Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकारच पक्षांतर कायद्याची मोडतोड करण्यात अग्रेसर, लोकशाही व्यवस्थेमध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये कोण जिंकणार व कोण हरणार याच्याशी सर्वसामान्य जनतेला कोणतेही देणेघेणे नाही.आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक कोण करतो,आपले गाऱ्हाणं कोण ऐकून घेतो,याचा ते विचार करत असतात.त्याला घोडेबाजार,एकमेकांची माणसे फोडणे,या अशा विषयात बिलकुल स्वारस्य नसते.चालायला धड रस्ते,पिण्याचे शुद्ध पाणी,रोगराईमुक्त परिसर, दर्जेदार शिक्षण,प्रभावी वैद्यकीय सेवा व अडचणी/ समस्यांचे निराकरण,जे लोकप्रतिनिधी करतील,त्यांच्याच पक्षाला लोक डोक्यावर घेतात,असा आजवरचा अनुभव आहे.सत्तेसाठी होणारी हाराकीरी,एकमेकांच्या उरावर बसणे,आमिष दाखवून एकमेकांची माणसे फोडणे,इ.बाबी या मतदारांच्या लेखी दुय्यम आहेत.जो लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या विचारसरणीला मूठमाती देत अन्य विचारसरणीच्या पक्षात जातो,तो…

Read More

पालघर प्रतिनिधी, मुरबे गावात रात्रभर ड्रोनचा वावर, मौजे मुरबे येथे रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे सुरू असलेल्या संशयास्पद वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी सातपाटी सागरी पोलीस ठाणेत लेखी तक्रार दाखल करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसापूर्वी रात्री सुमारे ११:३० ते १:३० च्या सुमारास तीन ते चार मोठ्या आकाराचे ड्रोन मुरबे गावाच्या परिसरात फिरताना दिसले.हे ड्रोन गावाच्या आतील भागाचे तसेच आजूबाजूच्या परिसराचे छायाचित्रण करत असल्याचे दिसून आले.ड्रोनचे उड्डाण रात्रीच्या वेळी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण झाली होती. या ड्रोनचा उद्देश काय होता, आणि ते कोणत्या संस्थेकडून पाठवण्यात आले होते,याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने…

Read More

सुरेश काटे,तलासरी, उधवा ग्रामस्थांनी स्वखर्चाने बनवला रस्ता, उधवा केवडीपाडा येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती,या रस्त्यावरून वाहन चालवणे व साधे चालणेही अवघड झाले होते. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत उधवा केवडीपाडा येथील ग्रामस्थानी उधवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अनेक विनंती अर्ज केले पण करतो यापलीकडे कोणतेही उत्तर मिळत नसल्याने अखेर केवडी पाड्यातील ग्रामस्थानी स्वखर्चाने आणि श्रमदानाने केवडीपाड्यात येणारा रस्ता बनवला. उधवा केवडीपाडा येथील कच्चा अत्यंत खराब झाला होता,रस्त्यात मोठे खड्डे पडले होते,खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठे नुकसान होत होते, पावसाळ्यात चालणेही अवघड झाले होते,हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून गावातील तरुण वर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार भेटून विनंती अर्ज…

Read More

वसंत भोईर,वाडा अवकाळी पावसामुळे वाड्यातील भातशेतीची दैना, तालुक्यात भात कापणी जोमात सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे.पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले असून, मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या या अवकाळी पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तालुक्यात सध्या भातकापणी वेगाने सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे. पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले आहे.मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या पावसामुळे भाताचे पीक सुकत नाही आणि ते आता वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. भिजलेल्या भातपिकांचे कृषी विभागाने लवकरात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आयाराम गयारामाचे आवागमन तूर्तास थंडावले आहे… गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सुरू झालेले इनकमिंग सध्या काही अंशी थंडावले आहे.ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू झाले होते,त्यामुळे जुन्याजाणते भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे,परिणामी ही मोहीम सध्या आवरती घेण्यात आल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया सुरू झाली होती.त्यास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला होता.पण,नव्याने दाखल झालेल्या आयारामामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही,याविषयी भिती निर्माण झाली आहे.बाहेरून येणाऱ्यांचा ओघ असाच सुरू राहीला तर आपले राजकीय भवितव्य अंधारात सापडेल,अशा विवंचनेत अनेक इच्छुक उमेदवार सापडले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर जुने – नवे असा कलगीतुरा रंगण्याची…

