- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
नदीम शेख,पालघर, चिंचणी बारीवाडा येथील पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना, चिंचणी – बारीवाडा येथील पाणीप्रश्न गंभीर बनल्यामुळे आ.गावित यांनी गावकऱ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहुन चर्चा केली. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आ.गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाणीपुरवठा यंत्रणेतील अडचणी,नळजोडण्यातील त्रुटी आणि जलवाहिन्याच्या दुरुस्तीची आवश्यकता याबाबत अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधला. गावकऱ्यांना जलस्रोत लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी अधिकारी व स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले.याविषयी आ.राजेंद्र गावित म्हणाले,पाणी हा मूलभूत हक्क असून, प्रत्येकाला तो मिळायला हवा. या समस्येचा त्वरित तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल.प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना त्यांनी कडक सूचना दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी…
केदार पाटील, केळवे रोड, केळवे येथे महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व बालआनंद मेळावा संपन्न, केळवा ग्रामपंचायत क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी प्रशिक्षण, बालविकास,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा समावेश होता.या उपक्रमांनी महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.या शिबिरामध्ये विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजया गोस्वामी मॅडम यांनी महिलांच्या हक्क, सायबर क्राईम,आणि मोबाईलवरील फसवणूक मेसेजेसबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य वैशाली करबट मॅडम यांनी अंगणवाडीच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे,तसेच बालकांच्या पोषण व विकासासाठी प्रयत्न करावेत, यावर भर दिला. बालकल्याण समिती सदस्य शुभांगी मॅडम यांनी बाल संगोपन,पोक्सो कायदा आणि महिला बालविकास योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन…
सुनील तायडे, विरार-कारगिलनगर येथे महिला मेळावा संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता भेरे यांनी काल कारगिलनगर टेपाचा पाडा येथे शेतीच्या शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यास परिसरातील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते. सहभागी महिलांनी सर्व खेळात सहभागी होऊन आनंद लुटला.या मेळाव्यात अनेक महिलांनी आपल्या भाषणात माजी आ.हितेंद्र ठाकूर व माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या मेळाव्याला दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.या सर्व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सह्याद्री महिला मंडळ,एकता महिला मंडळ,तनिष्क व्यासपीठ महिला मंडळ,कुणबी महिला मंडळ,जयदुर्गा महिला मंडळ…
वसंत भोईर,वाडा, १३ जाने. रोजी श्रमजीवी संघटना,कोका कोला कंपनीला देणार धडक, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोकाकोला कंपनीला वैतरणा नदीवरील गांध्रे बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदी किना-यावर असलेल्या अनेक गावांना मार्च महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असताना कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहॆ.मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने श्रमजीवी संघटना येत्या १३ जाने.रोजी कोकाकोला कंपनीवर धडक देणार आहॆ. यासंदर्भात संघटनेने प्रशासनाला इशारेवजा निवेदन दिले आहॆ. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.पण शेतीसाठी पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने पावसाळी पाणी समुद्रात वाहून जाते.गांध्रे गावानजीक वैतरणा नदीवर कोल्हापूरी टाईपचा बंधारा बांधला आहे.१९७७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याची साठवण क्षमता २ दशलक्ष घ.मी.इतकी…
संजय लांडगे,वाडा, अंगणवाडीला बायोगॅस प्लांट, जिल्ह्यात पहिलाच उपक्रम, खानिवली ग्रामपंचायत ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात वाडा तालुक्यात अग्रेसर असुन वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबवण्यात येत असतात.गावाचा शास्वत विकास करायचा असेल तर अनेक नैसर्गिक संसाधनाचा वापर होणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण v संवर्धन करण्यावर ग्रामपंचायत नेहमी भर देत असते.या गावामध्ये आजवर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.त्यामध्ये आज अंगणवाडीचा पोषण आहार बायोगॅसवर शिजवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ़ वसई पर्ल्सच्या माध्यमातून अंगणवाडी क्र.३ ला बायोगॅस प्लांट देणगी दाखल देण्यात आला.पालघर जिल्ह्यात हा पहिलाच प्रकल्प आहॆ. अंगणवाडीतील पोषण आहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची या प्रकल्पामुळे बचत होणार असुन जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.…
