- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिच्चारे खड्डे,विनाकारण बदनाम होत आहेत, रस्त्यावरील खड्ड्यावरून वसईतील राजकारण बरेच तापू लागले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नी चांगलेच धारेवर धरले आहे.विरोधक व सत्ताधारी यांच्यात सुरू असलेल्या या संघर्षात नागरिक व रस्त्यावरील खड्ड्यांचे मात्र नाहक मरण होत आहे.खड्ड्यांचे म्हणणे आहे की ज्यांनी डांबर खाल्ले आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक केवळ मजा बघताहेत,ते नामानिराळे राहत असून आम्ही खड्डे व नागरिक मात्र मरणयातना भोगत आहोत.आमचे दुःख कोणी ऐकायला तयार नाही. दरवर्षी पावसाळा संपला की आमच्यावर उपचार ( दुरुस्ती व डागडुजी ) करण्यात येत असायचे,पण यंदा हे उपचार का होत नाहीत,याविषयी काहीच उलगडा होत नाही.अशीच परिस्थिती राहिली तर रस्त्याची अवस्था…
दीपक मोहिते, वसई तालुक्याच्या रस्त्यावरील खड्डे आता बोलू लागले…. नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिधीनींना ते आता जाब विचारू लागले आहेत.” अरे तुमच्यापैकी कोणीतरी जबाबदारी स्विकारा… आपल्या मतदारसंघातील नागरिक व खड्ड्यांना असे वाऱ्यावर सोडून कसे चालेल ?” असे परिसरातील नागरिक व खड्ड्याचे म्हणणे आहे.यंदाच्या पावसात,आमची पाठ सोलून निघाली आहे. केवळ मलमपट्टी करून ( पॅचवर्क करून ) आमच्या जखमा भरल्या जाणार नाहीत.त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे,गरजेचे आहे.पण नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून या दुर्धर संकटाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे.प्रशासनातील अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे आहेत,त्यांची ही गेंड्याची कातडी या लोकप्रतिनिधींनी सोलायला हवी होती.पण या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेत केवळ रिल्स बनवण्यात धन्यता मानली.त्यामुळे वसई -…
दीपक मोहिते, 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️ उठा उठा निवडणूक आली, जोडे उचलण्याची वेळ झाली… लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूया, चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. कोणी पार्थ घ्या, कोणी रणजित घ्या, कोणी आदित्य घ्या, अमित घ्या, कोणी रोहित घ्या, अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या… घराणेशाही बळकट करूया, चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. दत्तांची प्रिया अन महाजनांची पूनम, शिंदेची प्रणिती, तटकरेची आदिति, गायकवडांची वर्षा, सुळ्यांची सुप्रिया, गांधींची प्रियंका अन मुंड्यांची प्रीतम अन पंकजा.. महिलाशक्तीचा जागर करूया, चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. ठाकरे,महाजन,नाईक पवार,मुंडे,शाह,चौहान, चव्हाण,गांधी,मलिक आणि यादव घराणी हीच तर देशाची खरी संपत्ती… घराणेशाहीचा वारसा बळकट करूया… चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. चपटीतला पेग,अन मटणाचं हाडुक, आपापल्या…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये मतदारांनी डोळसपणे मतदान करायला हवे, काल राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडली.यापूर्वी प्रभाग रचनाही शांततेत पार पडली होती.त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून कधी जाहीर करण्यात येतो,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.गेली अनेक वर्षे रखडलेल्या या निवडणुका आता मार्गी लागणार असल्यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे जाने.महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नगरपरिषद,नगरपंचायती, जिल्हा परिषद,पंचायत समिती व महानगरपालिका इ.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जातात.तमाम राजकीय पक्षाचे आर्थिक स्रोत असलेल्या…
दीपक मोहिते दिल्ली बॉम्बस्फ़ोट प्रकरणी चार जण तपास यंत्रणाच्या ताब्यात, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एका हॉस्पिटलमधील चार डॉक्टर्सची नाव समोर आली आहेत.हा हल्ला आत्मघातकी दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. याप्रकरणी सुरु असलेल्या तपासाला वेग आला आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी शक्तीशाली स्फोट झाला होता. या स्फोटाने राजधानीचे शहर असलेली दिल्ली हादरली.संध्याकाळी ६.५२ मिनिटांनी हा शक्तीशाली स्फोट झाला होता.यास्फ़ोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला तर २०जण जखमी झाले आहेत.स्फोट इतका शक्तीशाली होता की,आसपासचा परिसर प्रचंड हादरला.