Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२४, ख्रिस्ती व गुजराती मते निर्णायक ठरण्याची शक्यता… या प्रभागात ख्रिस्ती, गुजराती,दाक्षिणात्य व हिंदू मतदारांचा समावेश आहे.वसई रोड विभागात हा परिसर अत्यंत गजबजलेला तसेच दिवसभरात अठरा तास व्यस्त असणारा असा प्रभाग आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागाची ओळख बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला अशी आहे.तो भेदण्यासाठी यंदा भाजप जोरदार तयारी करत आहे. सर्व राजकीय पक्षाची भिस्त या प्रभागातील ख्रिस्ती व गुजराती मतदारांवर आहे.पूर्वी ख्रिस्ती समाज हा कायम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला झुकते माप देत आला,पण गेल्या काही वर्षात बहुजन विकास आघाडीने या मतपेटीवर डल्ला मारला व प्रत्येक निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली.महानगरपालिका निवडणुकीत मात्र त्यांना भाजपच्या आव्हानाला सामोरे…

Read More

दीपक मोहिते, अर्नाळा येथे पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न, अर्नाळा बस आगाराला देण्यात आलेल्या नव्या एस.टी.बसेस म्हणजे जनतेसाठी दिलासा असुन ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाला नवे बळ मिळाले आहे,असे उदगार वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या बसेसच्या शुभारंभ प्रसंगी काढले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वसईकर प्रवाश्यांतर्फे आभार मानले. याप्रसंगी त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या,एस.टी.बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसेसने रोज प्रवास करतात.त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित,आरामदायी आणि सोयीचा व्हावा,यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होते.त्याला यश आले व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे अर्नाळा बस आगारासाठी पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज या पाचही…

Read More

दीपक मोहिते, वर्षानुवर्षे रखडलेली प्रलंबित विकासकामे जलदगतीने मार्गी लागणार – आ.स्नेहा दुबे पंडित, वसई विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली विकासकामे वेगाने मार्गी लागावी, यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी काल पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. वसईतील महत्वाचे रस्ते, उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना गती देण्यासाठी काल पुन्हा वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, उड्डाणपूल तसेच रेल्वे ओव्हर ब्रीजचे प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. वसईच्या आमदार म्हणून निवडून आल्यावर नागपूर येथे झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रश्नावर शासनाचे…

