Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, निवडणुकीचे वारे, आ.ठाकूर रिंगणात नसतील तर माजी महापौर प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी मिळावी, पालघर जिल्ह्यातील सहापैकी तीन विधानसभा जागा,आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत.तर उर्वरित पालघर-एकनाथ शिंदे गट,विक्रमगड- राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व डहाणू- मार्क्स.कम्यु.या तीन पक्षाकडे आहेत.वसई व नालासोपारा या दोन्ही मतदारसंघात ठाकूर कुटुंबियाशिवाय इतर कोणालाही मतदार स्विकारत नाहीत.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनीच उभे राहावे,अशी मागणी करण्यात येत आहे.पण हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवायची नाही,अस ठरवलं तर त्यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करत आहेत.यामध्ये व्यापारी,उद्योजक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक,नोकरदार मंडळी,महिला…

Read More

दीपक मोहिते, अजित पवार यांना झालंय तरी काय ? अजित पवार यांना झालंय तरी काय ? धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही लवकरच शरद पवार गटात सामील होणार आहे.त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांचा संताप अनावर झाला आहे.आत्राम कुटूंबातील वाद शिगेला पोहोचला असताना अजित पवार यांनी दिलेला सल्ला ऐकून आपण सारे चकितच झालो आहोत.ते आत्राम यांच्या कन्येला सल्ला देताना म्हणाले,राजकारणासाठी स्वतःचे घर फोडू नका,ती चूक मी केली,त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहे.मी केलेल्या चुकीचा मला प्रचंड पश्चाताप होत आहे.उशिरा का होईना,त्यांना पश्चाताप होतोय,हेही नसे थोडके…. स्वतःचे घर फोडताना,८५ वर्षे वयाच्या आपले वयोवृद्ध काका व ज्या बहिणीने आयुष्यभर आपल्यावर प्रेम केलं,त्या…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अर्थखाते नालायक आहे,गुलाबराव पाटलांचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला, राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री यांनी गुलाबराव पाटील यांनी राज्याचे अर्थखाते किती नालायक आहे,यावर दोन दिवसांपूर्वी कडक शब्दात टीका केली होती.त्यांच्या या टिकेनंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले.गुलाबराव यांनी जो संताप व्यक्त केला त्यास ८० % आमदाराकडून पाठिंबा मिळाला आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अर्थखाते व अर्थमंत्र्याबाबत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो,ते योग्य तेच बोलले असे सांगत त्यांनी आघाडीचे सरकार असतानाही अर्थखात्याने मनमानी कारभार केल्याचा थेट आरोप केला.या दोघांचा रोख अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे होता.अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर घडून आले तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यसरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? तीन इंजिनच्या सरकारने ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याची घोषणा केली आहे.या उपक्रमाचा पहिला टप्पा गेल्या जाने.२०२४ मध्ये पार पडला होता.दुसऱ्या टप्प्यास नुकतीच सुरुवात झाली आहे,हा टप्पा १५ सप्टें.पर्यंत सुरू राहणार आहे. ” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा,” या योजनेंतर्गत आपल्या मुख्यमंत्र्यांनी ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” असा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.हा उपक्रम राबवण्यामागे विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करणे,क्रीडाविषयी जनजागृती करणे व शैक्षणिक वाढीला प्रोत्साहन देणे,अशी उद्दिष्टे आहेत.या उपक्रमांतर्गत सरकार ध्येय व धोरण अमलबजावणी-७४ गुण, पायाभूत सुविधा-३३ गुण व शैक्षणिक वाढ -४३ गुण…

