- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, विरार येथे महिलांसाठी कार्यशाळा संपन्न, यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्यातर्फे खास महिलांसाठी व्यवसाय विषयक उपक्रम अंतर्गत विनामूल्य अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रशिक्षण आज साईबाबा मंदिर हॉल कारगिल नगर मनवेलपाडा विरार पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेस स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे,यंग स्टार ट्रस्टच्या रुचिता नाईक,मिलिंद पोंक्षे, भूषण चूरी,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता मनीष राऊत,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या,मनवेल पाडा विभागातील महिला वर्ग उपस्थित होता. सदर कार्यशाळेस उपस्थित महिलाना रुचिता नाईक यांनी अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळा संघटक सचिव व ट्रस्टचे समन्वयक अजिव पाटील यांच्या…
दीपक मोहिते, भयानक वास्तव, पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या व बुरशी, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थांच्या शरीरात क्रयशक्ती वाढावी,त्यांना कुपोषणाची लागण लागू नये,यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही दशकापूर्वी पोषण आहार योजना सुरू केली.पण शिक्षण विभागाचे अधिकारी व पुरवठादार यांच्या मिलीभगत मुळे या योजनेतील गैरप्रकाराला अक्षरश: उत आला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या २ हजार ३७१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये,गेल्या सहा महिन्यापासून जिवंत अळ्या आणि बुरशी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या.त्याची दखल घेऊन अनेक शाळांनी आपल्या वरिष्ठाना कळवले होते.तरीही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या फूडचे वाटप सुरूच आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी,गरीब मुलांच्या…
दीपक मोहिते, ” वास्तव,” तीन अपत्ये ; भागवतांचे वक्तव्य,अराजकाला आमंत्रण देणारे, जगभरातील अनेक देशात सध्या अशांतता निर्माण झाली असून अनेक देश युद्धाच्या खाईत ढकलले गेले आहेत.रशिया-युक्रेन,इस्रायल -पॅलेस्टाईन,लेबनॉन,इराण,इ.सुरू असलेले युद्ध थांबायचे नाव घेत नाही.सिरिया,लिबिया,श्रीलंका,बांगलादेश,पाकिस्तान, म्यानमार,इराक व पाकिस्तान या देशात प्रचंड अराजक निर्माण झाले आहे.त्याचा फटका आपण व आपला शेजारी असलेल्या नेपाळ या देशानाही बसण्याची शक्यता आहे. भारत व नेपाळ,या दोन्ही देशांनी अनेक वर्षापूर्वी लोकशाही व्यवस्था स्विकारली आहे.या दोन्ही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य,धर्मस्वातंत्र्य व मूलभूत अधिकार यास अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे.आपल्या देशाचा कारभार,हा भारतीय संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत केला जातो.मात्र गेल्या दहा वर्षात आपल्या देशाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली…
दीपक मोहिते, राजकीय घडामोडी, वसई-विरार शहर मनपा निवडणुका ; भाजपकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात, लोकसभा,विधानसभा व त्यानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.या निवडणुका सर्वसाधारणपणे फेब्रु.महिन्यात लागतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची एक व विधानसभेच्या सहाही जागा भाजपने जिंकल्या असून या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाचा पार धुव्वा उडाला आहे.त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.राज्याचे मंत्रिमंडळ अस्तिवात आल्यानंतर या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.महायुतीची निवडणूक यंत्रणा ही वर्षाचे बारा महिने निवडणुकीसाठी सज्ज असते.उमेदवार निवड,घटक पक्षाशी जागावाटपा संदर्भात बोलणी,इ.सोपस्कार तेवढे शिल्लक राहतात. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की या कामाना वेग येत असतो.वसई-विरार शहर…
दीपक मोहिते, भाकरी फिरणार, अमित शहा आता धक्का देण्याच्या तयारीत, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून धमासन सुरू असताना गृहमंत्री अमित शहा आता याप्रकरणी धक्का देण्याच्या तयारीत आहेत.पुण्याचे खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.असं जर घडलं तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांची अवस्था ” माका नका,तुका नका,घाल कुत्र्याला,” अशीच होणार आहे. निवडणुका झाल्यानंतर भाजप आपली वाघनखे बाहेर काढतील,असा अंदाज आम्ही लेखातून व्यक्त केला होता आणि धडले देखील तसंच,त्यांची वाघनखे बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आपले जन्मगाव असलेलं ” दरे,” गाव गाठावे लागले.खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव अचानक स्पर्धेत आलेले नाही.