- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य,
- परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल,
- वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो,
- वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन,
- शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक व दोन नव्हे तर सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड,
- ” या चिमण्यानो, परत फिरा रे, “
- पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
- १७ खासदार करणार भाजपात प्रवेश,
Author: दीपक मोहिते
संजय ठाकूर,चहाडे कुणबी सेनेने केलेल्या मागणीला यश – अविनाश पाटील, गेल्या पंचवीस वर्षापासून म कुणबी सेनेने संघटनेच्या स्थापनेपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती.ती मागणी आता मार्गी लागल्यामुळे कुणबी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या २५ वर्षात संघटनेने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन ठिकाणी आरक्षण परिषदा घेतल्या होत्या. या तिन्ही ठिकाणी झालेल्या परिषदांमध्ये जातनिहाय जनगणना करावी,ही प्रमुख मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने याबाबत आता निर्णय घेतला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भारतात जनगणनेला सुरुवात ब्रिटिशांच्या काळात झाली होती १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना केली गेली १९३१ पर्यंत करण्यात आलेल्या…
नदीम शेख,पालघर शरीर स्वास्थासाठी प्रत्येकाने खेळायला हवे – जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, आपलं शरीर सुदृढ राहावे, यासाठी प्रत्येकाने खेळामध्ये रुची दाखवली पाहिजे.खेळामुळे व्यक्तिमत्व खुलते,बुद्धिमत्ता तरल होते.मानसिक स्वास्थही सुदृढ राहते.त्यासाठी प्रत्येकाने खेळायला हवे.असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींना दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघरतर्फे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर करण्यात आले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गिरीश इरनाक,आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर अभिजीत गुरव व जयवंती देशमुख आदी उपस्थित होते. प्रत्येक मुलाने दरवर्षी एक नवीन खेळ खेळायला शिकले पाहिजे.खेळल्यामुळे…
वसंत भोईर,वाडा, कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन, आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामविकास संघर्ष समितीतर्फे कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर उद्या सकाळी १०.३०वाजता आपल्या न्याय हक्कांसाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कुयलू ग्रामपंचायत हद्दीतील प्रदूषणकारी टायर कंपन्यांचे सर्व काम तात्काळ थांबवण्यात यावे,बंद पडलेली जलस्वराज्य व नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्यात यावी,रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी तातडीने मजुरांना देण्यात यावी,घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी बांधकामासाठी निधी द्यावा, महीला ग्रामसभा न घेता फक्त सह्या घेतल्या जातात,याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी,ग्रामस्थांच्या माहीती अधिकार अर्जावर मुदतीत उत्तर दिले जात नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी.अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामविकास संघर्ष समितीचा कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले…
संजय लांडगे,वाडा महिलांसाठी मोफत शिवणकला केंद्र, वाडा तालुक्यातील वावेघर येथील स्वामी समर्थ मंदिर येथे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मोफत शिवण कला शिकता यावी,या उद्धेशाने काल स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिवणकला केंद्राचे उद्घाटन स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपचे करण्यात आले. सदर शिवणकला केंद्राच्या उदघाटन प्रसंगी स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, समाजिक कार्यकर्ते श्याम ठाकरे,गोवर्धन पटेल, सानिका गगे शिवणकला शिक्षिका आदी उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा स्वागतार्ह निर्णय, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती दिली.केंद्रसरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती.स्वातंत्र्योत्तर काळात होत असलेली ही पहिलीच जातनिहाय जनगणना आहे.यापूर्वी १९३१ मध्ये अशी जातनिहाय जनगणना झाली होती. आपल्या देशात ब्रिटिशांच्या काळात सर्वप्रथम १८७२ मध्ये जनगणना सुरू झाली.सन १९३१ पर्यंत ज्या ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली.त्यामध्ये जातीसंदर्भातील माहितीची नोंदणी करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या…
