Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आगामी महानगरपालिका निवडणूक ; माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली… काल शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.येत्या तीन ते चार महिन्यात या निवडणुका होतील,असा अंदाज व्यक्त करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष अद्याप सावरलेला नाही.भाजपच्या तयारीच्या तुलनेत विरोधी पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.पण माजी आ.हितेंद्र ठाकूर मात्र त्यास अपवाद ठरले आहेत.या निवडणुका लवकरच होतील,हे गृहीत धरून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका व मेळावे घेण्यास सुरुवात केली आहॆ.त्यांच्या या प्रयत्नाला कार्यकर्त्यांचा…

Read More

संजय लांडगे,वाडा, डोंगस्तेच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते हद्दीमध्ये दगडखदान,क्रशर व्यवसाय सुरू असून,सदर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवसरात्र बोअर ब्लास्टींग करण्यात येत असते.त्यामुळे येथील घरांच्या भिंतींना तडे जावुन घरे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी धर्मवीर विचार मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.पण प्रशासनाने याची दाखल घेतली नाही म्हणून दोन दिवसापूर्वी धर्मवीर विचार मंच व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला होता,पण त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवले होते.दरम्यान अध्यक्ष मिलिंद पष्टे यानी सलग तीन दिवस अन्नत्यागही केला. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून…

Read More

नदीम शेख,पालघर, चिंचणी बारीवाडा येथील पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना, चिंचणी – बारीवाडा येथील पाणीप्रश्न गंभीर बनल्यामुळे आ.गावित यांनी गावकऱ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहुन चर्चा केली. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आ.गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाणीपुरवठा यंत्रणेतील अडचणी,नळजोडण्यातील त्रुटी आणि जलवाहिन्याच्या दुरुस्तीची आवश्यकता याबाबत अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधला. गावकऱ्यांना जलस्रोत लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी अधिकारी व स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले.याविषयी आ.राजेंद्र गावित म्हणाले,पाणी हा मूलभूत हक्क असून, प्रत्येकाला तो मिळायला हवा. या समस्येचा त्वरित तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल.प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना त्यांनी कडक सूचना दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी…

Read More

केदार पाटील, केळवे रोड, केळवे येथे महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व बालआनंद मेळावा संपन्न, केळवा ग्रामपंचायत क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी प्रशिक्षण, बालविकास,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा समावेश होता.या उपक्रमांनी महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.या शिबिरामध्ये विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजया गोस्वामी मॅडम यांनी महिलांच्या हक्क, सायबर क्राईम,आणि मोबाईलवरील फसवणूक मेसेजेसबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य वैशाली करबट मॅडम यांनी अंगणवाडीच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे,तसेच बालकांच्या पोषण व विकासासाठी प्रयत्न करावेत, यावर भर दिला. बालकल्याण समिती सदस्य शुभांगी मॅडम यांनी बाल संगोपन,पोक्सो कायदा आणि महिला बालविकास योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन…

Read More

सुनील तायडे, विरार-कारगिलनगर येथे महिला मेळावा संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता भेरे यांनी काल कारगिलनगर टेपाचा पाडा येथे शेतीच्या शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यास परिसरातील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते. सहभागी महिलांनी सर्व खेळात सहभागी होऊन आनंद लुटला.या मेळाव्यात अनेक महिलांनी आपल्या भाषणात माजी आ.हितेंद्र ठाकूर व माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या मेळाव्याला दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.या सर्व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सह्याद्री महिला मंडळ,एकता महिला मंडळ,तनिष्क व्यासपीठ महिला मंडळ,कुणबी महिला मंडळ,जयदुर्गा महिला मंडळ…

Read More

वसंत भोईर,वाडा, १३ जाने. रोजी श्रमजीवी संघटना,कोका कोला कंपनीला देणार धडक, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोकाकोला कंपनीला वैतरणा नदीवरील गांध्रे बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदी किना-यावर असलेल्या अनेक गावांना मार्च महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असताना कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहॆ.मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने श्रमजीवी संघटना येत्या १३ जाने.रोजी कोकाकोला कंपनीवर धडक देणार आहॆ. यासंदर्भात संघटनेने प्रशासनाला इशारेवजा निवेदन दिले आहॆ. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.पण शेतीसाठी पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने पावसाळी पाणी समुद्रात वाहून जाते.गांध्रे गावानजीक वैतरणा नदीवर कोल्हापूरी टाईपचा बंधारा बांधला आहे.१९७७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याची साठवण क्षमता २ दशलक्ष घ.मी.इतकी…

Read More

संजय लांडगे,वाडा, अंगणवाडीला बायोगॅस प्लांट, जिल्ह्यात पहिलाच उपक्रम, खानिवली ग्रामपंचायत ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात वाडा तालुक्यात अग्रेसर असुन वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबवण्यात येत असतात.गावाचा शास्वत विकास करायचा असेल तर अनेक नैसर्गिक संसाधनाचा वापर होणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण v संवर्धन करण्यावर ग्रामपंचायत नेहमी भर देत असते.या गावामध्ये आजवर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.त्यामध्ये आज अंगणवाडीचा पोषण आहार बायोगॅसवर शिजवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ़ वसई पर्ल्सच्या माध्यमातून अंगणवाडी क्र.३ ला बायोगॅस प्लांट देणगी दाखल देण्यात आला.पालघर जिल्ह्यात हा पहिलाच प्रकल्प आहॆ. अंगणवाडीतील पोषण आहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची या प्रकल्पामुळे बचत होणार असुन जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.…

Read More

दीपक मोहिते, राज्यभाजपच्या कार्य.अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व पालघर/सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.काल शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय नेत्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.येत्या दोन महिन्यात संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.तोवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत राहतील. चव्हाण यांची राजकीय वाटचाल कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक ते प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशी झाली आहॆ.ते २००५ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले,२००७ साली स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली.त्यानंतर २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.त्यानंतर त्यांनी २०१४,२०१९ व २०२४ या…

Read More

दीपक मोहिते, पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहॆ ,ते पुन्हा माघारी फिरणे शक्य नाही, आम्ही राज्यातील महाविकास आघाडी व राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीला लवकरच टाळे लागेल,असे भाकीत केले होते.ते आता खरे ठरू पाहत आहे.सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत.त्यांच्या या बदलत्या भूमिकेविषयी कोणालाही आश्चर्य वाटले नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जे अपयश पक्षाच्या पदरात पडले,तेव्हांपासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.या पराभवाने पक्षांतर्गत वादही उफाळून वर आले आहेत.मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत ते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार राजन साळवी या दोघांमध्ये झालेली खडाजंगी पक्षाला क्षती पोहोचवणारी ठरली आहे.बैठकीत…

Read More

संदीप जाधव,बोईसर, दिपक मोहिते याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार – २०२५ जाहीर, पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार व ” news27.in media,” या नावाजलेल्या वेबपोर्टलचे मुख्य संपादक दीपक मोहिते यांना, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ,नाशिक ( रजि.) तर्फे पत्रकार दिनी राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचा वितरण सोहळा ५ जाने.रोजी नाशिक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.पण मोहिते यांच्या बहिणीचे अकाली निधन झाल्यामुळे हा पुरस्कार त्यांना स्विकारता आला नाही.संस्थेने तो पुरस्कार त्यांना पाठवून दिला आहे. दीपक मोहिते यांनी गेल्या तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीत गावकरी,लोकमत,पुढारी, प्रहार व सागर,या प्रमुख दैनिकात विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे.या काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.त्यामध्ये…

Read More