- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा, वाड्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या, तालुक्यातील जामघर, नेहरोली,गातेस,अब्जा या चार ग्रामपंचायतींना वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अमोल पाटील यांच्यावतीने १५ वित्त आयोग ( वंधित निधी ) सन २०२४- २५ मधून चार ग्रामपंचायतींना घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या.त्याचे लोकार्पण काल ग्रामपंचायत जामघर येथे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान या चार घंटा गाड्यांमुळे या ग्रामपंचायती मधील कचरा संकलनाचे काम आता सोपे होणार आहे. स्वच्छ व सुंदर गाव ठेवण्यासाठी या गाड्यांचा मोठा हातभार लागणार आहे. पाटील यांनी केलेल्या या कामाबद्दल या चार ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. यावेळी जामघर ग्रामपंचायतच्या सरपंच दया मोकाशी,सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत गोळे,…
संदीप जाधव,बोईसर, बोईसर – कुंभवली येथे महिलांसाठी विधी व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर अंतर्गत कुंभवली ग्रामपंचायत हद्दीत महिलांसाठी विधी व कायदेविषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,बचत गटांच्या महिला तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी सेविकांच्या स्वागत गीत व ईशस्तवनाने करून सरपंच ॲड.तृप्ती संख्ये यांनी महिलांचे हक्क,कायदे व महिलांना उपलब्ध असलेल्या विविध विधीमधील संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.पालघर प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना त्यांच्या…
नवीन पाटील,सफाळे, मुलींना स्वावलंबी जीवन जगता येईल,असे शिक्षण दिले पाहिजे – स.पो.नी. विजया गोस्वामी, पालघर जिल्हा हा आदिवासी व ग्रामीण भाग असून आजही येथे बालविवाहाचे मोठे प्रमाण दिसून येते.त्यामुळे मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल व स्वावलंबी जीवन जगता येईल असे शिक्षण दिले गेले पाहिजे,असे मत केळवा सागरी पोलीस स्टेशनच्या सहा.पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी व्यक्त केले.३ जाने.रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी ” बालिका दिन, ” व ” महिला मुक्तीदिन, ” साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधून संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे सफाळे देवभूमी येथे समाजातील कर्तृत्ववान महिला तसेच सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार…
संदीप मेहेर, पालघर, पालघर जिल्ह्यात ” स्वच्छ माझे आंगण,” अभियान, जिल्ह्यात कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहॆ.स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे,नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे,त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना,कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २० जाने. २०२५ या कालावधीत ” स्वच्छ माझे आंगण, ” अभियान राबवण्यात येत आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा -२ अंतर्गत स्वच्छतेची विविध कामे करण्यात येत आहेत.कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी…
संजय नेवे,विक्रमगड, सावरोली पाणीपुरवठ्याची पाण्याची टाकीचा काही भाग तोडण्यात येणार, विक्रमगड तालुक्यातील सावरोली गावातील काही पाड्यांसाठी ही योजना मंजूर झाली आहॆ.या योजनेची जलवाहिनी,विहीर अन्य कामे मार्गी लागली असून पाणी साठवणटाकीचे बांधकाम सुरू झाले आहॆ.या टाकीचे कॉलम व्यवस्थित नसल्यामुळे या टाकीचे काही कॉलम तोडण्याचा आदेश विक्रमगड येथील पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला दिले आहेत.ही कामे अशाच पद्धतीने चालू राहिली तर भविष्यात या जलजीवन मिशन योजनेचा पार बोजवारा उडालाशिवाय राहणार नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल, ” योजना,लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विक्रमगड तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे व्यवस्थित व सुरळीतपणे सुरू करावीत,अशी…
