- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, बालविवाह रोखण्यासाठी कासटवाडी ग्रामपंचायतीतर्फे ठराव मंजूर, ग्रामीण भागात बालविवाह आणि कमी वयात लग्न होण्याच्या घटनांमुळे वाढणाऱ्या कुपोषणाची समस्या सतत वाढत आहे. तसेच माता-बाळ मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कासटवाडी ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचा ठराव केला आहे. या ठरावानुसार, ग्रामपंचायत क्षेत्रात कमी वयात साखरपुडा आणि लग्न करण्यास बंदी करण्यात आली आहे.याविषयीचा ठराव विशेष ग्रामसभेत मांडण्यात आला, ज्यामध्ये कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.सरपंच कल्पेश राऊत यावेळी म्हणाले, ” बालविवाहामुळे मुलांचे जीवनमान,आरोग्य आणि शिक्षणावर गंभीर परिणाम होतो.कमी वयातील मातांच्या गरोदरपणामुळे कुपोषण व आरोग्याच्या समस्या उद्भवतात.ज्यामुळे अनेकदा माता व बाळाचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो. हे…
वसंत भोईर, वाडा, हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे ठाऊक आहेत का ? चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने त्या त्या हंगामात पीकणारी फळे खायलाच हवी. सध्या पेरूचा हंगाम सुरू आहे शिवाय थंडीही चांगली पडू लागली आहे.थंडीत पेरू खाणे फायद्याचे असते,असे आहार तज्ञ सांगतात.पेरूतील जीवनसत्व क आणि इतर पौष्टिक घटकांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीर सदृढ व मजबूत होते.पेरूपाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करतो. पेरूच्या दोन जाती आहेत,एका जातीमध्ये पांढरा, दुसऱ्या जातीमध्ये गुलाबी गर असतो.सध्या थायलंड,तैवान या विदेशी सह देशी वाणांच्या पेरूचे उत्पादन विक्रमी होत असल्याने बाजारपेठेत आवक वाढली आहे.पाऊस लांबल्याने अजूनही जमिनीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पेरू तही पाणी जास्त आहे.त्यामुळे…
वसंत भोईर,वाडा, ग्रंथदिंडीचे स्वागत व विकास कामांचे भूमिपूजन. विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट शाखा अघई – मोहीली यांच्या वतीने प्रस्तावित असलेली ग्रंथदिंडीचे आयोजन व वृक्षारोपण इ. कार्यक्रम राबवण्यात आले.तसेच सफाई मोहिमेंतर्गत आजच्या दिंडीच्या प्रवासात त्यांनी अबिटघर गावाला भेट देऊन जनजागृती केली.यावेळी ग्रामपंचायत आबिटघरतर्फे सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीचे जल्लोषपूर्ण वातावरणात यथोचित स्वागत करण्यात आले. साठेपाडा येथे महायुतीचे आ.दौलत दरोडा यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.साठेपाडा मुख्य रस्ता ते पाण्याच्या हौदाकडे जाणारा रस्ता,हा संपूर्णपणे सिमेंट काँक्रिटचा होणार असून त्याची प्रस्तावित अंदाजपत्रकिय किंमत,ही लाखो रु.च्या घरात आहे. या प्रसंगी वाडा पंचायत समितीचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सत्तेत आलात,आता जिल्ह्याची विकासकामे जलदगतीने मार्गी लावा.. वसई,नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा पराभव होऊन महायुतीची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.तसेच महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून जून २०२० पासून सलग चार वर्षे सरकार कारभार चालवत आहे.स्वतःकडे सत्ता असूनही महायुती व अन्य काही पक्षाचे स्थानिक नेते मात्र महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल आ.हितेंद्र ठाकूर याना दोषी ठरवत होते. वास्तविक पालकमंत्री, खासदार,पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाचे आमदार हे सारे सत्ताधारी पक्षाचे आहेत.तरीही त्यांच्या नजरेत केवळ आ.हितेंद्र ठाकूर दोषी… आता नव्याने निवडून आलेले आमदारही त्यांच्याच पक्षाचे आहेत.त्यांच्या कार्यकालात विकासकामाना गती न मिळाल्यास लोकांनी या मंडळींना जबाबदार धरायला हवे.नवनिर्वाचित आमदारांनी पाणी,इस्पितळ,अनधिकृत…
दीपक मोहिते, “इनसाईड स्टोरी,” ” आता थेट तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची गरज,” वसई,नालासोपारा व बोईसर,या तीन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई व नालासोपारा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मेळावे घेतले.या माध्यमातून आपल्या पराभवाची नेमकी कारणे काय आहेत,हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.पण त्यातून नेमके काय निष्पन्न झाले,ते मात्र कळायला मार्ग नाही.मात्र येणाऱ्या काळात भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर यांना मोठ्याप्रमाणात झाडाझडती करावी लागणार आहे.या प्रक्रियेची सुरुवात त्यांना त्यांच्या नजीकच्या वर्तुळातील नेते विभागीय नेते व नगरसेवक यांच्यापासून करावी लागणार आहे. आ.ठाकूर हे आपल्या प्रत्येक भाषणात ” माझा कार्यकर्ता जोवर माझ्या सोबत आहे,तोवर माझा कोणीही पराभव करू शकत…