परिसरात एकच गडबड,गोंधळाची स्थिती होती.आय-२० कारमध्ये हा स्फोट झाल्याचं तपासातून समोर आले आहे.घटनेच्या ३ तास अगोदर ही…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” … तर एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे काही खरं नाही… एकनाथ शिंदे यांची हतबलता आणि अजित पवार यांची बिकट अवस्था लक्षात घेता,या दोघांची भाजप सोबत असलेली सोयरीक फार काळ टिकेल,असं वाटत नाही.भाजपसोबत जाण्याचा निर्णय ” हात दाखवून अवलक्षण ” करून घेण्यासारखा होता.आज भाजपने या दोघांची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी करून टाकली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर भाजप या दोघांच्या हाती नारळ देईल,अशी शक्यता आहे.त्यावेळी शिंदे व पवार या दोघांनाही कळून चुकेल की स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपण हे काय करून बसलो.इतकी वर्षे राजकारणात सक्रिय असूनही शिंदे व पवार या दोघांना फडणवीस यांची चाल ओळखता आली…
दीपक मोहिते, दिल्लीत भीषण स्फ़ोट ; आठ जणांचा जागीच मृत्यू,तर अनेक जण जख्मी… काल सांय. ७.०० च्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फ़ोटात ८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जख्मी झाले आहेत.या प्रकरणी सुरक्षा यंत्रणानी एका महिला डॉक्टरसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे.हा आत्मघाती हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर देशभरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री ९.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार,या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी माध्यमाशी फोनवरून बोलताना मृतांच्या संख्येबाबत ही माहिती दिली.स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका कारमध्ये हा स्फोट…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करू शकणार नाही… बहुजन विकास आघाडी,अखेर महाविकास आघाडीमध्ये सामील झाली.वाडा नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ते एकत्रितपणे लढणार आहेत.पण या आघाडीमध्ये मनसेला सामावून घेतले की कसे,याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही.कारण पालघर येथे झालेल्या बैठकीत मनसे सहभागी झाला नव्हता.जर मनसे सहभागी झाला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका काय असेल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँगेस,या घटक पक्षाची धुरा ज्या पदाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे,त्यांच्या कारकीर्दीवर एक नजर टाकणे जरुरीचे ठरते.कारण,चार पैकी तिघांना…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो… बिहार राज्यातील निवडणुकांचा निकाल येत्या १४ नोव्हें.रोजी लागणार आहे.हा निकाल कसा असेल,यावर विविध संस्थांनी आपले एक्झिट पोलही जाहीर केले आहेत.ते किती खरे ठरतात,हे उद्या पहिल्या दोन तासात होणाऱ्या मतमोजणीतुन स्पष्ट होणार आहे. बिहार राज्यात भाजप व नितीशकुमार यांच्या जनता दल ( निरपेक्ष ) यांच्या समोर जनसुराजचे प्रशांत किशोर व राजदचे तेजस्वी यादव यांनी प्रचंड आव्हान उभे केले आहे.भाजप व जेडीयु यांच्या युतीला खरा धोका प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे असून,या निवडणुकीत भाजप व जेडीयु युतीचा पराभव झाल्यास त्याचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता आहे.मात्र या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास महाराष्ट्रात…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” महानगरपालिका काबीज करण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजप सज्ज, भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ” आम्हाला आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्या कुबड्यांची गरज नाही,” असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून स्वबळाचा नारा दुमदुमू लागला आहे.पुणे,भंडारा,मुंबई,पालघर,ठाणे,नागपूर व अन्य जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे.ठाण्यात तर भाजपची सारी यंत्रणा शिंदे गटाची डाळ या निवडणुकीत शिजता कामा नये,यासाठी सक्रिय झाली आहे.भाजपने राजकीय पक्षाचे महत्वाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाजपने पालघर जिल्ह्यातही असेच धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी,नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क सुरू झाला आहे.वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन…