दीपक मोहिते, संतोष देशमुखांच्या लेकरांना न्याय मिळवून देणे,सरकारची नैतिक जबाबदारी, संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी एकामागोमाग पोलिसांना सापडू लागले आहेत.त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.हे सर्व आरोपी पुण्यात सापडल्यामुळे त्यांना आश्रय कोणी दिला ? आणि प्रदीर्घ काळ ते पोलिसांना का सापडू शकले नाहीत.या दोन प्रश्नांची उत्तरे सरकारच्या गृहविभागाने द्यायला हवीत.कारण हे सर्व आरोपी एकाच शहरात सापडतात,याचा अर्थ काय व कसा लावायचा ? वास्तविक बीड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा,जिल्ह्यात गेली अनेक वर्षे पाण्याचा कायम दुष्काळ असतानाही बीडच्या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेती/बागायती फुलवली.त्या जमिनीत गुन्हेगारीची पाळंमुळं कधी रुजली,हे खुद्द बिडवासीयांना कळले देखील नाही.संतोष देशमुख,हा कोणत्या जातीचा होता,यापेक्षा संकटात असलेल्या आपल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता हितेंद्र ठाकुराना लवकरात लवकर भाकरी फिरवावी लागणार आहे… कालच्या राज – का – रण ? या शीर्षकाखाली आपण राजकारणाच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकला होता.आज आपण ” अस का घडलं ? व त्यामागची नेमकी कारणे आहेत ? ” या दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.कालच्या माझ्या लेखाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.अनेकांना लेख आवडला,त्यामुळे आज दुसरा भाग लिहिण्याचे धाडस मी करत आहे. वसई तालुका हा एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता.अनेक वर्षे वर्तक घराण्याचे या तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व राहीले.ते वर्चस्व १९८० पर्यंत अबाधित राहिले.त्यानंतर समाजवाद्यांनी तो भेदला,पण तो त्यांच्या हातून निसटला व वसईच्या क्षितिजावर एक उदयोन्मुख…
वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यात बहरली ताग पिकाची शेती, रब्बी हंगामात अधिकाधिक उत्पादनासाठी वाडा तालुक्यातील शेतकरी विविध रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करीत आहेत.यावर्षी तालुक्यातील गो-हे विभागातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांनी ताग पिकाची पेरणी केली आहे. सध्या ही तागाची शेती चांगलीच बहरली आहे. वाडा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कलिंगड,टरबुज,फुलशेती या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन चांगले उत्पादन घेत आहेत.मात्र ही पिके अधिक खर्चिक असल्याने कमी खर्चात व कुठल्याही प्रकारच्या खतांची तसेच पाण्याची आवश्यकता नसलेल्या हरभरा,वाल मुग, तिळ, तुर ही नगदी पिके घेत आहेत.येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी खर्च व अधिक उत्पादन देणारे ताग,या पिकाची त्यामध्ये भर घातली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार,विक्रमगड…
नदीम शेख,पालघर, मोखाडा येथे तालुकास्तरीय शेतकरी मेळावा व प्रशिक्षण शिबिर संपन्न, प्रशिक्षण शिबिर म्हणजे तुम्हा शेतकऱ्यांना दिलेली माहिती, आपणास अनुभवानी ज्ञात आहेच पण त्या माहितीचा उपयोग आपल्या आपण प्रत्यक्ष शेती करताना अडचणी, त्रुटी अथवा पशु पालन यासाठी करावयाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.तसेच शेतकरी व पशुपालकांशी स्थानिक बोली भाषेतून संवाद साधत मार्गदर्शन केले. मोखाडा, जव्हार येथील शेती पिके उदा.तुर,नाचणी,वरी, सडीचे तांदूळ इ. बाजारात ब्रँड म्हणून विकले जातात,असे सांगून येथील स्थानिक शेतमाल व भाजीपाला कसा सेंद्रिययुक्त आणि दर्जेदार आहे व तो शेतकऱ्यांनी कसा विकला पाहिजे,याबाबत मार्गदर्शन केले. आज मोखाडा तालुक्यातील तालुकास्तरीय कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा…
सुरेश काटे,तलासरी, सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर होऊन समाज परिवर्तन घडवावे- प्राचार्य डॉ. राजपूत, आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नीता विवेकानंद देसले,केंद्रप्रमुख आमगाव,या वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच प्रा.डॉ.बी.ए. राजपूत,महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अर्जुन होन, उपप्राचार्य डॉ.आर.एन.पवार तसेच सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी प्रस्ताविकात त्यांच्या कवितेद्वारे सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा अत्यंत प्रभावीपणे मांडला. सावित्रीबाईंच्या पुरोगामी विचारांचे महत्त्व व तळागाळातील शिक्षणाची…
