- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड, पालघर जिल्ह्यात आजपासून कुष्ठमुक्त अभियानाला सूरुवात, पालघर जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा व तालुक्यातील कुष्ठरोग मुक्त मोहिमेच्या शुभारंभ आज विक्रमगड येथील मान आश्रम शाळेत करण्यात आला.कुष्ठरोगाचा मुळापासून उच्चाटन करण्यासाठी १६ ते २० डिसें.या पाच दिवसात तालुक्यातील ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १२ आश्रम विद्यार्थी खाण कामगार,वीटभट्टी कामगार, शेतमजूर,यांची तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यात गेल्या वर्षी या आजाराचे २१० रुग्ण आढळले होते.या रुग्णांवर औषध उपचार करून ही रुग्णसंख्या कमी करण्यात आली. आता फक्त ६० रुग्ण या तालुक्यात उपचार घेत असून या रोगाचा मुळापासूनच नायनाट करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर यांनी दिली.आज झालेल्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सुधीर मुनगुंटीवार यांचा एकनाथ खडसे होण्याची दाट शक्यता, राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवर प्रचंड नाराज झाले असून ते लवकरच केंद्रीय नेते नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.मुनगुंटीवार हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यांना डावलण्यामागे भाजपमधील एका गटाचे कारस्थान असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. सुधीर मुनगुंटीवार हे भाजपमध्ये ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.२०१४ साली भाजप – शिवसेना युतीला यश मिळाल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्नशील होते,पण त्यावेळी त्यांची गडकरी यांनी समजूत काढली व त्यांनी माघार घेतली.त्यांच्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला होता.मात्र या नेत्याच्या डोक्यातील सल मात्र निघू शकली…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीचे पुढील लक्ष्य मुंबई,ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल २१ दिवसांनी काल राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले.महायुतीमध्ये सलग १५ ते १६ दिवस जोरदार धमासान झाल्यानंतर कोणाला किती मंत्रिपदे,यावर कशीबशी तडजोड झाली.शिंदे गटातील वाचाळ मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपने यावेळी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती व त्यांच्या गटाचे अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,तानाजी सावंत यांना बाहेरचा रस्ता दाखवला.तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे,त्रासदायक ठरले.दुसरे एक नेते दिलीप वळसे पाटील,यांचे आजारपण व वाढते वय,अशी दोन कारणे पुढे करत,त्यांनाही घरी बसवण्यात आले. मंत्रिमंडळाची रचना करताना भाजपने अतिशय धूर्त खेळी केल्याचे दिसून…
दीपक मोहिते, महायुती सरकारने पालघर जिल्ह्यावर पुन्हा अन्याय केला, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीने पालघर जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत.पालघर जिल्ह्यात महायुतीचे एकूण पाच आमदार निवडून आले आहेत.त्यापैकी स्नेहा दुबे पंडित,राजन नाईक व हरिश्चंद्र भोये हे तिघे नवखे आहेत.पण राजेंद्र गावित किंवा विलास तरे या दोघांपैकी एकाला संधी मिळेल,अशी पालघरवासियांची अपेक्षा होती,पण हे दोघे शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आले आहेत.त्यांना मंत्रिपद दिल्यास या जिल्ह्यावर निर्माण झालेले आपले वर्चस्व कालांतराने धोक्यात येईल,त्यामुळे त्यांनी पालघर जिल्ह्याला डावलले.याप्रकरणी शिंदे गटाचे एकमात्र चालले नाही. पालघर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले असताना,त्यांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची होती,परंतु राजकीय हाराकिरीमध्ये शिंदे…
दीपक मोहिते, मंत्रिमंडळाचे घोडं अखेर गंगेत न्हालं, नव्या मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी पार पडला.आज एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली,त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.पण या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ भाजपच ” सबकुछ,” अशी स्थिती होती.गणेश नाईक व पंकजा मुंडे या दोघांचे प्रदीर्घ वनवासानंतर पुन्हा एकदा पुनर्वसन झाले.मात्र भाजपच्या गोतावळ्यात सुधीर मुनगुंटीवार व रविंद्र चव्हाण मात्र पाहायला मिळाले नाहीत.त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.पण सुधीर मुनगुंटीवार यांना नारळ देण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सुरुवातीला भाजपच्या १५ जणांना मंत्रिपदे मिळणार,असे ठरले असताना ती संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली व अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.शिंदे गटाचे अब्दुल सत्तार,दीपक…
