- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सर्वत्र बंडखोरीची लागण, गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकून महायुतीच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता.त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीचा त्रास झाला नव्हता,पण यावेळी मात्र दोघांना बंडखोरांनी अक्षरशः जेरीस आणले आहे.बंडखोरांची समजूत काढताना वरिष्ठ नेत्यांची प्रचंड दमछाक होत आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात बंडखोरांनी रणशिंग फुंकल्यामुळे शरद पवार यांना इंदापुरात दाखल व्हावे लागले आहे.तर बोरिवली येथे माजी.खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत भाजपची अवस्था बिकट केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी व शाह जोडीने गोपाळ शेट्टी…
दीपक मोहिते, वास्तव, बोईसर येथे विलास तरे व राजेश पाटील यांच्यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना.. १३१ बोईसर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना ( उबाठा ),शिवसेना ( एकनाथ शिंदे ) बहुजन विकास आघाडी या तिघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.भाजपने या मतदारसंघात स्वतःचा शिलेदार माजी आ.विलास तरे याना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी मिळवून दिली आहे.तर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांची साथ सोडून आपल्या मनगटावर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेणाऱ्या डॉ.विश्वास वळवी यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.हे दोन्ही उमेदवार बलाढ्य असे असून बविआचे विद्यमान आ.राजेश पाटील यांची त्यांच्याशी लढत होत आहे.या तिघांपैकी बोईसर पश्चिम भागात जो उमेदवार सर्वाधिक मते घेईल,तोच सिकंदर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिट्टी चिन्हाचा घोळ ; उद्या न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता, निवडणुकीच्या आखाड्यात आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी दोन हात करणे,शक्य होत नसल्यामुळे विरोधक पडद्याआडून अनेक कटकारस्थाने करत असतात.बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे त्यांचे पारंपरिक चिन्ह मिळू नये,यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले आहेत,त्याला बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.बहुजन विकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. यापूर्वी २०१८ साली झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी रात्रभर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बविआला शिट्टी हे चिन्ह मिळू दिले नव्हते.त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत झाली आहे.त्यावेळी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना…
दीपक मोहिते, शिट्टी या निवडणूक चिन्हासाठी बविआ मुंबई उच्च न्यायालयात, केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे निवडणूक चिन्ह जनता दल ( युनायटेड ) पक्षासाठी राखीव ठेवल्यामुळे बहुजन विकास आघाडीसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे.त्यामुळे बविआने उच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगा विरोधात दाद मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील न्यायालयामध्ये न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्यासमोर आज सकाळी बहुजन विकास आघाडीने भारत निवडणूक आयोग व इतरांच्या विरुद्ध जनहित याचिका ( रिट पिटीशन ) दाखल केली आहे.यावेळी प्रतिवादी यांना याचिकेचा तपशील पुरवण्याविषयी सुचित करण्यात आले आहे.याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. २० नोव्हें.रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय खेळीकडे तमाम राजकीय पक्षाचे लक्ष, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकारणाला लवकरच वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.बहुजन विकास आघाडीने सहा विधानसभा मतदारसंघात उभे केल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघात उभे असलेले कॉम्रेड आ.विनोद निकोले व विक्रमगड येथे उभे असलेले सुनील भुसारा हे दोघेही आ.हितेंद्र ठाकूर यांचे जिवलग मित्र असतानाही त्यांच्यासमोर आ.ठाकूर यांनी उमेदवार उभे केल्यामुळे आ.ठाकूर यांच्या मनात नेमके काय चालले आहे ? याविषयी पालघर जिल्ह्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. तसेच १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात देखील आ.हितेंद्र ठाकूर वेगळी खेळी खेळण्याच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, डहाणू येथे भाजप तर विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) यांची डाळ शिजणे कठीण, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी १२८ डहाणू वगळता इतर पाच ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाली आहे. १२८ डहाणू विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.विनोद निकोले यांच्या विरोधात भाजपचे विनोद मेढा रिंगणात उतरले आहेत.ही जागा बहुजन विकास आघाडीने लढवायचे ठरवल्यास अरुण निकोले हे त्यांचे उमेदवार असतील.या जागेवर मनसेने विजय वाढीया यांना उमेदवारी दिली आहे.मात्र या मतदारसंघात मार्क्स.कम्यु.व भाजप वगळता इतर पक्षाची ताकद नगण्य आहे.त्यामुळे विनोद मेढा व विनोद निकोले या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” या निवडणुकीत मनसे महायुतीची ” बी,” टीम, मनसेचे राजे,राज ठाकरे हे सतत भूमिका बदलणारे नेते म्हणून ओळखले जातात.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला व मुंबई,ठाणे,नाशिक व पुणे या चार महानगरात युतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.त्यावेळी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते.पण त्यांचा तो पाठिंबा बिनशर्त नव्हता,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला जाणवू लागले आहे.त्यांनी या निवडणुकीत सुमारे १५० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.त्यापैकी किती जागा निवडून येतील,हे सांगणे अवघड आहे.पण त्यांनी काल मनसे सत्तेत येईल व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील,असे भाकीत केले पण त्यांचे हे भाकीत खरे ठरण्याची शक्यता…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई-नालासोपारा शिवसेना ( उबाठा ) फुटीच्या मार्गावर, पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे.हे दोन्ही मतदारसंघ जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्यामुळे आपल्या हातून गेल्याचा आरोप शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.काल अनेक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन हे आरोप केले.आज सकाळी जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले. २०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने लढवले होते.यावेळी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले.जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व सेनेचे वरिष्ठ नेते व माजी खा.विनायक राऊत या दोघांनी संगनमत करून हे दोन्ही मतदारसंघ घालवले,असे माजी जिल्हाध्यक्ष…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” १३० पालघर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता, १३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उबाठा )शिवसेना ( शिंदे गट ) व बविआ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.या विधानसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.माजी खा.राजेंद्र गावित यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या ४ नोव्हें.रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.शिवसेना ( उबाठा ) तर्फे जयेंद्र किसन दुबळा तर राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून रिंगणात आहेत.बहुजन विकास आघाडीही या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.त्यांच्याकडून माजी आ.अमित घोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.त्यांना उमेदवारी मिळाल्यास…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बारामतीकर,या निवडणुकीत धरणात **** लावणार… काल पुरोगामी,सुशिक्षित व सांस्कृतिक,चेहरा असलेल्या फुले,शाहू व आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात माणुसकीला काळे फासणारी घटना घडली.मेलेल्या माणसाविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही,पण अहंकाराचे गुलाबी जाकीट घातलेल्या व संस्कृतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या अजित पवार यांनी स्व.आर.आर.पाटील,यांच्यावर तोंडसुख घेतले व उभा महाराष्ट्र हळहळला.आपल्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागत असल्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.युगेंद्र पवार यांची पहिलीच जाहीर सभा,न भूतो,न भविष्यती अशी झाल्यामुळे अजित पवार यांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या व उर्मटपणा ठायी ठायी भिनलेल्या अजित पवार यांनी साधनशुचिता गुंडाळून ठेवत आपल्या…