Read More

दीपक मोहिते, विश्लेषण, उद्धव ठाकरे यांनी समंजस भूमिका घ्यावी, महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सध्या जागावाटप व मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण ? यावरून घमासान सुरू झाले आहे.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला शरद पवार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ” रुसूबाई रुसू आणि कोपऱ्यात जाऊन बसू,” अशी भूमिका स्विकारली आहे.त्यांचे अशाप्रकारचे वागणं आघाडीला त्रासदायक ठरू शकते.तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप याविषयी चकार शब्द काढायला तयार नाही.त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे याविषयी बोलताना,” हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डात होणार असल्याचे सांगत सुटले आहेत.आणि ते खरं देखील आहे,एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल,असे सगळ्यांना वाटले होते.दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस…

Read More

दिपक मोहिते, भयानक वास्तव, विकासाच्या नावाखाली सुरू असलेला नंगानाच थांबवा, गेल्या महिन्याभरात राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन कृषिक्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे.या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन किंवा पीक विमा योजनेचा फायदा देऊनही तो पुन्हा उभा राहील,अशी स्थिती नाही.वर्षानुवर्षे हे असे चालत आले आहे.कर्जमाफी,नुकसान भरपाई व पीक विमा इ.उपाययोजना या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत.निसर्गाचे ऋतुचक्र का बिघडले आहे,याच्या खोलात जाऊन कारणे शोधण्याची गरज आहे.सरकार त्यादृष्टीने पावले उचलत नाही.त्यामुळे राज्यातील कृषिक्षेत्र लयाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जस जसे आपण एकविसाव्या शतकाकडे जाऊ लागलो तसे काळाच्या ओघात आपण खुप काही गमावत चाललो आहोत.वृक्षांची…

Read More

दीपक मोहिते, गडकरी यांचे आगमन ; देवेंद्र फडणवीस यांची पीछेहाट सुरू, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी याना पाचारण केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यास सुरुवात झाली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय नेत्यानी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव हा केंद्रीय नेतृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आखलेले डावपेच अंगाशी आल्यानंतर दिल्लीत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महायुतीच्या नेत्यानी केलेल्या बेलगाम वक्तव्यामुळे तर आगीत तेल ओतले गेले.विरोधकांनी सरकारवर एकामागोमाग जोरदार हल्ले चढवले.त्यामुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…

Read More

दीपक मोहिते, पंचनामा, जयदीप आपटे ; अटक कि शरणागती ? पोलिसांची भूमिका संशयास्पद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी फरार असलेला आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी त्याला अटक केली का तो स्वतः हुन शरण आला याविषयी आता गूढ निर्माण झाले आहे.कारण दहा दिवसापासून फरार झालेला आपटे हा अचानक पोलिसांच्या हाती लागतो,यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.कारण आपटे याच्या वकिलाने या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.त्यांनी,” जयदीप हा स्वतःहून शरण आला असून पोलिसांनी त्याला पकडले नसल्याचे सांगितले.या जयदीपला पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके तैनात केली होती.पण त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.या काळात जयदीप हा इंदोर येथे होता व तो आपल्या वकिलाच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गडचिरोली घटना ; राज्य सरकारला लाज वाटायला हवी, राज्यात सत्तास्पर्धेला सध्या प्रचंड वेग आला असून आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे.नोव्हे.महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.महाविकास आघाडी व महायुती या दोघांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.सत्ताधारी महायुतीचे नेते आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.त्यासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी फस्त केला आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांवर बदलापूर बलात्कार घटनेने पाणी फिरवले आहे.काल गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्यावर चांगलेच तोंडसुख घेतले,ते एका कार्यक्रमात काय म्हणाले ते पहा,” अर्थखाते हे नालायक खाते असून…

Read More

दीपक मोहिते, देवेंद्र फडणवीस यांनी शिवचरित्र वाचायला हवं, एका वृत्तवाहिनीने आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” महाराष्ट्राचा महासंकल्प,” हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.” राज्याचा विकास व राजकीय चढाओढ,” या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,छगन भुजबळ यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आले होते.त्यांना लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला व मी मध्यस्थी केल्याचे मान्य केले व या योजनेचे श्रेय एकट्याने कोणी घेऊ नये,अशा सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर मालवण येथील…

Read More