- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड सन २०२५ – ३० या कालावधीसाठी आज तहसील कार्यालयात सरपंचपदाची सोडत संपन्न, वअनुसूचित क्षेत्रातील येणाऱ्या ग्रामपंचायतीचे ५० % आरक्षण निश्चित केल्यानुसार अनुसूचित जमाती सरपंचपदाचे आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात पार पाडण्यात आली. या सोडतीमध्ये महिलांसाठी राखीव ग्रामपंचायती खालील प्रमाणे- तलवाडा,वेहेलपाडा,कऱ्हे तलावली,खडकी,डोल्हारी बु. जांभे,डोल्हारी खुर्द,करसोड, मोह बुद्रुक,ओंदे,केव,सारशी, देहर्जे,सवादे भोपोली घाणेकर,आंबेकर तर्फ धरमपूर,खुडेद, म्हसरोली,इंदगाव या ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असून उर्वरित १९ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीसाठी पुरुष राखीव ग्रामपंचायत,दादडे,उटावली, कुंझे,केगवाआलोंडा, सुकसाळे,वसुरी,साखरे, बोरांडा,कोंडगाव, चिंचघर,मलवाडा,चापके तलावली,बांधन,कासा बुद्रुक खोस्ते,उपराळे ,वेढेचरी ,टेटवाळी,या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास विद्यमान सरपंच, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तहसीलदार चारुशीला पवार यांच्या देखरेखीखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.
वसंत भोईर,वाडा वाड्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर,४२ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव, वाडा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पंचायत समिती प्रशिक्षण सभागृहात जाहीर केले. यावेळी ४२ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.सन २०२५ ते २०३० या काळावधीसाठी हे आरक्षण असणार आहे.वाडा तालुका हा पेसा क्षेत्रात येत असल्याने ८४ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तालुक्यातील सांगे नाणे,गालतरे,सुपोंडे,आंबिस्ते बुद्रूक.खानिवली, पिंपळास, आखाडा,कासघर, कळंभे,पीक,कोने,कोनसई, बालिवली, बिलघरऐनशेत, शेले,चिखले,कुयलू,मांगरूळ, बिलावली,मांडवा,उज्जैनी, डोंगस्ते,कुडूस,कोंढले, नारे,खुपरी,उसर,वसूरी बु.देवघर,केळठण,देवळी, हारोसाळे,जामघर,मानिवली, बुधावली,पोशेरी,तुसे,गांधरे, सोनशिव,सारसी व ब्राम्हणगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आरक्षण सोडतीस वाडा उपविभागीय कार्यालयाचे शिरस्तेदार सुनील लहांगे,नायब तहसीलदार रनजीत शिराळकर यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,…
दीपक मोहिते, ” सरकारसाठी लाजिरवाणी बाब, ” अक्षय शिंदे एनकाउंटर, सरकार तोंडावर आपटले, पोलिसांवर गुन्हे दाखल होणार, बदलापूर बलात्कार कथित प्रकरणी एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकार चांगलेच तोंडावर आपटले आहे.” करून दाखवले,” असे होर्डिंग लावणारे तसेच रुग्णालयात जाऊन पोलिसांना बुके देणाऱ्या महाभागावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण गुन्हेगारांना साथ देणारेही गुन्हेगार असतात. उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यानंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खिंडित पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही,असे स्पष्ट होत आहे.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाना फडणवीस सरकारने यापूर्वीच स्थगिती दिली आहे.तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,या दोघांनी ठाणे व पालघर जिल्ह्यावरील शिंदे गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी पालघर येथे जनता दरबार आयोजित केला होता.या जनता दरबारात ” सबकुछ भाजप,” असे चित्र पाहायला मिळाले.शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी या दरबाराकडे फिरकलेच नाही.या दरबारानंतर गणेश…
दीपक मोहिते, भाग क्र. २, ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे शेअर बाजार कोसळला,एका दिवसात १७ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व अॅलन मस्क या दोघांनी घेतलेल्या विविध निर्णयाविरोधात त्यांच्या देशातील छोटे व्यापारी व जनता आता रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागली आहे.पण हट्टी स्वभाव असलेले ट्रम्प आपल्या निर्णयात बदल करतील,असे वाटत नाही.दरम्यान ट्रम्प यांना रोखण्यासाठी चिनी ड्रॅगन पुढे सरसावला आहे.चीनच्या सरकारनेही ट्रम्प या निर्णयाला सडेतोड उत्तर दिले आहे.त्यांनीही अमेरिकेच्या उत्पादनावर लावण्यात येणारे शुल्क वाढवले आहे. दरम्यान ट्रम्प यांना अमेरिकन व्यापारी व लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.ट्रम्प यांच्या निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.काल जगभरातील शेअर बाजार जबरदस्त कोसळला.एका दिवसात सुमारे…
