ४९४,महिला-१ लाख ५७ हजार ११८,तृतीय पंथीय-०१, १३० पालघर-एकूण २ लाख…
दीपक मोहिते, ” डावपेच,” सहाही जागा लढवण्याचा बविआचा निर्णय ; आ.ठाकुरांची धूर्त राजकीय खेळी, बविआने पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका लढवण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यांच्या या धूर्त राजकीय खेळीमुळे महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांनी घेतलेली मते,ही दुर्लक्षित करता येणार नाहीत.डहाणू विधानसभेचे आ.कॉम्रेड विनोद निकोले व विक्रमगडचे आ.सुनील भुसारा हे दोघेही आ.ठाकूर यांचे जिवलग मित्र,त्यामुळे त्यांच्यासमोर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यामागे आ.ठाकूर यांची निश्चित राजकीय खेळी आहे.मात्र त्यांच्या या खेळीमुळे राजकीय पक्ष मात्र दबावाखाली येणार आहेत.त्यांच्या या खेळीचा फटका…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” २० नोव्हें.रोजी मतदान तर निकाल २३ नोव्हें रोजी,राजकीय हालचालींना वेग, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.महाराष्ट्रात २० नोव्हे.रोजी मतदान होणार असून २३ नोव्हे.रोजी निकाल लागणार आहे.या निवडणुकीत सुमारे ९ कोटी ६३ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत.त्यापैकी ४ कोटी ९७ लाख पुरुष तर ४ कोटी ६६ लाख महिला मतदार आहेत.तसेच ५६ हजाराहून अधिक मतदार तृतीय पंथीय आहेत.या निवडणुकीत १ लाख १८६ मतदानकेंद्रे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टो.रोजी प्रसिद्ध होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टो.अशी आहे.३० ऑक्टो.रोजी…
दीपक मोहिते, बविआ पालघर मतदारसंघातील सहाही जागा लढवणार, आ.राजेश पाटील यांनी अफवांना लावला लगाम, बहुजन विकास आघाडी, पालघर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे.या निवडणुका बविआ महाविकास आघाडी व महायुती यापैकी कोणाशीही हातमिळवणी करणार नाही.या सर्व निवडणुका ते स्वबळावर लढवणार असल्याचे आज बविआतर्फे जाहीर करण्यात आले. आज बविआतर्फे विरार येथे पत्रकारांना निवडणूक विषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी बविआचे वरिष्ठ नेते माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक,व बोईसरचे आ.राजेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.या निवडणुकीत बविआची भूमिका कशी असेल,याविषयी आपली भूमिका त्यांनी विषद केली.यावेळी आ.राजेश पाटील यांनी आपल्या विषयी माध्यमावर ज्या अफवा पसरवण्यात येत आहेत,निराधार असून…
दिपक मोहिते, ” भयावह वास्तव,” देशात कुपोषण व उपासमारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ… ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यंदाच्या वार्षिक अहवालामध्ये आपल्या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट अशी असून १३.७ % जनता कुपोषित असल्याचे म्हंटले आहे.ही संस्था जगभरातील उपसमारीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत असते.चीन,नेपाळ,बंगला देश व श्रीलंका या देशापेक्षाही आपली स्थिती अत्यंत खालावली असल्याचे उघड झाले आहे.जगभरातील १२७ देशाच्या यादीत आपण १०५ व्या क्रमांकावर आहोत.त्यामुळे किती भयावह स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या देशात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ८० कोटी लोकांना फुकट जेवण देण्यात येत असल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात येत असतो.कोरोना काळापासून एका कुटुंबाला ३५ किलो अन्न धान्य ( गहू व तांदूळ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गद्दारी करण्यामागे सत्तेचा हव्यास,ईर्षा व स्वार्थ असतो.. शिवसेनेत झालेल्या बंडाला आता अडीच वर्षे पूर्ण होत आली आहे.२० जून २०२२ रोजी विधानपरिषदेची निवडणूक संपल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रीचेबल झाले,त्यानंतर ठाणे व्हाया सुरतमार्गे ते थेट गुवाहाटी व तेथून गोव्यात दाखल झाले.अशाप्रकारे गद्दारीचे एक वर्तुळ पूर्ण झाले.त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनीही गद्दारी करण्यात,” हम भी कुछ कम नही,” दाखवून दिले.राजकारणात अशाप्रकारची जी गद्दारी होते,ती रिकाम्या पोटी नाहीतर भरल्यापोटी होत असते.हा एक प्रकारचा भसम्या रोग असतो.अशा रोगाची लागण झालेल्या रुग्णाची भूक कधीच मिटत नाही. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी या दोघाना त्यांच्या राजकीय वाटचालीत काय दिले…
दिपक मोहिते, सूर्यातीर, विकासाच्या नावाखाली सुरु असलेली वृक्षतोड व हवेतील प्रदूषण रोखा, दरवर्षी पडणारा अवकाळी पाऊस व माघारी फिरणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते.यंदाही परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र अविरतपणे सुरू आहे.मात्र सरकार अवकाळी व परतीचा पाऊस,या दोन ज्वलंत विषयावर संशोधन व उपाययोजना करण्याबाबत कायम उदासीन राहिले.दरवर्षी हमखास येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीच्या मुळाशी विस्कळीत पर्यावरण,हे एकमेव कारण आहे.भरमसाठ होणारी वृक्षकत्तल व जल/हवेतील प्रदूषण रोखण्याबाबत सरकार प्रचंड उदासीन असल्यामुळे निसर्गाचे ऋतुचक्र पार लयाला गेले आहे.त्याचे परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.या महिन्यात राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने…
दीपक मोहिते, वारे व्वा…. इशारे कोणाला देता ? आपल्या पायाखाली काय जळतय,ते पहा जरा.. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आश्चर्याचा धक्का बसला.हे दोघे आपल्या भाषणात जे काही म्हणाले,ते समोर जमलेल्या प्रचंड गर्दीला पाहून भारावून गेले असावेत,असे वाटते.पण त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकाना आश्रर्य वाटलेच,पण बऱ्यापैकी मनोरंजन देखील झाले. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा जरा, विरोधकांना टोला लगवताना ते म्हणाले,मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे,मी आनंद दिघेसाहेबांचा चेला आहे,मला हलक्यात घेऊ नका,मी मैदानातून पळणारा नाही,तर पळवणारा नाही.अहो शिंदेसाहेब,बंड करण्यापूर्वी तुमचा माणूस ईडीच्या भितीने कुठे गायब झाला होता ? तुम्ही देखील…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पुरोगामी राज्य राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पार रसातळाला गेले, दुसऱ्याचे घर फोडण्यात आघाडीवर असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना काल रात्री झालेल्या घटनेतून तरी शहाणपण येईल,अशी अपेक्षा आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली असताना आपले गृहमंत्री महाशय,हे तीन वर्षांपासून इतरांची घरे फोडण्याचे पाप करण्यात रममाण आहेत.लोकसभा निवडणुकीत आपटी खाल्यानंतरही फडणवीस यांचे डोके अद्याप ताळ्यावर आलेले नाही.बदलापूर बलात्कार,पुणे बलात्कार,पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रनच्या वाढत्या घटना,त्या घटनातील आरोपींना वाचवण्याचे झालेले प्रयत्न,महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,ओबीसी,मराठा व धनगर आरक्षण प्रकरणी त्यांच्याकडून होत असलेला ” अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग,महायुतीमधील अंतर्गत वाद,इ.कारणे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या दारुण पराभवाला कारणीभूत…