दीपक मोहिते, राज्यभाजपच्या कार्य.अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व पालघर/सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.काल शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय नेत्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.येत्या दोन महिन्यात संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.तोवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत राहतील. चव्हाण यांची राजकीय वाटचाल कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक ते प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशी झाली आहॆ.ते २००५ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले,२००७ साली स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली.त्यानंतर २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.त्यानंतर त्यांनी २०१४,२०१९ व २०२४ या…
दीपक मोहिते, पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहॆ ,ते पुन्हा माघारी फिरणे शक्य नाही, आम्ही राज्यातील महाविकास आघाडी व राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीला लवकरच टाळे लागेल,असे भाकीत केले होते.ते आता खरे ठरू पाहत आहे.सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत.त्यांच्या या बदलत्या भूमिकेविषयी कोणालाही आश्चर्य वाटले नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जे अपयश पक्षाच्या पदरात पडले,तेव्हांपासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.या पराभवाने पक्षांतर्गत वादही उफाळून वर आले आहेत.मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत ते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार राजन साळवी या दोघांमध्ये झालेली खडाजंगी पक्षाला क्षती पोहोचवणारी ठरली आहे.बैठकीत…
संदीप जाधव,बोईसर, दिपक मोहिते याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार – २०२५ जाहीर, पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार व ” news27.in media,” या नावाजलेल्या वेबपोर्टलचे मुख्य संपादक दीपक मोहिते यांना, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ,नाशिक ( रजि.) तर्फे पत्रकार दिनी राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचा वितरण सोहळा ५ जाने.रोजी नाशिक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.पण मोहिते यांच्या बहिणीचे अकाली निधन झाल्यामुळे हा पुरस्कार त्यांना स्विकारता आला नाही.संस्थेने तो पुरस्कार त्यांना पाठवून दिला आहे. दीपक मोहिते यांनी गेल्या तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीत गावकरी,लोकमत,पुढारी, प्रहार व सागर,या प्रमुख दैनिकात विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे.या काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.त्यामध्ये…
अमर राऊत,चिंचणी, चिंचणी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, काल जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प डहाणूच्या वतीने महिला व मुलींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ग्रामपंचायत सभागृह,चिंचणी येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला चिंचणी ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा शिंगडे आणि उपसरपंच आशा वर्तक इ.मान्यवर उपस्थिती होते. ऍड.राकेश मडवे यांनी शिबिराला महिलांना विविध कायद्यांची सखोल माहिती दिली.त्यांनी महिलांचे हक्क व कायदे,हुंडाबंदी कायदा, स्त्रीधन व मालमत्ता अधिकार, वारसा हक्क,विवाह कायदा, घटस्फोट,पोटगी, बलात्कारविषयक कायदे तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यांवर मार्गदर्शन केले. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याविषयीचे ज्ञान वाढवणे,हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.उपस्थित महिलांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. कायद्याविषयीचे अनेक शंकाचे…
वसंत भोईर,वाडा, बि-हाड आंदोलन दुस -या दिवशीही सुरूच… वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दगडखदान मालकांकडून सतत होत असलेल्या बोअर ब्लास्टिंग मुळे या गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडा जाऊन त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या संदर्भात महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.त्यामुळे कालपासून धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.मात्र या मोर्चाची साधी दखलही न घेतल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. डोंगस्ते गावालगत असलेल्या मे.सी.स्क्वेअर कं.लि.( कॅप्टन इन्फ्रा लि.), मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस या दगडखदान व्यवसायिकांकडून दिवस-रात्र बोअर ब्लास्टिंग केली जात आहॆ.त्यामुळे गावातील अनेक गोर-गरीब शेतकरी,शेतमजुरांच्या घरांच्या भिंतीना तडे जाऊन घरांचे…