Read More

दीपक मोहिते, ” आम्हा मतदारांची सनद,” १ ) शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालये महानगरपालिकेकडे कधी हस्तांतरीत होणार ? हस्तातरण प्रक्रियेत कोणत्या अडचणी आहेत. २ ) महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याची डागडुजी,दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा मुहूर्त कधी ? वर्षानुवर्षे अशीच लूट होत राहणार का ? ३ ) शहरातील करदात्यांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा कधी उपलब्ध होणार ? ” आपला दवाखाना,” योजनेची सद्यस्थिती पाहता,ही व्यवस्था फार काळ चालणार नाही,असे करदात्यांना वाटते ? त्यामध्ये किती तथ्य आहे ? ४ ) शहरातील पाच उड्डाणपूल व रिंगरुट रखडण्यामागची नक्की कारणे काय होती ? महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले…

Read More

दीपक मोहिते, स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडणुकीच्या प्रचारात कोणकोणते मुद्दे चर्चेत असतील,याविषयी काही प्रमुख राजकीय पक्ष अंदाज घेत आहेत.विकासाचे स्थानिक प्रश्न,लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार व लाडक्या बहिणीवर कमी झालेला योजनेचा प्रभाव,” आनंदाचा शिधा,” योजनेचा झालेला बट्ट्याबोळ,उद्धव व राज ठाकरे बंधूंचे मनोमिलन,हे सारे मुद्दे प्रचारात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच या निवडणुका वेळेवर होतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व निवडणुका पुढील महिन्यात होतील,असा अंदाज व्यक्त होत असताना निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्याचे पुनर्निरिक्षण करण्याची झालेली घोषणा व राज्य सरकारने या निवडणुका काही काळ पुढे…

Read More

वसंत भोईर, कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक, तालुक्यातील गौरापुर कातकरी वाडी येथील १० वर्षे शालेय वयोगटातील आदिवासी कातकरी मुलीला उत्तन येथे मच्छी वाळवणे आणि घरगुती कामे करण्यासाठी जबरदस्तीने बालमजूर म्हणून राबवण्यात आले,अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुलीच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे की,आरोपी ज्युलीयाना लेजली पाटील ( रा. उत्तन चौक,भायंदर वेस्ट, ठाणे) हिने मुलीला घरकाम व मच्छी कामासाठी जोरजबरदस्तीने घेऊन गेली व काम न केल्यास शिवीगाळ व मारहाण केली.गेल्या वर्षी गणपती सणापासून ते जून २०२५ पर्यंत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध घरकामासाठी वापरले गेले,तसेच आगाऊ बयाणा रक्कम कुटूंबियांना देण्यात आली.काल…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज…. औद्योगिक,शैक्षणिक,राजकीय व सामाजिकदृष्टया प्रगत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात घसरण का होत आहे ? हा चिंतेचा विषय असून त्याचे पडसाद आता उमटु लागले आहेत.दरडोई आर्थिक उत्पन्न वाढले असले तरी महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यजन होरपळुन निघत आहे.” शिक्षणाचा अधिकार,” कायदा मंजूर होऊनही ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण वाढू शकले नाही,आरोग्य व वैद्यकीय सोयी – सुविधा क्षेत्रातही गेल्या ७५ वर्षात भरीव काम होऊ शकले नाही.वीजनिर्मिती,उद्योगधंदे,कृषीक्षेत्र, रोजगारनिर्मिती,या प्रमुख ज्वलंत विषयाकडे एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.सन २००५ पर्यंत वीजनिर्मितीचा एकही प्रकल्प मार्गी लागू शकला नाही.एनरॉन वीज प्रकल्पाचे काय झाले ? याविषयी न…

Read More

दीपक मोहिते, जेव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…. वसई तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा व भलेमोठे खड्डे,यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.भाजप व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांची उणीदुणी काढत उरावर बसत आहेत,त्यामुळे वसई तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.मात्र रस्त्यावरील हे खड्डे सुद्धा आता बोलायला लागले आहेत.” आम्हा खड्ड्याचा यामध्ये दोष तो काय ? आम्हाला कोणी जन्माला घातले ? आमचे डांबर कोणी चोरले ? ” खड्डेमय रस्ते,” असे नामकरण कोणी केले ? आमच्या जखमांवर पॅचवर्क करण्याच्या नावावर ओरबाडून खाणारे कोण ? असे एक ना अनेक प्रश्न हे खड्डे आता विचारू लागले आहेत.त्या बिचाऱ्या खड्ड्याना त्यांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळू शकणार…

Read More