- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,
- मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर वाहनाच्या प्रचंड रांगा,
- जांभूळ विहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
- भालीवली गावातील सिंचन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवा,
- एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा,
- आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत,
- पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी,
- नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका,
Author: दीपक मोहिते
मनिष म्हात्रे,वसई चौथ्या राज्यस्तरीय शुटींगबाॅल स्पर्धेत टेंभुर्णी,सोलापूर संघ अंतिम विजेता, वसईतील रंजन क्रीडा मंडळ, देवाळेतर्फे ८ मार्च रोजी चौथी कै.मनिष वर्तक स्मृती चषक भव्य राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली. राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत राज्यातील अनेक दिग्गज संघ उतरले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २४ नामवंत संघाचा समावेश होता.या स्पर्धेत टेंभुर्णी,सोलापूर संघाने आपला दबदबा सुरुवातीपासुन कायम ठेवला,तर मालेगाव संघ उपविजेता ठरला. या शूटिंग बॉल स्पर्धेच्या उद्घाटनास पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुदेश चौधरी,बसीन कॅथोलिक बॕकेचे संचालक ओनिल आल्मेडा,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ वसईचे अध्यक्ष नरेंद्र राऊत,कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास वसई विकास सहकारी बँकेचे संचालक अवनीश वर्तक,समाज…
मनिष म्हात्रे,वसई शिवसेना ( उबाठा ) महिला आघाडीतर्फे महायुती सरकारचा जाहीर निषेध, विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा ठेऊन लाडकी बहिण योजनेत ६०० रु.ने वाढ करून २१०० रु देणार असे आश्वासन देत सत्ता मिळवली.आता त्याच बहिणींचा १५०० रु. चा हप्ता रडत खडत देणा-या सरकारचा शिवसेना ( उबाठा ) पालघर जिल्हा महिला आघाडीने आज जोरदार निषेध केला. वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे,अशा महिलांच्या उन्नतीसाठी दरमहा १५००/ रु.अशी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचे मानधन १५०० रु.वरून २१००/ रु. करण्याचे जाहीर आश्वासन दिले.आणि त्यांच्या मतांवर सत्ताही मिळवली,पण प्रत्यक्षात गेले दोन महिने लाडक्या बहिणींचे मानधन…
सुशील भोईर,वसई पूर्व कामण येथे सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे कॅन्सर निदान शिबीर संपन्न, कामण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिद्धार्थ फॉउंडेशन व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने काल कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. बदलत्या जीवनशैलीमुळे व भेसळयुक्त खाण्याच्या पदार्थामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. सिद्धार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कामण ग्रामपंचायतचे माजी सरपंच ऍड.दिनेश हरेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये मौखिक कॅन्सर तसेच स्त्रीरोग तज्ञाकडून स्त्रियांमध्ये आढळणारा स्तन व गर्भाशाय कॅन्सरची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये एकूण साठ लोकांची तपासणी झाली. यामध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. सदर शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी…
संजय नेवे,विक्रमगड, पालघर जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना वेळेवर मजुरी मिळावी, पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून,येथे मोठ्या प्रमाणावर मजूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार मिळवतात.मात्र मजुरांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात खा.डॉ.हेमंत विष्णु सवरा यांनी संसदेत सरकारला प्रश्न विचारला की, “ पालघर जिल्ह्यातील मजुरांना वेळेवर वेतन मिळावे,यासाठी सरकार कोणत्या ठोस उपाययोजना करत आहे ?,” यावर उत्तर देताना संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले की, “ १०० दिवसांची मजुरी वेळेवर देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.” मागील सरकारच्या कार्यकाळात,२०१३ – १४ मध्ये मजुरांना तब्बल ९ महिने मजुरी…
सुरेश वैद्य,सफाळे, पालघर जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,प्रकल्प संचालक ( जलजीवन मिशन ) अतुल पारसकर,जिल्हा कृषी विकास…
