- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीची लागण, महाविकास आघाडी व महायुती,या दोघांचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे.१५ ते २० जागांवरून सध्या ज्या हाणामाऱ्या सुरू आहेत,त्या पण एकदोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे ८५:८५:८५ असा फार्म्युला महाविकास आघाडीने सर्वसंमत केला.१५ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असून उर्वरित १८ जागाचा तिढा कसा सोडवायचा,यासाठी शरद पवार जोरदार प्रयत्न करत आहेत.या अठरा जागांपैकी १२ ते १३ जागा विदर्भातील आहेत.वास्तविक विदर्भात सेनेला फार मोठा जनाधार आहे,अशी परिस्थिती नाही.पण संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आपापसातील भांडणामुळे हा तिढा अधिक जटील झाला आहे.पण यातून मार्ग…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.राजेश पाटील ; ” आपल्या हक्काचा माणूस,” विकासकामांवर ८३० कोटी रु.खर्च करणारा लोकप्रतिनिधी, बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८३० कोटी रु.चा निधी खर्च केला असून हा एक विक्रमच म्हणावा लागेल.या निधीतून त्यांनी केलेली विकासकामे,ही विरोधी उमेदवारांची झोप उडवणारी ठरली आहेत. या निधीतून त्यांनी बोईसर मतदारसंघाच्या ग्रामीण व शहरी भागात रस्ते,स्मशानभूमी,समाज मंदिरे,पाणीपुरवठा,साकव,पूल,वसतीगृहे इमारती,तरंगती जेट्टी,जेट्टीची दुरुस्ती,चक्रीवादळ निवाराकेंद्र व अन्य पायाभूत सुविधा विकास कामावर खर्च केला.त्यांनी केलेल्या विकासकामामुळे बोईसरच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहराच बदलला गेला.मेरिटाईम बोर्ड,जलजीवन मिशन,पर्यटन,भौतिक पायाभूत सुविधा,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम,सार्व.बांधकाम विभाग,डोंगरी विकास,आदिवासी विकास विभाग व अन्य विभागाकडे आ.राजेश पाटील यांनी आर्थिक निधी मिळावा…
दीपक मोहिते, शिवसेनेचे ( उबाठा ) जयेंद्र दुबळा व डॉ.विश्वास वळवी यांना अनुक्रमे पालघर व बोईसर येथून उमेदवारी.. काल शिवसेनेच्या ( उबाठा ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली,यादीत एकूण ६५ उमेदवारांची नांवे जाहीर करण्यात आली आहेत.पालघरहुन जयेंद्र दुबळा व बोईसर येथे डॉ.विश्वास वळवी या दोघांना संधी देण्यात आली आहे.वास्तविक या दोन्ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येतील,असा अंदाज होता. पण जयेंद्र दुबळा यांना पालघर या महत्वाच्या जागेवर संधी मिळेल,असे शिवसैनिकांच्या ध्यानीमनीही नव्हते.येथून डॉ.विश्वास वळवी यांना उभे करण्यात येईल,असा सर्वसाधारण अंदाज होता,पण त्यांना शेजारी असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात ट्रान्सफर करण्यात आले.डॉ.विश्वास वळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, पालघर विधानसभा ; तिरंगी लढत होण्याची शक्यता, १३० पालघर विधानसभा ( अनु.ज.) या मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपल्या उमेदवाराची नांवे जाहीर केलेली नाहीत.पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही प्रयत्नात आहेत.२००९ चा एकमेव अपवाद वगळता हा गड कायम तीन दशके एकसंघ सेनेच्या ताब्यात राहिला.२००९ मध्ये काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी सेनेच्या मनिषा निमकर यांच्यावर निसटता विजय मिळवला होता.हा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सेनेचा वरचष्मा राहिला.२०१४ साली सेनेतून उमेदवारी मिळवणारे कृष्णा घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यावर केवळ ५१५ मतांनी विजय मिळवला होता.त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव अमित…
दीपक मोहिते, राजन नाईक हे आ.क्षितिज ठाकूर यांना रोखू शकतील का ? १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातुन भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षात त्यांना अंतर्गत विरोध असूनही ते उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मात्र त्यांना या निवडणुकीत पक्षातील नाराज मंडळींकडून किती सहकार्य मिळेल,हे सांगता येत नाही.वसई भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गटा तटाचे राजकारण सुरू आहे. राजन नाईक हे ज्या सामवेदी समाजाचे प्रतिनिधित्व करतात,तो समाजही शिवसेना व बहुजन विकास आघाडीत विभागला आहे.तर किनारपट्टीवर राहणारा मांगेला समाजही असाच विभागला आहे.पालघर जिल्ह्यात मांगेला समाज मोठ्या संख्येने राहतो,पण त्यांना आजवर भाजपकडून योग्य ती…