सुरेश वैद्य,सफाळे, ९ एप्रिल रोजी पालघर येथे लोकदरबाराचे आयोजन, पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुध.९ एप्रिल,२०२५ रोजी दु.३.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील,नियोजन समिती सभागृह,पालघर येथे लोक दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकदरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधणार असून पालघर जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख या लोकदरबारास उपस्थित राहणार आहेत.पालघर जिल्ह्यातील लोकदरबार कार्यक्रमामध्ये दु.१.०० वाजल्यापासून नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहेत.तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या लोकदरबारास उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
जव्हार प्रतिनिधी, देहरे आश्रमशाळा येथे करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न, विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी नंतर कोणत्या दिशेने वाटचाल करावी,कोणते करिअर निवडावे,स्पर्धा परीक्षा,कौशल्याधारित शिक्षण,तांत्रिक अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्र,परदेशी शिक्षण अशा विविध संधींबाबत योग्य माहिती मिळावी,या उद्देशाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,देहरे ( जव्हार ) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत “ दहावी व बारावीनंतर काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना समोरासमोर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर मानभाव ( पोलीस निरीक्षक, जव्हार ) यांनी पोलीस भरती,विविध स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती दिली.त्यांनी सायबर गुन्हेगारी व ‘अपघातमुक्त गाव’ या संकल्पनांचे प्रबोधन करत सामाजिक सजगतेचा…
रविंद्र राऊळ,मुंबई उत्तर मुंबईत साजरा झाला रामनवमी सोहळा, उत्सव रॅली,शोभा यात्रा,भव्य पालखी सोहळा आणि गरबा रजनी अशा अनेकविध धार्मिक कार्यक्रमांनी काल उत्तर मुंबई दुमदूमली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीने जल्लोषात अधिकच भर पडली. मालाड ( पूर्व ) येथील कुरार गावातील जमरुषी नगरात भव्य रामनवमी उत्सव रॅली काढण्यात आली. मालाडच्या गोरसवाडी येथील भद्रनगर राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. मालवणी येथील सकल हिंदू समाजातर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये विश्व हिंदू परिषद, दिंडोशी येथील बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मालाड ( पश्चिम ) येथील शैलेश नगरात भव्य रामनवमी जन्म उत्सव…
शशिकांत ठाकूर,कासा घोळ टोल नाक्याजवळ लाखों रु.चा खैराचा माल जप्त, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोळ टोलनाक्याजवळ काल मोठी कारवाई करत आठ लाख रु.चा अवैध वाहतूक करणारा खैर जप्त करण्यात आले.सदर कारवाई वनविभागाच्या गस्त पथकाने केली आहे.यामध्ये मालासह अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. सदर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर खैर सापडला असून या प्रकरणात ट्रकचालक सरफुद्दीन शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र,या तस्करीमागचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे समजते.यामागे मोठी टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर कारवाई कासा वन परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन.ए.हिरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे.के.चौधरी एम.ए. कांबळे आणि वनरक्षक आर. एस.हाडळ,वाय.पी.मोळे, यांच्या पथकाने केली.
वसंत भोईर,वाडा वाड्यात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा, जगातील सर्वांत मोठ्या, सुसंस्कृत आणि विकासाचे दृष्टिकोन असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज सकाळी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तालुका सरचिटणीस रोहन पाटील यांच्या हस्ते कार्यालयावर पक्षध्वज फडकवण्यात आला. भाजपा पक्षाने देशाला अनेक विधायक गोष्टी देऊन जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावण्याचे काम केले आहे.देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.राष्ट्र प्रथम,सेवाभाव सर्वोच्च, देव ,देश,आणि हिंदुधर्म संरक्षित व सुरक्षित करण्याचे काम भाजपने केले आहे.कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे भाजप अशी त्याची जनमानसात आज ओळख आहे. याप्रसंगी जेष्ठ नेत्या शुभांगी…
