- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
नारायण पाटील, विरार पूर्व, भाताणे-आडणे रस्त्याचे भूमिपूजन संपन्न, माजी आ.राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने एमएमआरडीएकडून मंजूर करण्यात आलेल्या भाताणे-आडणे रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन भाताणे येथील तलाव परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या या रस्त्याचे काम भाताणे नवसई येथील नदीपासून गावापर्यंत डांबरीकरण,तसेच तलावाच्या पुढे सिमेंट काँक्रिटीकरण,अशा दोन टप्प्यांत होणार आहे.हा रस्ता यापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या अखत्यारीत होता,त्यामुळे दुरुस्तीला विलंब होत होता.मात्र,माजी आ.राजेश पाटील यांनी एमएमआरडीए विभागाशी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून रु.६ कोटी निधी मंजूर करून घेतला. यासोबतच,पुढील टप्प्यात आडणे ते कळभोण रस्त्यासाठी रु. १२ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष…
संजय लांडगे,वाडा खा.डॉ.सवरा यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) आयुष मंत्रालय आणि राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली.या बैठकीत त्यांच्याकडे पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,यासाठी प्रस्तावित २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक अतिरिक्त निधी त्वरित मंजूर करावा,अशी मागणी खा.डॉ.हेमंत सवरा यांनी केली.या प्रकल्पासाठी कोट्यावधी रु.च्या निधीची गरज आहे. हे रुग्णालय झाल्यास पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई,ठाणे किंवा इतर ठिकाणी उपचारांसाठी जाण्याची गरज भासणार नाही,आणि त्यांना स्थानिक पातळीवरच चांगल्या आरोग्य…
भूषण वर्तक, केळवे – पालघर, लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे पारोळ १ येथे लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळावा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना सशक्त करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आशा चव्हाण जि.प.सदस्य,गीता पाटील माजी सभापती व पं.स. सदस्य,रमा किणी नगरसेविका,यज्ञा पाटील उपसरपंच, रवींद्र पाटील माजी उपसरपंच,कविता भूयाळ,ग्रा.प.सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,बालविकास अधिकारी,पर्यवेक्षिका आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजना,महिलांसाठी कायदा,( पोसो ) मोबाईल व इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी व तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोगाबाबत माहिती…
संजय लांडगे,वाडा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनिल पाडवी, वाडा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनिल दावा पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाडवी हे गेली तीन दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांना २६ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असून त्यांनी यापूर्वी प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ” माझी शाळा,सुंदर शाळा,” या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांचे शैक्षणिक कार्य व अनुभव याची दखल घेऊन संस्था व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिक्षण,हे गाव पाड्यावरील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असुन प्रत्येक पाड्यावरील मुलगा-मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात पोहोचला पाहिजे.ज्यामुळे…
अजित क्षीरसागर,ठाणे आपत्ती व्यवस्थापन समिती ; एकनाथ शिंदे यांना डच्चू ,समर्थकांमध्ये संतापाची लाट, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डच्चू देण्यात आल्यामुळे ठाण्यातील शिंदे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विद्यमान उपमुख्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काही काळ अबोला धरत महायुती सरकारच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर ठेवले होते.ते या काळात आपल्या मूळगावी दरे येथे विसावले होते.अनेक निरोप त्यांच्या निकटवर्तीयांतर्फे पाठवल्यानंतरही शिंदे यांची नाराजी कायम…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले का हो ? काल आपल्या वाढदिवसादिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडेसे आनंदी पाहायला मिळाले.त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केल्याचा कदाचित हा परिणाम असावा.कारण गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे दिल्लीपासून दुरावले आहेत.पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सध्या काय चालले आहे ? आणि कुठे आहात ? अशी विचारणा केली.ज्यावेळी आपल्यापासून दुरावलेली एखादी व्यक्ती आपली आस्थेने चौकशी करतो,तेंव्हा त्या दुरावलेल्या व्यक्तीला खूप नाही पण किंचित बरं वाटू लागते.त्यामुळे खूप दिवसांनी का होईना,शिंदे हे माध्यमांसमोर बोलते झाले,आणि त्यांनी माध्यमांना खडेबोल सुनावले. ते काय म्हणाले पहा जरा,ते…
सुनिता जोंधळे,नागपूर डॉ.क्षिप्रा उके व डॉ.शिवशंकर दास,दाम्पत्यांचा ६ वर्षाचा यशस्वी लढा : १२७ कोटींचा दावा मान्य, मालमत्तेच्या व्याख्येत बौद्धिक बौद्धिक संपत्तीच्या समावेशाचा युक्तिवाद मान्य. ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील ” प्रॉपर्टी,” ची व्याख्या व्यापक करण्यास न्यायालयास भाग पाडले. डॉ.क्षिप्रा उके व डॉ.शिवशंकर दास,हे पती – पत्नी दोघेही जेएनयुचे पीएचडीधारक.सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर ” सोशल पॉलिटिकल अवेरनेस अमंग लोकल युथ,” या विषयावर त्यांनी स्वखर्चाने नागपुरात संशोधन करण्याचे ठरवले. नागपूरात दीक्षाभूमीपासून अर्धा एक कि.मी.अंतरावर असलेल्या उच्च जातीयांचे वर्चस्व असलेल्या लक्ष्मीनगर मधील इमारतीत/वसाहतीत त्यांना घर भाड्याने मिळाले. काही दिवसांनंतर हे दोघे राजकीय घडामोडीमध्ये सहभागी होत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. रोहित वेमुलाच्या…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” संपर्कमंत्रीपद : भाजप,आयुधासारखा वापर करणार….. ज्या जिल्ह्यात आपला पालकमंत्री नाही,त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमण्याचा जो निर्णय भाजपने घेतला आहे तो शिंदे व अजित पवार गटांसाठी धोकादायक ठरणारा आहे.भाजप या पदाचा हा वापर हा आयुधासारखा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्याने नियुक्त झालेले संपर्कमंत्री या दोन्ही गटाच्या पालकमंत्र्यांच्या कारभारावर देखरेख तर ठेवणारच,परंतु आपल्या पक्षासाठी हानिकारक ठरू शकतील,असे निर्णय ते घेऊ देणार नाहीत.एकंदरीत हे संपर्कमंत्री ” वॉच डॉग,” ची भूमिका पार पाडणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची एक वेगळी छाप आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या मातृसंघटनेच्या छत्रछायाखाली वाढलेल्या भाजपला संघाने आखून दिलेल्या चौकटीत काम करावे लागते.गेल्या दहा बारा वर्षात हे आपण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शेतकरी,बेरोजगार व सर्वसामान्य माणूस मेला तरी बेहत्तर…! तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वच पक्षात ” फोडाफोडीच्या राजकारणा,” ला आता राजाश्रय मिळू लागला आहे.दर दिवशी अमुक माजी आमदार,तमुक पदाधिकारी या पक्षात गेला,त्या पक्षात गेला,अमुक पदाधिकारी नाराज असून लवकरच तो या पक्षात दाखल होणार,अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. एकमेकांचे आमदार,खासदार व पदाधिकारी गळाला लावणे,हे आता राष्ट्रीय कार्य आहे,असा समज जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला आहे. वास्तविक राज्यात लोकहीत, विकास व जनतेच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न आ वासून उभे असताना या राजकीय पक्षांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.राज्यात कृषी,आरोग्य,रोजगार, शिक्षण व पायाभूत…
अमन शेख,मनोर अंगणवाडी सेविकांचे प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मनोर येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) चंद्रशेखर जगताप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास विभाग,प्रवीण भावसार यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.सदर योजना पूर्वी आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत होती,मात्र आता ती महिला…
