Author: दीपक मोहिते

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” एसटी महामंडळाचे अध्यक्षपद : फडणवीस यांचा शिंदे गटाला आणखी एक धक्का, बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख असलेल्या प्रताप सरनाईक यांनी परिवहनमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच त्यांच्यामधील बांधकाम व्यवसायिक अचानक जागा झाला.त्यांची वाकडी नजर एसटी महामंडळाच्या हजारो कोटी रु.मोकळ्या जमिनीवर गेली आहे.या जमिनीचा विकास करून महामंडळाला तोट्यातून नफ्यात आणण्याचे ते ” हसीन सपने,” बघू लागले.पण राजकारणात बेरके असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरनाईकांचे प्रताप ओळखले व त्यांचे पंखच छाटून टाकले. फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेले महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेत,त्यांच्याजागी राज्याचे अति.सचिव संजीव सेठी यांची अध्यक्षपदी वर्णी लावली आहॆ. हा शिंदे गटाला आणखी एक धक्का असल्याचे मानण्यात येत आहॆ. परिवहनमंत्रीपदी…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर लवकरच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, पालघर जिल्ह्यात जव्हार येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणे व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा,अशा दोन मागण्या शिवसेनेचे शिंदे गटातील निकी नाईक यांनी केली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड व मोखाडा हे आदिवासीबहुल व अति दुर्गम तालुके असुन या भागात आरोग्याच्या समस्या मोठ्याप्रमाणात आहेत.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जिल्ह्यात दरवर्षी कुपोषण व साथीचे आजाराचा प्रादुर्भाव होत असतो.पण वरील आदिवासीबहुल तालुक्यात प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी मुंबई,नासिक व केंद्रशासित प्रदेशातील सेल्वासा येथे जावे लागते. या ज्वलंत समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात व…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीच्या विकासकामांना वेग, ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीच्या लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.गावातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून गरदवाडी आंब्याचापाडा येथे नवीन अंगणवाडीच्या बांधकामास नुकतीच सुरुवात झाली.या अंगणवाडी बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत,ग्राम सदस्य शंकर इल्हात,सामाजिक कार्यकर्ते नामदेव खिरारी, नाकिब लुलानिया यांसह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या गरजेनुसार विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.गटार बांधणी,रस्त्यांचे काँक्रीटीकरण,डांबरीकरण रस्ते,बहुउद्देशीय सभागृह, नवीन अंगणवाडी बांधकाम,तलाठी कार्यालय उभारणी,तसेच शाळा आणि अंगणवाडींच्या दुरुस्तीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. सरपंच कल्पेश…

Read More

संदीप जाधव,बोईसर कोट्यवधी रू.च्या रस्त्याच्या कामात अफरातफरी,स्थानिक ग्रामस्थामध्ये प्रचंड असंतोष, नागझरी – मासवन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम कोट्यावधी रु.खर्च होत असले तरी त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक नागरिक या रस्त्याच्या अपूर्ण कामासंदर्भात वारंवार तक्रारी करत असूनही संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात होऊन तरुणांचे बळी गेले.पण गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयारसुतक नाही.काल निहे येथील एका तरुणाचा रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागझरी येथील लाईफ लाईन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. नागझरी-निहे येथे शिवसाई कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.मात्र,या…

Read More

नवीन पाटील,सफाळे, सफाळे पोलिसांकडून विद्यार्थ्याना कायदेविषयक मार्गदर्शन, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या जनसंवाद अभियानातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुन्हे विषयक माहिती आणि त्यापासून सावधानता बाळगण्यासाठी सफाळे पोलीस ठाणे तर्फे हद्दीतील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयात नुकतेच जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त गाव अभियानांतर्गत सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना नुकतेच सायबर क्राईम,आर्थिक गुन्हयाचे प्रकार,अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक,ऑनलाईन नोकरी जाहिरात फसवणूक,ओएलएक्स फसवणूक लैंगिक फसवणूक केवायसी फसवणूक डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड फसवणूक याच्यापासून सावधनता कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर सायबर हेल्पलाईन क्र.१९३० वर संपर्क साधण्याच्या सुचना देण्यात आल्या.…