वसंत भोईर, वाडा हक्काच्या पैशासाठी बळीराजाची फरपट सुरू,आज आंदोलन होणार, आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या भाताचे पैसे शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतरही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या भाताचे पैसे तातडीने मिळावेत या मागणीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज वाडा तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख निलेश पाटील यांनी दिली. भात पीक लागवडीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे.३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांकडून बँक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले जाते.त्यामुळे ही रक्कम ३१ मार्च पूर्वी, मिळणे गरजेचे आहे.मात्र काही कारणांमुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शासनाने ३१ मार्चपर्यंत भात विक्रीची…
नवीन देसाई,वाशी, शिंदे यांच्यामागे आणखी एक शुक्लकाष्ठ, राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.दोन आठवड्यापूर्वी त्यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार भरवून त्यांनी शिंदे यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते.आता त्यांनी शिंदे यांच्या एका निर्णयाला आव्हान दिले आहे.मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी महानगरपालिकेत समाविष्ट करणारा अध्यादेश जारी केला होता.तो अध्यादेश रद्द करण्याची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.ही सर्व गावे पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत होती,पण मालमत्ताकराचा भार पडल्यामुळे ही गावे बाहेर पडली होती.पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी अध्यादेश करून ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात विमानतळ : विकासाच्या लाटेत स्थानिक भूमिपुत्र उध्वस्त होता कामा नये… दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना काही महत्वाच्या घोषणा केल्या.त्यामध्ये मुंबई व आसपासच्या महानगर प्रदेश विकास क्षेत्रात एकूण तीन विमानतळे असतील,या घोषणेचा समावेश होता.हे नवीन विमानतळ पालघर जिल्ह्यात वाढवण पंचक्रोशीत उभारण्यात येणार आहे.या भागात उभारण्यात येणाऱ्या महाकाय आधुनिक बंदराच्या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेन व आता विमानतळ उभारण्यात येत आहे.बंदर,बुलेट ट्रेन व आता नव्याने होऊ घातलेले विमानतळ,या तीन विकासकामांमुळे पालघर जिल्ह्याला वेगळी झळाळी येणार आहे.उद्योगधंद्याला चालना मिळून या उपप्रदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारचे हे निर्णय स्तुत्य असले तरी या प्रक्रियेत स्थानिक भूमीपुत्र…
सुरेश काटे,तलासरी तलासरी येथे ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा देणारा उपक्रम, तलासरी तालुक्यात, गुजरातच्या सीमेवर औद्योगिक क्षेत्र जवळ असल्याने मुलांना सहज रोजगार मिळतो, त्यामुळे उच्च शिक्षणाकडे त्यांचा कल कमी असतो. विशेषतः मुलींच्या शिक्षणामध्ये मोठी हेळसांड होत असते.घरातील अशिक्षित पालकांमुळे मार्गदर्शनाचा अभाव आणि समाजात उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांचे प्रमाण कमी असल्याने, मुलींना पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी ” सन्मान नारीशक्तीचा,” हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.३ ते ८ मार्च या कालावधीत शाळेने आपल्या परिसरातील शिक्षणाच्या जोरावर संघर्ष करून यश मिळवलेल्या महिलांना आमंत्रित करून त्यांचा गौरव करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचा मुख्य…
वसंत भोईर,वाडा देहर्जे प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या भूसंपादनात गैरव्यवहार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहर्जा मध्यम धरण प्रकल्पामुळे विस्थापित होणा-या धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भूसंपादन व मूल्यांकन समितीद्वारे थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप पीक ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र जोगवला यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे तक्रार केली आहे. देहर्जे प्रकल्प हा वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यात मौजे सुकसाळे येथे या प्रकल्पाचे काम सुरु आहे.या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात जांभे,साखरे, खुडेद ही एकूण तीन आदिवासी महसुली गावे येत असून चार पाडे अंशतः बाधीत…
