- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक २०२५,- रणसंग्राम,पालघर तालुका, जिल्हा परिषद निवडणूक ; भाजप,सेनेचा पालघरचा गड भेदणार… पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांपैकी पालघर – १७,डहाणू – १३ या दोन तालुक्यात एकूण ३० जागा आहेत.या दोन्ही तालुक्यातील जागांवर जो राजकीय पक्ष विजयी होतो,तो जिल्ह्यावर आपली हुकूमत चालवतो. कारण या दोन्ही तालुक्यात एकूण जागापैकी ५१ % जागा आहेत.त्यामध्ये पालघर तालुक्यात सर्वाधिक १७ गट आहेत.पालघर तालुका हा काही किरकोळ अपवाद वगळता कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतर या तालुक्यातील ८० % पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले व हा गट सत्तेत आला.त्यांच्या गटाचे प्रकाश…
दीपक मोहिते, ” वाढती गुंडगिरी, ” त्र्यंबकेश्वरच्या टोलवरील गुंडाची दहशत,पत्रकारांना जबर मारहाण, त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच,म्हणावा लागेल. याप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.याप्रकरणी सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अशी मागणी राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटनानी केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधूमहंताची आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होती,त्या बैठकीचे कव्हरेज करण्यासाठी नाशिक येथील काही पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.मात्र हे पत्रकार येथे आल्यानंतर त्यांना टोलवरील कर्मचाऱ्यांनी त्याना अडवले व टोल भरावा लागेल,असे सांगितले. त्यावरून पत्रकार व टोलच्या कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला.आम्ही…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१६, या प्रभागात भाजप व बविआ अशी सरळ लढत होण्याची शक्यता… प्रभाग क्र.१६ हा मध्यमवर्गीयांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.या प्रभागात सुमारे सातशे ते आठशे गृहनिर्माण संस्था आहेत.नगरपरिषदेच्या काळात या प्रभागात असंख्य बांधकामे उभी राहिली.त्याकाळी या वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना केवळ टँकरच्या पाण्याचा आधार होता.महिन्याकाठी रहिवाश्याना त्यासाठी हजारो रु.ची पदरमोड करावी लागत असे.नागरी सुविधांचा दुष्काळ असताना नगरपरिषदेने सरसकट बांधकाम परवानग्या दिल्या.त्यामुळे हजारो सदनिकाधारकाना अनेक वर्षे मरणयातना भोगाव्या लागल्या व आजही ते भोगतच आहेत.विविध जाती – धर्माचे लोक या प्रभागात वास्तव्याला आहेत.पण त्यांना अनेक अडचणी व नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनधिकृत इमारती मोठ्या संख्येने आहेत.पण कुतूहलाची…
दीपक मोहिते, ” निवडणूक खबरबात,” बविआ व महाविकास आघाडी यांचे एकत्र येणे,भाजपच्या पथ्यावर पडणार… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले असले तरी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजप सावध भूमिका घेत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सोन्याची अंडी देणारी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी हे दोन्ही पक्ष सध्या जपून पावले टाकत आहे.भाजप मात्र अधून मधून स्वबळाचा नारा देत लोकांचा कल कुठे आहे ? याचा अंदाज घेत असतो.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य लक्षात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अपप्रवृत्तीच्या लोकांना वेळीच दूर करा,अन्यथा… सार्वजनिक जीवनात वावरताना नेतेमंडळींनी सामाजिक भान राखण्याची गरज असते,पण हल्ली महायुतीच्या नेत्यांना त्याच्याशी वावडे असल्याचे आजवर घडलेल्या अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे जत विधानसभेचे आ.गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.त्यांच्या या टिकेनंतर राज्यभरात त्याचे जोरदार पडसाद उमटले.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यानंतर फडणवीस यांनी अतिशय सौम्य शब्दात पडळकर याना ” अशाप्रकारची टीका करणे,योग्य नाही व यापुढे असे घडता कामा नये,” असे स्पष्ट केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पं.स.निवडणूक रणसंग्राम – विक्रमगड, विक्रमगडच्या निवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व राहणार, तलासरी व डहाणू तालुक्याप्रमाणे विक्रमगड तालुका देखील आदिवासीबहुल तालुका आहे.त्यामुळे या तालुक्यालाही आदिवासी दर्जा मिळाला आहे.या तालुक्याचा बराचसा भाग जंगल,डोंगर व दऱ्या खोऱ्याने व्यापलेला आहे.या तालुक्यात दरवर्षी सरासरी अडीच हजार मी.मी.पाऊस पडतो.येथील स्थानिक भूमिपुत्र हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत व त्यांचे भातपिक हे प्रमुख पीक आहे.