Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी घोणसई गावात प्रचारफेरी, केंद्र सरकारतर्फे क्षयरोग देशमुक्त अभियान राबवण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून आज घोणसई गावात कुडूस आरोग्य विभाग व घोणसई ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली. ” टिबी हरेल,देश जिंकेल, दोन आठवड्याचा खोकला डाॅक्टरांना भेटा,” आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी डाॅ.आफताब शेख यांनी क्षयरोगाविषयी माहिती नागरिकांना दिली. आरोग्य विभागाचे डाॅ.शिरीष खैरनार,डाॅ.तनुजा पाटील,आरोग्य सहा. गणेश गायकवाड,आरोग्य सेवक अविनाश शिंदे,घोणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जाबर,उपसरपंच विशाल पाटील,सदस्य दिलीप पाटील, ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ आदींसह विद्यार्थी प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लोकांना सेल्फी नकोत,प्रत्यक्षात काम हवंय, ” नेमेची येतो पावसाळा,” या उक्तीप्रमाणे यंदाही वसई-विरारकर नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करून निवडून आलेले नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी,या ज्वलंत समस्येबाबत मूग गिळून बसले आहे.वसई-विरार परिसरात सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा-२ अंतर्गत सुरू होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या अंथरण्याचे काम वेगाने सुरू आहे.या कामाची पाहणी करताना लोकप्रतिनिधीची छायाचित्रे दररोज पाहायला मिळतात,पण प्रत्यक्षात पाण्याचे काय ? ही पाहणी सुरू असताना बाजूने जाणारे पाण्याचे टँकर्स,हे या लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.केवळ जलवाहिन्या पाहून लोकांच्या घश्याची कोरड जाणार नाही.महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा शहरात आतापासून लोकांना टँकर्सचा आधार घ्यावा लागत आहे.तर ग्रामीण भागातील महिलाना डोक्यावर हंडे घेऊन…

Read More

मनिष म्हात्रे,वसई वस‌ईत जागतिक महिला दिनानिमीत्त बाईक रॅलीचे आयोजन, डी फॅक्टरी,रॉयल थम्स,डार्क हॉर्स मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वसईमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आज वसईत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार महानगरपालिका मुख्यालय विरार येथून चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला दरम्यान रॅली काढण्यात आली होती. सकाळी अनेक महिला व पुरुष रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते. सामाजीक कार्यकर्ते नितीन म्हात्रे आणि प्रीती म्हात्रे यांनी रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर सकाळी ८:०० वाजता रॅलीला सुरुवात झाली.वस‌ईतील धवल नितीन म्हात्रे या बाईक रायडर तरुणाने २०१२ साली महिलांच्या कर्तुत्वांना वाव मिळावा,यासाठी जागतीक महिला दिनी बाईक रॅली काढण्यास सुरुवात केली होती.करोना महामारीच्या काळात धवल याचा दुदैवाने मृत्यू…

Read More

सुरेश काटे,तलासरी, कवाडा शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला तिरपुडे,ज्येष्ठ शिक्षिका जेष्ठ गीता गुडपे यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये कवाडा गावच्या सरपंच दर्शना बोदले यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना स्व:रक्षणाचे महत्व,संस्कार कसे दिले जावे, हे जिजाऊ मातेचे उदाहरणं देऊन सांगितले. तसेच या दिवशी शालेय विद्यार्थींनीनी जागतिक स्तरावर पराक्रमी शूरवीर महिलांची भूमिका सादर केली.निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या माध्यमातून इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या मुलांसाठी माता-पालक…

Read More

संजय लांडगे,वाडा भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश, भिवंडी-वाडा-मनोर या मार्गाच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम ईगल इंट्रोडक्शन या कंपनीला दिले असून,सदर कंपनीने रस्त्याच्या एका बाजूचे संपूर्ण खोदकाम केले आहे. मात्र,हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. सध्या वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून,संपूर्ण मार्गावर धुळीचे साम्राज्य आहे.यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात खा.डॉ.हेमंत सवरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर पालघर विभाग पोपट चव्हाण,प्रोजेक्ट मॅनेजर दीपक पवार व ठेकेदार यांना तातडीने वाड्यातील निवासस्थानी बोलावून घेऊन रस्त्याच्या सध्या सुरू असलेल्या वाहतूक मार्ग सुस्थितीत करणे, रस्त्यावरील मोठ्या…

Read More

वसंत भोईर,वाडा अंभई ग्रामस्थांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच, तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी बुधवार(दि.५) पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी ही सुरूच आहे. या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.साहित्य खरेदी करताना अवास्तव रकमांचे अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” समान नागरी कायदा ; केंद्र सरकारची सावध भूमिका, बहुचर्चित समान नागरी कायद्याच्या ( युसीसी ) प्रस्तावाला उत्तराखंड राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकार तो देशभरात लागू करण्यासंदर्भात हालचाल करेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण सुमारे चार महिन्याचा काळ लोटल्यानंतरही केंद्रीय स्तरावर फारशा हालचाली होऊ शकल्या नाहीत.हा कायदा लागू केल्यास देशभरात त्याचे कसे पडसाद उमटतील याविषयी केंद्र सरकार साशंक आहे.त्यामुळे या अतिसंवेदनशील विषयी सरकार सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी झालेल्या १८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्यांच्या जाहीरनाम्यात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याचे धोरणात्मक मार्गदर्शक तत्व…

Read More

दीपक मोहिते, राज्याच्या शहरी भागात दरडोई उत्पन्न वाढले, नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक पाहणीत आपल्या राज्याचे दरडोई उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रु.इतके झाले आहे.तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे १ लाख ८८ हजार ८९२ रु.आहे.मात्र ज्या शहराचे दरडोई उत्पन्न वाढले आहे,तेथे दरडोई खर्चात देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात एकूण ३६ जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धरण्यात आला आहे. तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्र दरडोई उत्पन्न दाखवण्यात आले आहे.अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील १२ जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या…

Read More

वसंत भोईर, वाडा ग्रामपंचायत खानिवलीची महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड, ग्रामपंचायत खानिवलीच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात येत असुन महिलांच्या रोजगार,व्यावसायिक प्रशिक्षणे,आरोग्य तपासणी,शिक्षण या विषयांवर भर देण्यात येत आहे.रोजगार हमीच्या कामांवर महिलांना १०० % प्राधान्य देण्यात आले आहे.अनेक व्यवसायभिमुख प्रशिक्षणे महिलांना देण्यात आली आहेत.या सर्वांचा एकत्रित परिणाम की केंद्र शासनाच्या पंचायत विकास निर्देशांकमध्ये देशातील साडे सातशे ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत.या मध्ये ग्रामपंचायत खानिवली ची निवड झाली असुन पालघर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. महाराष्ट्रातील ३४ ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये…

Read More

सुरेश काटे,तलासरी वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच, अपघाताचे प्रमाण वाढले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपुल,सेवा रस्ते इ. कामे काम शिल्लक आहेत.महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा,यासाठी सध्या काँक्रीटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा इ. कारणामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ कि.मी.लांबीचा महामार्ग येतो. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.या अपघातामध्ये ५७…

Read More