- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नोटांच्या खोक्यावर ज्या पक्षाचा डोलारा उभा आहे,ते फुलं नाहीतर नोटाच उधळणार… ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठात नोटाची उधळण करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन शिवसैनिकावर आता पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.पण ही कारवाई करताना शिंदे गटाने या दोघा शिवसैनिकाकडून खुलासा करा,आदेश दिला आहे.या घटनेची व्हिडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असताना त्यांच्याकडून खुलासा मागणे,हे न समजण्या पलिकडचे आहे.कारण ज्या पक्षाचा डोलारा हा खोक्याच्या पायावर उभा आहे.त्यांच्या शिलेदारांकडून नोटांचाच पाऊस पडणार,त्यांनी ते कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडले. कारण,त्यांनी आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा इव्हेंट पार पाडला आहे.अडीच वर्षांपूर्वी या पक्षाचे नेते व आमदारांवर खोक्यांचा पाऊस पडला होता.तर…
दीपक मोहिते राज्यात हळवे भात कापणीला सुरुवात, राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे भाताचे पीक बऱ्यापैकी आले आहे.राज्याच्या पठारी व डोंगराळ भागात हळवे,गरवे व नीमगरवे अशा तीन प्रकारच्या भाताची लागवड करण्यात येते.सध्या हळवे भात तयार झाले असून पिकाची कापणी वेगाने सुरू झाली आहे.गरवे व निमगरवे भाताच्या कापणीला अनंत चतुर्दशीनंतर सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी राज्यात मान्सून पाठशिववणीचा खेळ करत असतो,यंदा मात्र त्याने भातउत्पादक शेतकऱ्यांना नाराज केले नाही.जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आगमन झाल्यानंतर त्याने सलग महिनाभर हजेरी लावली.त्यामुळे शेतीची प्राथमिक व नंतरची उर्वरित कामे मार्गी लावता आली.नांगरणी,पेरणी, लावणी व आवणीची कामे वेळेवर पार पडली.त्यानंतरच्या काळात राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली, पण ती भातशेतीला…
दीपक मोहिते, ” आपला आनंद हरपला,” ठाण्यात “आनंद हरपला आहे,” ज्या आनंद मठात आनंद दिघे यांचे वास्तव्य होते,त्या खोलीत पैसे उधळण्याचा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.पैश्याचा इतका माज बरा नाही,अशा प्रतिक्रिया ठाण्यात दिवसभर उमटत होत्या. गणेशोत्सवातील मिरवणुकीत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर ढोल पथकांवर पैसे उधळण्यात आले.ज्या धर्मवीर आनंद दिघे यांनी आयुष्यभर संस्कार,तत्व व हिंदुत्व याची जपणूक केली,त्या दिघे यांच्या मठात असा प्रकार घडावा,हे अत्यंत दुःखदायक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य ठाणेकरामधून व्यक्त होत आहेत.धर्मवीर आनंद दिघे याना दैवत मानतो,त्यांची आपण पूजा करतो,त्यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळणे,अत्यंत निंदनीय आहे,असे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी म्हंटलं आहे.खऱ्या अर्थाने ” आपला आनंद…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” याला ” सबका साथ,सबका विकास,” म्हणायचं का ? मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे काम आता युद्धपातळीवर सुरु झाले आहे.दुसरीकडे बहुचर्चित वाढवण बंदराचे काम ही लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी अनेक धनदांडग्यांनी या प्रकल्पाच्या परिसरातील गोरगरीब भूमीपुत्राच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी करण्याचा सपाटा लावला होता.आता या जमिनी सरकारने आपल्याकडून खरेदी कराव्यात,यासाठी ही मंडळी दिल्ली दरबारी येजा करत आहेत.मातीमोल भावाने खरेदी करण्यात आलेल्या या जमिनी हे लोक आता या प्रकल्पाना दामदुपट्टीने विकू पाहत आहेत.या गोरखधंद्यामध्ये सरकारी अधिकारीही सामील आहेत. बुलेट ट्रेन व वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प ग्रामीण भागातील जनतेच्या उरावर उभारण्यात येत आहेत.ग्रामीण भागातील…
पालघर, मच्छीबाजार फुलले ; खवय्यांची चंगळ सुरू, मात्र,माश्यांच्या दरात प्रचंड वाढ, गेल्या नारळी पौर्णिमेनंतर खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली.आता मच्छिमार बोटी समुद्रकिनारी परंतु लागल्या आहेत.येथे असलेल्या जेट्ट्या गजबजल्या असून मच्छीचे बाजारही सध्या तेजीत आले आहेत. दोन महिन्यांच्या बंदीच्या काळानंतर मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आता परतू लागल्या आहेत.त्यामुळे सकाळच्या प्रहरी समुद्रकिनारी घाऊक मासेखरेदी करण्यासाठी दररोज झुंबड उडत आहे.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना मासे भरपूर मिळाल्यामुळे मच्छीमारांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.सरंगा,हलवा,सुरमई,बोंबील,कर्ली,कोळंबी,मुशी व अन्य माश्यानी मच्छीबाजार फुलून गेले आहेत.श्रावण महिना संपल्यामुळे खवय्यानीही आपला मोर्चा मच्छीबाजारच्या दिशेने वळवला आहे.रवि,बुध व शुक्र.अशा तीन दिवशी मच्छीबाजारात प्रचंड गर्दी होत असते.तसेच मच्छीच्या दरातही ४० ते ५० रु.ने वाढ झाली…