संजय लांडगे,वाडा, जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी आमगाव येथे कला सत्राचे आयोजन, विद्यार्थिनींना शिक्षणासोबत त्यांच्या आवडत्या कला जोपासता याव्या व त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा,यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा हा उपक्रम आहे.गेल्या वर्षभरात विविध शाळेत जाऊन असे कार्यक्रम पार पडले. वाडा तालुक्यातील आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कला सत्राचे आयोजन करण्यात आले होते. उकर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या महिला शिक्षण आणि सक्षमीकरण मोहिमेद्वारे आकर्षक बोव्ज् आणि मनमोहक फुलपाखरू एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.या कार्यशाळेत ११ ते १६ वयोगटातील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी उपमुख्याध्यापक गणेश किंगे, मृणाली नडगे,विकास कांबळे, आणि सुवर्णा मेने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
वसंत भोईर,वाडा, माझी शेती,माझा सातबारा, मीच नोंदवणार पीक पेरा, ई-पिक पाहणीसाठी राज्यात एक डिसें.पासून डीसीएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी अँड्रॉइड ॲप अपडेट करावे लागणार आहे.या नव्या ॲपच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला ई-पीक पाहणी सहजरीत्या नोंद करता येणार आहे.शेतातील बांधावरची झाडे देखील या ॲपच्या माध्यमातून सातबारावर नोंदविता येणार आहेत.प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन आयडी मिळणार आहे.विविध योजना दिल्यास त्याची सर्व माहिती मिळणार आहे. ई- पिक पाणी कशासाठी? खरीप रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे क्षेत्र अचूक नोंद करण्यासाठी ई-पिक पाहणी महत्वाची आहे. नव्या डीसीएस ऍपमध्ये काय आहे? ॲपमध्ये सर्व नोंदी शेतावर जाऊन करायचे आहेत.दीप व रब्बी पिकांची नोंद या ॲप च्या माध्यमातून…
दीपक मोहिते, एक देश ; एक निवडणूक ; देशाची वाटचाल अध्यक्षीय पद्धतीच्या दिशेने, बहुचर्चित एक देश,एक निवडणूक विधेयकाचा प्रस्तावावर मतप्रत्रिकेवर मतदान पार पडले.प्रस्तावाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते पडली.यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.पण सरकारने संबंधित प्रस्ताव पटलावर ठेवला व तो मंजूर झाला.तत्पूर्वी इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान घेण्यात आले,पण त्यास विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे जाहीर केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष ,” एक देश,एक निवडणूक,” च्या बाजूने आहेत,तर १४ पक्ष विरोधात आहेत.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हे विधेयक संसदीय समितीकडे (जे.सी.पी.) पाठवण्यात आले आहे.त्यावर चर्चा होईल व सर्व पक्षांची मते ऐकली जातील. त्यानंतर नवीन…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” जहां नही चैना, वहां नही रहना,” महायुतीमधील अतृप्त आत्मे आता पोपटासारखे बोलायला लागले असून येणाऱ्या काळात या अतृप्त आत्म्यांमुळे तीनही घटक पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून भावी लढाईचे रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे डॉ.तानाजी सावंत यांनीही आपल्या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक घेतली व ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.हनुमान चालीसा पठण करणारे राणा देखील आता हात चोळत अमरावती या आपल्या मूळ गावी परतले आहेत.गेली पाच वर्षे राणा पती – पत्नीने देवेंद्र व अमित गाथाचे पठण केले,पण आता या दोघांवर घरात बसून हनुमान चालीसा पठण करण्याची वेळ आली…
वसंत भोईर,वाडा, करडीचे तेलाचे भाव कडाडणार… जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्याचा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. तरीही तेलबियांचे क्षेत्र वाढलेले नाही.यामध्ये करडईचे क्षेत्र निरंक आहे तेल वर्गीय पीक असलेल्या करडईला बाजारात मागणी व दरही मिळत आहे. मात्र,कीड व रोगाचा प्रादुर्भाव, काढणीच्या हंगामात मजूर न मिळणे,आदी कारणांमुळे आता करडईचे पीक रब्बी हंगामातून बाद झाले आहे. रब्बीचा पेरा जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वाल,हरभरा,तीळ,मुग,धने, थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल या रब्बी पिकांची पेरणी जवळजवळ आटोपली आहे.८० टक्के क्षेत्रावर यावर्षी रब्बीचा पेरा आहे. करडईचे क्षेत्र निरंक.. रब्बी हंगामात यंदा गलित धान्याचे क्षेत्र एकदम कमी झाले आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात करडई, जवस पिकाचे क्षेत्र निरंक आहे. करडईचा पेरा झाला बाद… रब्बी…