Read More

अनिल वैद्य,नाशिक विजया रहाटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला आज भेट दिली.यावेळी विद्यापीठाच्या कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प.,अ.वि.से.प., वि.से.प.यांच्या समवेत विद्यापीठाच्या ” ग्रीन कॅम्पसची,” पहाणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या,विद्यापीठाचा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीने तो विलोभनीय झाला आहे.ग्रीन कॅम्पसमध्ये लावण्यात आलेली विविध प्रजातींच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राणी व पक्ष्यांसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी आदर्श घ्यावा. विद्यापीठातर्फे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क…

Read More

दीपक मोहिते, ” मिशन एकनाथ शिंदे,” एकनाथ शिंदे सध्या ” हाताची घडी,तोंडावर बोट, ” अशा भूमिकेत, भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार मिशन सुरू केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना त्यांच्यावर सोडले आहे.विविध आघाडीवर शिंदे यांची कोंडी करण्यात यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद गणेश नाईक यांना देऊन ” कडवटपणाचे वर्तुळ,” पूर्ण केले आहॆ. मुख्यमंत्रीपद,खातेवाटप, पालकमंत्रीपद वाटप,या सर्व प्रक्रियेत शिंदे यांना भाजपने चांगलाच दणका दिला.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गणेश नाईक यांना देण्यात आल्यामुळे शिंदे प्रचंड नाराज झाले होते.ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात या दोघांमधून विस्तव जात नाही.मध्यंतरीच्या काळात गणेश नाईक हे गेल्या…

Read More

संजय लांडगे,वाडा, जवाहर नवोदय विद्यालयांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी- डॉ.सवरा, खा.हेमंत विष्णु सवरा यांनी संसदेत नियम ३७७ अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन मागणीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.यावेळी खा.सवरा म्हणाले,मी स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे,या विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी माझा सतत संवाद असतो. संपूर्ण देशभरात ५९० नवोदय विद्यालये कार्यरत आहेत आणि येथे कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा,ही त्यांची जुनी आणि न्याय्य मागणी आहे. जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले स्वायत्त संस्थान आहे.येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केंद्रीय नागरी सेवा ( पेन्शन ) नियम, १९७२…

Read More

सुरेश काटे,तलासरी खाजगी परीक्षाकेंद्रे बदलण्याची उमेदवारांची मागणी, पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षा फेब्रु.व मार्च महिन्यात आयोजित करण्यात आली आहॆ.या परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची नेमणूक झाली असताना अधिकृत परीक्षा केंद्र न देता खाजगी केंद्रावर परीक्षा ठेवण्यात आली आहे. दुय्यम व कनिष्ठ अभियंता ही अत्यंत महत्त्वाची पदे असून त्यासाठी खाजगी गल्लीबोळात देण्यात आलेल्या परीक्षाकेंद्रामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थी ९०० ते १००० रु.फी भरून विद्यार्थी चार ते पाच वर्षे तयारी करतात आणि अशा प्रकारे परीक्षा केंद्र मिळत असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे…

Read More

” टग्या,” फंटर लंख्येने अधिकाऱ्यांच्या काढल्या चड्ड्या, बहुचर्चित वसई विरार शहर महानगरपालिकेची लक्तरे आता वेशीला टांगली गेली असून दररोज एकामागोमाग नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत.” खंडणी व वसुली,हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो तुम्हा करदात्यांच्या उरावर बसून मिळवणारच,” असे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोधवाक्य बनवले आहे.या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.एक वरीष्ठ अधिकारी नामे अनिककुमार भवार व परेश कनाले या दोघांनी गेल्या तीन वर्षात महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. वसई विरार उपप्रदेशात या दोघांचे खंडणीखोर फंटर्स यांनी हैदोस घातला आहे.त्यांच्याच एका फंटरने दोन दिवसांपूर्वी हे एका ऑडिओ क्लिपने सिद्ध करून दाखवले आहे.रोहन लंख्ये या फंटरने आपले वरीष्ठ वसुलीच्या पैशासाठी कसा…

Read More