Read More

दिपक मोहिते, धनदंडग्यांना रान मोकळे, वाढवणनंतर मुरबे पंचक्रोशीतील मच्छिमार समाज उध्वस्त होण्याच्या मार्गावर… पालघर जिल्ह्यात डहाणू – वाढवण येथे १ लाख कोटी रु.खर्चून उभारण्यात येत असलेल्या महाकाय वाढवण बंदरानंतर केंद्र सरकारला पालघर तालुक्यातील मुरबे येथे व्यापारी बंदर उभारण्याची गरज का भासली,हे आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहे.पालघरवासीयांच्या उरावर हे दुसरे बंदर का उभारण्यात येत आहे ? याच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागणार आहे.वाढवण बंदराप्रमाणे या बंदराला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असून स्थानिक भूमिपुत्र रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.पालघर तालुक्यातील मुरबे समुद्रकिनारी हे बारमाही बंदर उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून पर्यावरण विषयक परवानग्या प्राप्त करण्याचे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शहरे जोडणाऱ्या रस्त्यासाठी भरीव आर्थिक निधी तर ग्रामीण भागातील रस्ते वाऱ्यावर… राज्य व केंद्र सरकार देशभरातील महत्वाची शहरे एकमेकांशी जोडण्यासाठी एकीकडे लाखो कोटीची उड्डाणे घेत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यासाठी निधी नसल्याचे सांगत आहे.डहाणू – वाढवण येथील प्रस्तावित बंदरात उतरलेला माल वेगाने शहरी भागात पोहोचवण्यासाठी सरकारने पालघर-इगतपुरी – नाशिक जलदगती मार्ग प्रस्तावित केला आहे.त्यासाठी सरकारने आपली तिजोरी सताड उघडी ठेवली आहे.तर ग्रामीण भागातील रस्त्यासाठी आपला कटोरा ठणठण गोपाळ असल्याचे सांगत सुटले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची सध्या पार दुरावस्था झाली असून निधी अभावी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला आहे.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२३, प्रभागात अद्ययावत मार्केट व पार्किंगची व्यवस्था हवी, सर्वात कमी क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या या प्रभागात विविध जाती धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यगोविंदाने राहत आहेत.साधारणपणे हे लोक मध्यमवर्गीय गटातील लोक म्हणून ओळखले जातात.हा भाग विकसित असा असून काही किरकोळ अपवाद वगळता या प्रभागात राहणारे लोक सुखी व समाधानी आहेत.या प्रभागात गुजराती समाजाचे चांगले प्राबल्य आहे.हा समाज व्यापार उदिमामध्ये सक्रिय आहे. मुस्लिम समाजाचेही व्यापारी क्षेत्रात बऱ्यापैकी योगदान आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निवडून येत आहेत.परंतु या निवडणुकीत त्यांच्यासमोर या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.हे आव्हान ते कसे पेलतात,यावर,त्यांचे यश अवलंबून आहे.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकार,खनिज संपन्न जिल्हे उद्योजकांच्या घश्यात घालत आहेत…. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ” चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळे राज्यात समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार असल्याचे म्हंटले आहे.या दोन्ही जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या खनिज विकास निधीतून अनेक महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे आपल्या भाषणात सांगितले.कॅन्सर इस्पितळ,कौशल्यावर आधारीत रोजगार निर्मिती,पायाभूत सुविधांचा विकास,शिक्षण व अन्य क्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे.सरकारचा उद्देश चांगला आहे.पण तो केवळ कागदावर राहता कामा नये.कारण,आजवरचा अनुभव लक्षात घेता या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र नागवला गेला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार…

Read More

सुरेश काटे,तलासरी कुरझे धरणातून पाण्याचा विसर्ग,८५ घरांचे नुकसान.. तलासरी तालुक्यातील कुर्जे धरणातुन काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमूळे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे वेरोली नदी लगत असलेल्या वडवली, सवणे,वंकास गावातील जवळपास ८५ घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्यासह, सामानाचे नुकसान झाले. कोणतीही आगाऊ सूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.घरात पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे तसेच पोलिसांकडून देण्यात आली. गावातील घरात पाणी घुसल्याचे माहिती मिळताच महसूल कर्मचारी, पोलीस घटना स्थळी पोहोचून मदत कार्य सुरु केले, दोन दिवसापासून तलासरी भागात मुसळधार पाऊस पडत आहे,या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत,तलासरीत…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात भातपीक नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात, वाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने भात पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.या नुकसानीची पाहणी करण्यास आज दुपारनंतर सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम,वाडा झिणी हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे.या वाणाबरोबरच गुजरात ४,गुजरात ११,सुरती, पुनम,जया,कोलपी,रत्ना, कर्जत ३,कर्जत ४ आदी वाणांची लागवड तालुक्यात केली जाते.१५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड तालुक्यात होत असते.यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते,मात्र गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने तसेच तानसा, वैतरणा व मोडकसागर…

Read More

तलासरी प्रतिनिधी, तलासरी भागात मुसळधार पाऊस, तलासरी भागात काल संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्याना पूर आला आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची नोंद नाही. पावसामुळे गरबा खेळता येत नसल्यानमुळे तरुणाई हिरमूसली आहे,मंडप, डेकोरेशन,डीजे,ऑर्केस्ट्रा यावर केलेला लाखो रु.चा खर्च वाया गेला आहे. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे गरब्या साठी टाकलेले मंडप उडून गेले. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या,त्यामुळे भागातील अनेक पूल पाण्याखाली गेले व वाहतूक बंद पडली.अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे बाजारपेठेत शुक शुकाट दिसत होता.

Read More