दीपक मोहिते, मुंबईच्या क्षितिजावरून, उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने मारली बाजी, मात्र त्यांच्या आयटी सेलचा चावटपणा सुरू, भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पाहिला नंबर पटकावला आहे.भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आठ दिवसापूर्वी या यादीवर मोहोर उठवल्यानंतर ( १४ ऑक्टो.) ती दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. होती.या यादीत ९९ उमेदवारांची नांवे आहेत.विशेष म्हणजे ८० % विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.केवळ पाच आमदारांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आहे.बंडखोरीची लागण मोठ्याप्रमाणात होऊ नये,यासाठी जुन्या चेहऱ्यांना पुढे चाल देण्यात आल्याचे दिसून आले आहे.इतर पक्षात जागावाटपावरून कलगीतुरा रंगत असताना भाजपने आपली यादी प्रसिद्ध करून एकप्रकारे बाजी मारली आहे. कोकण विभाग-२५, उ.महाराष्ट्र-२०, विदर्भ-१९, मराठवाडा-१८…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, जिल्ह्याचा विकास हाच आमचा श्वास,-आ.क्षितिज ठाकूर, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास कटिबद्ध आहे,त्यासाठी कायम आमचे प्रयत्न राहतील,कारण जिल्ह्याचा विकास हा आमचा श्वास आहे.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे,असे उदगार नालासोपाऱ्याचे आ.क्षितिज ठाकूर यांनी विरार येथे काढले. विरार पश्चिमेस क्लब वन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते,यावेळी व्यासपीठावर आ.हितेंद्र ठाकूर,आ.राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक,माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले,पालघर जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे,कृषी संशोधन केंद्र सुरू करणे,अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे, जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवणे,वाहतूक…
दीपक मोहिते, मुंबईच्या क्षितिजावरून… सुज्ञ मतदार,मिंध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही, कोरोनानंतर मुंबई महानगर पालिकेचा प्रशासकीय कारभार शासनानियुक्त प्रशासकाकडे गेल्यानंतर नावाजलेल्या शहराची अक्षरशः दुर्दशा झाली.प्रशासकाच्या माध्यमातून मिंध्ये सरकारने मनमानी तसेच उधळपट्टीचा कारभार करत आपले खिसे भरले.अधिकारी व मिंध्ये सरकारच्या नेत्यांनी ” आपण दोघे भाऊ भाऊ,धुसून पुसून खाऊ,” असे धोरण राबवले.या नेत्यांची व अधिकाऱ्यांची घरे भरली,पण मुंबई शहरातील करदात्यांची मात्र पार दैना झाली.चालायला धड रस्ते नाहीत,अनधिकृत फेरीवाल्यांचे पदपथावर अतिक्रमण,वाहतूककोंडी,शहर स्वच्छतेवर हजारो कोटी रु.खर्च करूनही शहराला आलेले बकाल स्वरूप,महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भ्रष्टाचाराला आलेला ऊत, रस्त्याच्या कामात बोकाळलेला आर्थिक गैरव्यवहार,निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना देण्यात येणारी कामे,कामे न करता देयके अदा…
दीपक मोहिते, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत, महाविकास आघाडीतर्फे १३२ नालासोपारा व १३३ वसई हे दोन विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार आहेत,याविषयी असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पंकज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.बविआचे क्षितिज ठाकूर,भाजपचे राजन नाईक व शिवसेनेचे ( उबाठा ) पंकज देशमुख यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल,अशी शक्यता आहे. भाजपचे राजन नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले भाजपचे नेतृत्व आहे.गेली अनेक वर्षे त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवले असून वसई तालुक्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडूनही गेले होते.२०१४ साली त्यांनी विधानसभा लढवली होती.त्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या…
दीपक मोहिते, भान, लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांचा संयम व समंजसपणा वाखाणण्याजोगा, संकटकाळात संयम,समजूतदारपणा व सामंजस्य हे तीन मानवी गुण लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांच्या ठायी ठायी भिनले आहेत,याचे प्रत्यंतर गेल्या पंधरा दिवसात जिल्हावासीयांना आले.माध्यमे राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून सर्वत्र दिशाभूल करणारी व कोणताही आधार नसताना वृत्ते प्रसारीत करत होती.पण या काळात लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर हे दोघे पितापुत्र शांतपणे आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होते.हे दोघेही आपल्या विवा महाविद्यालयातील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताना भेटत होते व त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकण्यात गर्क होते.त्यांनी दाखवलेला हा संयमी व समंजसपणा खरोखरच कौतुकास्पद असाच होता.दररोज अनेक बातम्या कानावर येत होत्या,पण त्यांनी कधीही त्यावर…