दीपक मोहिते, ” कामगार दिन विशेष,” “१ मे जागतिक कामगार दिन ; कामगार जगला पाहिजे,” हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, यंदाही तो उत्साह कायम असला तरी सध्याच्या परिस्थितीत कामगारवर्ग भितीच्या सावटाखाली आहे. केंद्र व राज्यसरकार हे दोघेही भांडवलधारी व्यवस्थेकडे झुकू लागले आहेत.कामगार व शेतकरी हे एकेकाळी श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व करत असत.पण आता काळ बदलत चालला आहे. उद्योग जगताचा डोलारा ज्या कामगार सामर्थ्यावर उभा असायचा, तसा तो उभा असल्याचे पाहायला मिळत नाही. आपली अंगमेहनत व बुद्धिक्षमता विकून महिन्याकाठी वेतन घेणाऱ्या घटकाचा कामगारवर्गात समावेश होतो.भांडवलदारांच्या उद्योगात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या मजुरांचा ” कामगार,” अशी व्याख्या करण्यात आली होती.स्वातंत्र्यपूर्व…
दीपक मोहिते, ” राज्य निर्मिती विशेष, “महाराष्ट्र देशा,कणखर देशा,” आज राज्याचा ६६ वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने राज्यात दिवसभर शासकीय व बिगरशासकीय कार्यक्रमाची अक्षरशः रेलचेल असणार. १ मे १९६० रोजी आपल्या राज्याची निर्मिती झाली,त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,हजारो लोकांचे संसार,या आंदोलनात होरपळले,याची कल्पना सध्याच्या पिढीला नाही.महाराष्ट्रद्वेष्ट्या मूठभर काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान किती अत्याचार केले,त्याची गोळाबेरीज करणेही शक्य नाही.आज राज्य देशात प्रगतीशील राज्य असले तरी,हल्लीचे राज्यकर्ते लचके तोडू लागले आहेत.देशाच्या एकूण महसुलापैकी आपले महाराष्ट्र राज्य ३३ % कर देते.मुंबई ही गेल्या काही वर्षांपासून देशाची आर्थिक राजधानी असून तिचे हे आर्थिक वैभव आता गटांगळ्या खाऊ लागले आहे.राज्याचे आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या खच्चीकरण…
दीपक मोहिते, सुरेश कलमाडी यांना १५ वर्षानंतर क्लीनचीट ; कार्यकर्त्यांकडून जल्लोष ज्या कलमाडी विरोधात रान उठवण्यात आले, त्या कलमाडी यांना इडी व सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणानी आता निर्दोष ठरवले आहे.२०१० सालच्या राष्ट्रकुल ( कॉमनवेल्थ ) स्पर्धां आयोजनातील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना अखेर क्लीनचीट मिळाली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनीलॉन्ड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने तो स्विकारला.या निर्णयानंतर पुण्यात कलमाडी समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. २०१० मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी विविध कंत्राटांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज व उद्धव यांची टाळी वाजेल,असे वाटत नाही… पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या देशासमोर असलेले अनेक विषय विस्मरणात गेले.महागाई,बेरोजगारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्यात धोरण व त्याचे होणारे संभाव्य परिणाम,इ.महत्वाच्या प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.या सर्व प्रश्नासोबत आणखी एक महत्वाचा राजकीय प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.तो म्हणजे राज व उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे,होय.ही चर्चा देखील आता मागे पडली आहे.हे दोघे भाऊ सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे दोघेही मुंबईत परतणार आहेत.त्यानंतर हे दोघे भाऊ एकमेकांना टाळी देतात का ? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज यांनी पक्ष सोडताना ” माझा…
वसंत भोईर,वाडा गडांतरानंतरही टायर रिसायकलिंग कंपन्या जोमात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंगच्या कंपन्या सुरू असून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तक्रारी झाल्यानंतर अनेक टायर कंपन्यांवर गडांतर आले.तरीपण नव्याने असंख्य कंपन्यांचे उभारणीचे काम जोमाने सुरू आहे.यात प्रामुख्याने वडवली,दिनकर पाडा,तोरणे,सपना,वरले, कोणे,पालसई आदी गावांमध्ये नव्याने कंपन्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या कंपन्यांमध्ये वारंवार अपघात होऊन अनेक कामगार जायबंदी झाले तर अनेकजण मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रचंड होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.टायर कंपनीच्या प्रदूषणाने हैराण झालेल्या नागरिकांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश…
