- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
नदीम शेख,पालघर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकमान्य नगर,मोहपाडा येथील नागरिक त्रस्त, पालघर नगरपरिषद हद्दीतील लोकमान्य नगर परिसरातील मोहपाडा रोड,मुख्य रस्ता,सध्या खोदलेला असून तो अनेक दिवसांपासून तसाच अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे.त्यामुळे या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून रुग्णवाहिका,अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन वाहने येऊ-जाऊ शकत नाहीत.अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना किंवा वैद्यकीय गरज उद्भवली,तर मदत पोहोचवणं कठीण होते. विशेष म्हणजे,या रस्त्याच्या लागून दोन शाळा आहेत.लहान मुलांना दररोज याच मार्गाने शाळेत ये-जा करावी लागते. स्थानिक नागरिक,दुकानदार आणि वयोवृद्धांना देखील प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.काहींनी पर्यायी मार्ग वापरण्याचा प्रयत्न केला,पण तोही पुरेसा सुरक्षित नाही. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष…
सचिन पाटील,विरार गणेशोत्सव संदर्भात मुर्तीकारांसोबत महानगरपालिका प्रशासनाची बैठक संपन्न, आयुक्त तथा प्रशासकअनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांचेसोबत गणेशोत्सव संदर्भात बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस उपायुक्त अर्चना दिवे यांनी महानगरपालिकेने गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी,गणेशमूर्ती विसर्जनासाठी केलेल्या नियोजनाची तसेच एकूण झालेल्या विसर्जनाबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली.आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने एकूण १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२४ मध्ये गणेशोत्सव काळात महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते,त्यापैकी एकूण १९ हजार ८५३ मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव,फिरते…
जव्हार प्रतिनिधी, नाचणी पिकांचे बियाणे मिनीकीटचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते वाटप, राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य उपअभियान ” श्री अन्न” अंतर्गत नाचणी पिकांचे मिनीकीट बियाणे वाटप कार्यक्रम मौजे देहरे येथे पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना बियाण्यांचे व पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक ड्रमचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी जव्हार जयराम आढळ,मंडळ कृषी अधिकारी, अशोक बागुल,उप कृषी अधिकारी अनिल डाबेराव, सहाय्यक कृषी अधिकारी भरत कोरडे तसेच राधाकृष्ण महिला बचतगटाच्या प्रमुख आदिवासी समाजसेविका मीरा महाले,इतर महिला सदस्या व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने…
वसंत भोईर,वाडा भारतीय युवकाने घडवला परकिय भूमीवर इतिहास ; तब्बल तीस तास धावला, तालुक्यातील नेहरोली येथील रहिवासी असलेला कुणाल विजयकुमार पाटील या जिद्दी तरुणाने नुकतीच इटली या देशामध्ये डोलोमाईट एक्स्टरीम ट्रेल रन ही जगातील प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा नुकतीच पार पडली.या स्पर्धेत तो तब्बल तीस तास धावून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. ही स्पर्धा इटलीमधील जगप्रसिद्ध डोलोमाईट डोंगररांगांतून धावण्याची असते.अंतर असते १०३ किलोमीटर,ही स्पर्धा केवळ धावण्याची नसून,डोंगर रांगांतून चढउतार करत हे अंतर पूर्ण करायची असते. अत्यंत कठीण डोंगर पायवाटा,नद्या,नाले,ओढे, जंगले पार करत धावावे लागते.काही ठिकाणी उतार एव्हढे तीव्र होते की आयोजकांनी खडकांना केबल बांधल्या होत्या,त्यापकडून काळजीपूर्वक खाली उतरावे लागते.पाय घसरला…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे अंगणवाड्यांमध्ये भव्य खेळ मेळावे संपन्न, जागतिक खेळ दिनाचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील विविध गावांतील अंगणवाड्यांमध्ये खेळ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले hote.