राज्यात भाजपला विजय मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छोट्या राज्यांची निर्मिती करणे गरजचे, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर संसदेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून गृहमंत्रालयाने याविषयी कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी अडगळीत पडली गेली. विकासाच्या दृष्टीने छोटी राज्ये निर्माण करण्यासाठी अधून मधून विविध गटाकडून मागणी करण्यात येत असते,पण वेळोवेळी या मागण्या केंद्र सरकार धुडकावत आले आहे.स्वतंत्र विदर्भासंदर्भात सहमती होत नसल्याचे कारण सांगत गृहमंत्रालयाने ही मागणी धुडकावून लावली आहे. गेल्या ७५ वर्षात विविध राज्यातील विषमता व विकासाच्या बाबतीत असलेला असमतोलपणा लक्षात घेता,छोटी राज्ये निर्माण करणे गरजेचे आहे.विषमता व असमतोलपणा,कायम राहिल्यास संघराज्याच्या अखंडता व ऐक्यास घातक ठरू शकते.राज्यनिर्मितीच्या वेळेस राज्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे यांचा आजार संपला ; त्यांचे हेलिकॉप्टर दरे गावातून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानकपणे उद्भवलेला आजार,आज अचानक तो बरा झाला व ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले.त्यांच्या या आजाराने मुंबईतील वैद्यकीय व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित झाला आहे.ज्या आजारावर केवळ दरे गावातच उपचार होऊ शकतो,असा कोणता आजार त्यांना जडला होता,हे फक्त त्या ईश्वरालाच माहित असले पाहिजे. पण झाले ते एकप्रकारे चांगलेच झाले,असे म्हणावे लागेल.आम्हा महाराष्ट्राच्या जनतेचा जीव अक्षरशः भांड्यात पडला.असो,पण आज अचानक त्यांना घाईघाईने मुंबई का गाठावी लागली,हे कोडे मात्र अद्याप सुटू शकलेले नाही.खरं सांगायचं झाल्यास,शिंदे यांना राजकीय सर्दी झाली होती.या राजकीय आजारामुळे…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पालघर ; चार विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी १२९ विक्रमगड,१३१ बोईसर,१३२ नालासोपारा व १३३ वसई या चार मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रिय निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे. हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर,राजेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांनी आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.या चारही मतदारसंघातील निकाल पाहून मतदार देखील सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचा अवघ्या ३ हजार १५३ मतांनी पराभव झाला होता.१३३ वसई विधानसभा मतदारसंघ हा आ.ठाकूर यांचा गेली तीस वर्षे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.त्या मतदारसंघात नवख्या उमेदवाराकडून त्यांचा…
दीपक मोहिते, सूर्यातीर, साडेसात दशकानंतरही देशासमोर वाढत्या आर्थिक विषमतेचे आव्हान, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपले राज्यकर्ते ” गरिबी हटाव,” चा नारा देत आले.मात्र प्रत्यक्षात गरिबी हटण्याऐवजी गरीबच हटवला गेला.लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी गेल्या साडेसात दशकात सरकारने शेकडो योजना आणल्या.पण अपेक्षित फलित साध्य होऊ शकले नाही.केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील अनेक देशासमोर गरिबीचा प्रश्न आ वासून उभा आहे.जागतिक बँकेने नुकताच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात जगात दीड अब्ज लोक गरिबीतून बाहेर पडल्याचे म्हंटलं आहे.त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा अनेक देशातील अभ्यासकांनी केला आहे.आपल्या देशातील ग्रामीण भागातील वार्षिक दरडोई उत्पन्न ६० हजार इतके आहे.अनेक देशात हे प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे.त्यामुळे जगातील गरिबी कमी झाल्याचा जागतिक…
दीपक मोहिते, ” ग्रामीण भागाचे वास्तव,” मनरेगा योजनेंतर्गत कामे सुरू करा,वेळेवर वेतन द्या अन्यथा आदिवासी समाजाच्या स्थलांतराला वेग, पालघर जिल्ह्यात शेतीची कामे सुरू होईस्तोवर ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध क्षेत्रात काम करून रोजगार मिळवत असतात.लाकडाच्या मोळ्या,रानभाज्या व फळे विक्री करून आदिवासी समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो.पावसाळ्यानंतर या आदिवासी मजुरांच्या हाताला काम नसते.त्यामुळे तो रोजगाराच्या शोधात शहरी भागात स्थलांतर करतो.पण ज्यांना स्थलांतरण करणे शक्य होत नाही,अशा आदिवासी कुटुंबातील महिला व शाळकरी विद्यार्थी रस्त्याच्या कड्याला बसून रानभाज्या विकत.या मजुरांच्या हाताला काम विकत असतात.ग्रामीण भागातील आदिवासी लोकांना रोजगार मिळवा,असा उद्देश डोळ्यासमोर काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली रोजगार हमी योजनेचे आता मनरेगा असे करण्यात…
