Author: दीपक मोहिते

वसई-विरार मनपा क्षेत्राला देहर्जे प्रकल्पातून १९५ द.ल.लि.पाणी मिळणार, पालघर, देहेर्जे प्रकल्पातून वसई विरार शहर महानगरपालिकेस १९५ द.ल.ली.पाणी उपलब्ध करून देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी संबधित विभागांना निर्देश दिले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सन २०५५ च्या प्रस्तावित लोकसंख्येस पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी देहेर्जे मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्याबाबतच्या आ.हितेंद्र ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले होते.उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच विधानभवन,मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकी कार्यवाही करण्यासंदर्भात नगर विकास विभागाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व जलसंपदा विभागास निर्देश दिले.तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या १५३ व्या बैठकीतील इतिवृत्तात पाणी वाटपाचे नियोजन अंतर्गत १९५…

Read More

भुईगावला समुद्र गिळंकृत करणार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण, दीपक मोहिते, वसई तालुक्याच्या पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या भुईगाव येथे पर्यटक, पक्षीप्रेमीसाठी खूप प्रसिद्ध आहे.सागरी उत्पादनावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव समुद्र किनाऱ्याला पहिली पसंती देत असतात.पर्यटनसोबतच भुईगावला समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात, चवळी,गवार,वाल,दुधी आदी शेती करण्यात येते. पर्यटक व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य भुईगाव समुद्र किनारा हा हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. २५ वर्षांपूर्वी शासन व गावकरी यांच्या प्रयत्नाने या समुद्रकिनारी १२ हजाराहून अधिक सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती.सुरुच्या सुंदर बागेमुळे किनाऱ्याची होणारी धूप रोखणे,सोबत समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडत होती.परंतु मागील २-३ वर्षापासून प्रचंड भरती व किनारपट्टी भागात वाढत असलेली अतिक्रमणे,यामुळे समुद्राचे पाणी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एक तर तू असशील नाही तर मी, बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले, उद्धव ठाकरे यांचा तळतळाट, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस,या दोघामध्ये सुरू झालेले वाकयुद्ध आता चांगलेच हातघाईवर आले आहे.उद्धव ठाकरे यांनी प्रथमच एकेरीवर येत,” एक तर तू असशील किंवा मी असेन,” व बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले,असे जाहीर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस,अमोल मिटकरी- देशपांडे,विद्या चव्हाण-चित्रा वाघ,असा कलगीतुरा रंगू लागला आहे.आपण व आपल्या मुलाला तुरुंगात पाठवण्यासाठी फडणवीस यांनी कटकारस्थाने केल्याचे उघड झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संयम सुटला व त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.अमोल मिटकरी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारणात आततायीपणा करून चालत नाही, राजकारणात अहंकार,उर्मटपणा,तोरा व दुसऱ्याला तुच्छ लेखणे,हे फार काळ चालत नाही.हे स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मतांनी पराभव केला होता.त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेंव्हा स्मृती इराणीच्या कार्यकर्त्यांना हर्षवायू झाला होता.स्मृती इराणी सहजपणे निवडून येतील,असा विश्वास त्यांना वाटला होता.त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यानी ” राहुल गांधी यांनी अमेठीमधून पळ काढला,” अशा आरोळ्या ठोकल्या.पण निकाल जाहीर होताच,दस्तुरखुद्द स्मृती इराणी व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तोंड लपवत केंद्रातून अक्षरशः पळ काढला.स्मृती इराणी यांनी मतदारसंघात…

Read More

आम्हालाही शिकायचंय..! दीपक मोहिते, केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१० रोजी शिक्षण अधिकार कायदा २००९,लागू केला.६ ते १४ वयोगटातील मुलाना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे,असा उद्देश हा कायदा करण्यामागे होता.परंतु १० वर्षे उलटून गेल्यानंतरही या वयोगटातील लाखो मुले आज प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक मुलाला शाळेत आणणे,टिकवणे,त्यास गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे,व अन्य चांगले उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा कायदा केला.परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी मानसिकता सरकारकडे असायला हवी होती,ती सरकारने आजवर दाखवली नाही.कायदा केला,परंतु तो कठोरपणे राबवला नाही.त्यामुळे आजही लाखो मुलांचे भवितव्य अंधारात चाचपडत आहे.अठरापगड दारिद्र असलेल्या लाखो कुटुंबातील ही…