तसेच डोंगराळ भागात नागली,वरई व खुरासणी पिके घेण्यात येतात.२६ जाने.२००२ साली या तालुक्याची निर्मिती झाली,मात्र या तालुक्याने गेल्या २३ वर्षात कात टाकली नाही.या काळात जनतेच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकली नाही.त्यामुळे आजही हजारो कुटुंबे दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत पाहायला मिळतात.सरकारची उदासीनता…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१५, प्रभागात वाहतूककोंडी व अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद,नागरिक त्रस्त.. नालासोपारा शहराच्या पूर्वेस असलेल्या या प्रभागात गुजराती व उत्तर भारतीय समाजाचे चांगलेच प्राबल्य आहे.या प्रभागात व्यापारउदीमाचे चांगले जाळे असून लहानमोठ्या हजारो अनधिकृत फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो.दुकाने कमी आणि अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट अधिक असा हा परिसर आहे.रेल्वे स्थानक परिसरात दररोज सकाळ व संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी ही येथील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.या भागातील पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे धाडस ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे ना पोलिस यंत्रणेमध्ये आहे.आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आपली वाहने बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते.या शहरात अनधिकृत रिक्षा व फेरीवाल्यांची संख्या आजच्या घडीला हजारोच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१४, या प्रभागात समस्यांचा डोंगर ; लोकप्रतिनिधी व नोकरशाही कुंभकर्णाच्या निद्रेत, नालासोपारा पश्चिम भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात संमिश्र अशी समाजरचना आहे.गुजराती,मराठी, मुस्लिम,दाक्षिणात्य व काही अंशी ख्रिस्ती,असा हा सर्वसमावेशक प्रभाग आहे.विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.नागरी सुविधांचा पत्ता नसतानाही नगरपरिषदेच्या काळात सर्रास बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या.त्यामुळे नियोजनाअभावी या शहराचा चेहरा पार विद्रुप होत गेला.त्याचा त्रास मात्र करदात्यांना सहन करावा लागला.वास्तविक त्रास म्हणण्याऐवजी येथील नागरिकांनी प्रचंड यातना भोगल्या,असं म्हंटल्यास ते चुकीचे ठरणार आहे.नगरपरीषद असताना लोकप्रतिनिधी व नोकरशाहीने आपल्या भ्रष्ट कारभाराने शहराचे अक्षरशः लचके तोडले व त्यानंतर आलेल्या महानगरपालिकेनेही नगरपरिषदेच्या पावलावर पाऊल ठेवत आपला कारभार केला.त्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तरीही समुद्रकिनारे अस्वच्छ का ? काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपचे मंत्री,खासदार,आमदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशभरातील समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई करून साजरी केली.प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षी समुद्रकिनारी असे साफसफाईचे उपक्रम राबवत असतात.आपल्या नेत्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सारा अट्टाहास असतो.अशा उपक्रमाचे आपण कौतुक करायला हवे व ते आपण करतो देखील.आकर्षक हातमोजे व डोक्यावर सुरेख कॅप्स व नजरेत भरेल,अशी वेशभूषा करून हे सर्व कार्यकर्ते सकाळी रामप्रहरी उपाशीपोटी समुद्र किनाऱ्यावर उतरतात.प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी देखील आपल्या कॅमेरामनसह हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत सज्ज असतात.रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी लवकर…
दीपक मोहिते, सरकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा वाढवणे ; सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत, सरकारने काही वर्षांपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे केले होते आणि अनेक राज्यांनीही त्याचे अनुकरण केले आहे.मात्र,महाराष्ट्र सारख्या काही राज्यांमध्ये अद्यापही हे वय ५८ वर्षे आहे.त्यामुळे,महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने सातत्याने ही मागणी लावून धरली आहे.ही वयोमर्यादा पून्हा ६० इतकी करण्यात यावी.ही मागणी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना मारक ठरणारी आहे.त्यामुळे विद्यार्थी संघटनाचा ही वयोमर्यादा वाढवण्यास ठाम विरोध आहे.ही वयोमर्यादा वाढवण्यासाठी खालील निकषाचा आधार घेण्यात यावा,असे महासंघाचे म्हणणे आहे. १.अनुभवी आणि कुशल अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे प्रशासनाला त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा मिळत नाही. सेवानिवृत्तीचे…