दीपक मोहिते, महायुतीच्या गोटात घबराटीचे वातावरण, प्रख्यात ” लोकपोल,” संस्थेचा निवडणूक पोल जाहीर, काही मूठभर वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे वगळता अनेक खाजगी संस्थांतर्फे करण्यात आलेले सर्व्हेचा रिपार्ट पाहून महायुतीच्या गोटात घबराट पसरली आहे.” लोकपोल,” ही या क्षेत्रात एक नावाजलेली संस्था असून या संस्थेने आजवर जाहीर केलेले सर्व्हे तंतोतंत खरे ठरले आहेत.कर्नाटक,पंजाब व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पोल ८५ ते ९० % खरे ठरले होते.या संस्थेने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा पोल नुकताच जाहीर केला आहे. त्यांच्या सर्व्हेनुसार या विधानसभा निवडणुकीत महायुतीची प्रचंड पीछेहाट होईल,असे स्पष्ट करत आकडेवारी जाहीर केली आहे.या सर्व्हेनुसार भाजपला विदर्भ,मराठवाडा व उ.महाराष्ट्रात जबर फटका बसेल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या…
दीपक मोहिते, ” निवडणूक वार्तापत्र,” वसई/नालासोपारा विधानसभा ; भाजप-बविआ अशीच सरळ लढत होण्याची शक्यता, वसई व नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात भाजप वगळता इतर राजकीय पक्षाची ताकद नगण्य असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजप-बविआ अशीच लढत होईल,अशी शक्यता आहे.अजित पवार व शरद पवार गटाचे अस्तित्व शून्य असल्यामुळे ते ही निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडणार नाहीत.यातालुक्यात अजित पवार गटाचे स्वयंघोषित एकमेव जिल्हाध्यक्ष वगळता सर्वत्र सामसुमच आहे.या पक्षाची या तालुक्यात पक्षाची बांधणीच झाली नाही.कारण पक्षाकडे दोन चार जण वगळता तंबू रिकामाच आहे.एकनाथ शिंदे गटाचे तीन शिलेदार आहेत,मात्र त्यांना जनमानसात फारसे स्थान नाही.या गटाकडे कार्यकर्त्याचा प्रचंड दुष्काळ आहे.त्यामुळे हा गट या दोन्ही निवडणुका लढवण्याबाबत अत्यंत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सारं काही विस्मयजनकच दोन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपतीच्या निमित्ताने गेले होते.या घटनेमुळे देशभरात प्रचंड गदारोळ उठला.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आमंत्रण दिले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ” बिन बुलाये मेहमान,” त्यांच्याकडे गेले होते,हे यथावकाश कळेलच.आपले पंतप्रधान असेच एकदा पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्या घरी पोहोचले होते.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना आमंत्रण दिले होते की मोदी स्वतःहुन आले,हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याविषयी खुलासा करणे आवश्यक ठरते.त्यांच्या या भेटीवर घटनातज्ञ तसेच कायदेतज्ञानी आक्षेप घेतले आहेत.घटनातज्ञ बापट यांनी या दोघांची भेट,ही न्यायव्यवस्थेच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे असे स्पष्ट करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यांच्याकडे असलेल्या…
पालघर, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख १९ हजार ३३ मतदार, लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात सुमारे २२ लाख १९ हजार ३३ मतदार आपल्या हक्काचे ६ आमदार निवडणार आहेत.या एकूण मतदारांपैकी ११ लाख ५६ हजार ९९९ पुरुष तर १० लाख ६१ हजार ८०८ महिला मतदार असून इतर मतदारांची संख्या २२६ इतकी आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात १२८-डहाणू,१२९-विक्रमगड,१३०-पालघर,१३१-बोईसर,१३२-नालासोपारा व १३३- वसई,असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी १३१-नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८२ हजार ९०२ मतदार आहेत.त्यापैकी पुरुष-३ लाख १५ हजार ८२९ तर २ लाख ६६ हजार ९५३ महिला मतदार आहेत.येथे इतर मतदारांची संख्या अधिक आहे.१२० इतर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्वतःला देव समजू नका – सरसंघचालक मोहन भागवत, लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या दोघांमध्ये असलेली दरी अधिक रुंदावत चालली आहे.गेल्या आठवड्यात संघाच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले होते.या पूर्वी संघाचे मुखपत्र असलेल्या ” ऑब्झरर्व्हर,” मध्ये ” भाजपने केलेल्या चुकांमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला,” असा लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.चार दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी कोणीही स्वतःला देव समजू नये,असे आपल्या भाषणात सांगितले.त्यांचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने होता,हे काही लपून राहिलेले नाही. भाजप हा राजकीय पक्ष…