Read More

वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे गोविंदाना विम्याचे संरक्षण, पालघर, सालाबादप्रमाणे सामाजिक व धार्मिक उत्सव ” गोपाळकाला,” ( दहीहंडी ) मंगळ.२७ ऑगस्ट, २०२४ रोजी मनपा क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.तालुक्यातील अनेक गोविंदा पथके या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात.दहीहंडी उत्सवात भाग घेणारे गोविंदा पथक आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात.उत्सवामधील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या गोविंदाना ( खेळाडू ) विम्याचे संरक्षण मिळावे,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी पथकातील सर्व गोविंदांचा मोफत अपघात विमा काढण्यात येतो.यंदाही तशी व्यवस्था करण्यात आली आहे.गोविंदा अपघात विमा योजनेचा अर्ज महानगरपालिकेच्या vvcmc.in…

Read More

पालघर, रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नायगाव येथे रिक्षाचालकांचा रास्ता रोको, नुकत्याच झालेल्या मुसळधारवृष्टीत वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.” रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संबधित विभागाचे अधिकारी कोणत्याही उपाययोजना करत नसल्यामुळे आज नायगाव येथे रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. वसई तालुक्यात विरार,नालासोपारा,वसई व नायगाव,या शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या सर्व रस्त्यावरून वाहतूक करणे, दिवसेंदिवस धोकादायक झाले आहे.अनेक भागात अपघात होऊनही रस्ते विकास,महानगरपालिका व सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.त्यामुळे नागरिक व रिक्षाचालकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.आज नायगाव येथे या असंतोषाचा स्फोट झाला.नायगाव-बाफाणे दरम्यान रस्त्याची पार दुर्दशा…

Read More

दीपक मोहिते, नवापूर दुर्घटना ; सातजण अटकेत तर अनेकांवर गुन्हे दाखल,प्रशासन अलर्ट मोडवर,गावात वातावरण तंग, काल नवापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संबधित रिसॉर्टस जमीनदोस्त करण्यात आले आहे.पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील तरुणांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.काल रात्रभर झालेल्या तोडक कारवाईमुळे गावात तंग वातावरण निर्माण झाले होते.सरकारच्या या कारवाईच्या विरोधात महिलांनी प्रचंड आक्रोश सुरू ठेवला आहे. सेव्हन सी बीच या रिसॉर्टसवर झालेली तोडक कारवाई तब्बल १६ तास सुरू होती आणि ती पहाटे तीनच्या सुमारास आटोपली.या कारवाईमुळे रिसॉर्टसमालकाचे ५ कोटी रु.चे नुकसान झाले.तर या रिसॉर्टसमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५० कुटुंबाचा रोजगार नाहीसा झाला आहे.सरकारने केलेली तोडक कारवाई चुकीची असून आम्ही महिला मुख्यमंत्र्यांच्या…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्र्यांनी इतर रिसॉर्टसवरही बुलडोझर चालवावा, काल विरार पश्चिमेस नवापूर समुद्रकिनारी फिरायला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी मिलिंद मोरे यांच्या पदाधिकाऱ्याला किरकोळ भांडणातून मारहाण झाली.या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागताच त्यांनी स्थानिक पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी २० ते २५ जणावर गुन्हे दाखल केले व पोलीस आता रीतसर कारवाई करत आहेत. या सर्व घडामोडीनंतर अचानक घटनास्थळी अतिक्रमणविरोधी पथक दाखल झाले व त्यांनी ज्या रिसॉर्टससमोर हा प्रकार घडला,ते सेव्हन हिल्स रिसॉर्टस जमीनदोस्त केले.कारण मिलिंद मोरे याना मारहाण करणारे तरुण,या रिसॉर्टसचे कर्मचारी होते.मिलिंद मोरे यांचा मृत्यू हा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मास्क व टोपीची एक सुरस कहाणी, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली.हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले.तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.या प्रलयाला चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप पुणे सावरलेले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री ” वराती मागून घोडे,” या म्हणीप्रमाणे आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत घेऊन परिस्थितीची पाहणी करत आता फिरत आहेत.वास्तविक त्यांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवायला होती.तीन निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जाणे,हे पालकमंत्री म्हणून अजित पवार,खा.मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्याचे दारुण अपयश आहे,असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.त्यामुळे या नैसर्गिक संकटात पुणेकरांचे जे हाल व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले,त्यास हीच मंडळी सर्वस्वी जबाबदार…

Read More