संजय लांडगे,वाडा शहर, जळलेल्या भाताच्या भाऱ्यांची आमदारांनी केली पाहणी, वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्याच्या उडव्यांना अज्ञाताने आग लावण्याची घटना काल घडली होती.या घटनेची माहिती आ.शांताराम मोरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.मात्र पंचनामा करण्यासाठी जागेवर कुठलाही अधिकारी पोहोचला नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. जामघर येथे शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताची भारे रचून ठेवण्यात आले होते.अज्ञात इसमाने पाचशेहून अधिक भारे जाळले होते.या घटनेमध्ये किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.आज आ.शांताराम मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.मात्र दोन दिवसांपासून घटनास्थळी एकही अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी…
संजय लांडगे, वाडा येथे महिलांसाठी कर्करोग तपासणी व निदान शिबीर संपन्न, रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाऊन सीलॅण्ड,डॉ. कॅप्टन रितू बियानी ( संस्थापक कर्करोग संस्था, पुणे) व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथे आज परिसरातील महिला वर्गासाठी मोफत कर्करोग तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात महिला वर्गामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.याबाबत महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळून या गंभीर आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.कर्करोगाचे वेळेत निदान होणे आणि योग्य उपचार पद्धती घेणे,अशी दक्षता घेतल्यास या दुर्धर आजारावर मात करणे, सहजशक्य आहे. महिलावर्गामध्ये हेच प्रबोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू आणि ज्येष्ठ…
सुधीर केदारे,इगतपुरी, कै.मधुकरराव पिचड ; आदिवासी विकासाचे शिल्पकार कै.मधुकरराव पिचड यांना आपल्यातून जाऊन १० दिवस झाले असले तरी त्यांचे कार्य, विचार,आणि योगदान यांचा ठसा समाजावर सदैव कायम राहील.पिचड हे केवळ राजकारणी नव्हते तर ते समाजसेवेचे प्रतिक होते. त्यांनी आयुष्यभरात आदिवासी,गोरगरीब,आणि वंचित घटकांसाठी झटून कार्य केले. मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्राच्या माजी आदिवासी विकासमंत्री म्हणून राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले.त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला नवी दिशा मिळाली आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला. त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करताना आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेटला मंजुरी मिळवली. आदिवासी समाजाच्या गरजा आणि प्रगतीची कवाडे उघडली गेली.ज्यामुळे अनेक विकासप्रकल्प राबवणे शक्य झाले. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” एकनाथ शिंदे यांची खरोखर दया येते हो …. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर आता त्यांचा मुक्कामही ” वर्षा,” या सरकारी निवासस्थानाहून ” मुक्तागिरी,” या बंगल्यात हलवण्यात आला आहे.नियमाप्रमाणे त्यांना ते निवासस्थान सोडावे लागणारच होते,काल त्यांचे सामान हलवण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांशी खूप जवळीक साधली होती.ते उठसूठ दिल्लीला जात असत.मोदी व शहा हे दोघे मुंबईत आले की हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत असत.त्यांच्या या प्रेमाने शिंदेही गहिवरून जात असायचे.पण त्या बिचाऱ्या शिंदेंना कुठे माहीत होते की हे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्याची वाटचाल अधोगतीच्या दिशेने… आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.कोणाला संधी व कोणाला डच्चू मिळणार ? याविषयी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.१५.१२.८ असे सूत्र ठरले असून महायुतीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना मान्य आहे. आज नागपूर येथे राजभवनावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन वाईट घटनांचे सावट पडले आहे.परभणी येथे भारतीय संविधानाचा झालेला अपमान व त्यानंतर झालेली दंगल,तसेच बीड येथे सरपंच संतोष देशमुख,या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे झालेली हत्या.या हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे हे वाचवत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.या दोन्ही घटनांना आता जातीय राजकारणाचा रंग देण्यात येत आहे.संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येबाबत स्थानिक आ.सुरेश धस यांनी…