जे.एस.डब्ल्यू. आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत हे कार्यक्रम साजरे झाले. या उपक्रमात पारंपरिक आणि आधुनिक खेळांचे सुंदर मिश्रण असलेले विविध स्पर्धात्मक आणि मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले.मोठ्या गटांचे खेळ,बैठक खेळ,काल्पनिक आणि संगीतावर आधारित खेळ,शारीरिक खेळ तसेच मुक्तपणे खेळता येणारे अनेक प्रकार अनुभवायला मिळाले. खो-खो,कबड्डी,लंगडी, रस्सीखेच,सायकल शर्यत, मटकाफोड,लिंबू-चमचा शर्यत, धावण्याच्या शर्यती,अशा पारंपरिक खेळांनी वातावरण आनंदमय झाले होते. बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या कविताचे सादरीकरण,गोष्टींचे सादरीकरण व भूमिकानिवेशन यांचाही समावेश यामध्ये करण्यात आला होता.…
दीपक मोहिते, समुद्रधन वाचवणे, ही काळाची गरज, दरवर्षी पावसाळ्यात सलग दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात येत असते.यंदाही १ जूनपासून ही बंदी लागू झाली असून ती सुमारे दोन महिने बंद राहणार आहे.हा काळ माश्याचा प्रजननाचा असल्यामुळे सरकार ही बंदी लादत असते.या काळात झालेली मासेमारी आपल्या व्यवसायावर गंडांतर आणते,हे लक्षात आल्यानंतर राज्यातील तमाम मच्छिमार संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वानुमते मंजुरी दिली.त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ही बंदी अंमलात येत आहे.या काळात मच्छिमार बोटी समुद्रकिनारी निवांत विश्रांती घेत असतात.प्रजनन काळात होणाऱ्या मासेमारीमध्ये माश्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल होत असते तसेच माश्याच्या अंड्याचाही नाश होत असतो व त्याचा परिणाम मत्स्य उत्पादन वाढीवर जाणवतो. गेल्या…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत, मे महिन्यात वीज पडून तलासरी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्याचे दोन बैल मृत्यूमुखी पडले होते, तसेच वीज पडून दोघे जण जखमी झाले होते.त्यांना शासना तर्फे मदतीचा धनादेश आ.विनोद निकोले यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक,नायब तहसीलदार मुकणे,ग्राम महसूल अधिकारी दिपक घाटाळ उपस्थित होते. मे महिन्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.वरवाडा गावातील संपत जाना करमोडा यांच्या दोन बैलांवर वीज पडून ते मृत्युमुखी पडले. त्यांना नुकसानभरपाई रक्कम ६३ हजार ४०० रु.व सुत्रकार या गावातील वीज पडून जखमी झालेल्या मनीषा संदीप वळवी व तिच्या मुलगा आशिष संदीप वळवी यांना रक्कम १० हजार रु. ची आर्थिक…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक खताचा साठा, पालघर जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ( आरसीएफ ) कंपनीकडून सर्व कृषी सेवा केंद्रांना मंजूर आवंटनानुसार खत पुरवठा करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खतसाठा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. खत पुरवठ्याचा संपूर्ण तपशील :- ( एप्रिल ते १३ जून २०२५ ):एप्रिल २०२५: मंजूर आवंटन १,३१० मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा १,९४८ मेट्रिक टन.मे २०२५: मंजूर आवंटन १,७०२ मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा १,७७४ मेट्रिक टन.१३ जून २०२५ पर्यंत: मंजूर आवंटन २,७५० मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा २,४७२…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकीय फायद्यासाठी जन्मदात्या बापाला बदलता येते का ? राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,असं म्हंटल जाते.ते एकप्रकारे खरंच आहे. पण राजकीय फायद्यासाठी आपला बापच बदलला जातो, याचा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेला प्रथमच आला आहे.आपल्या हिंदू धर्मात आपले आईवडील हे दैवत मानले जाते.आता त्यापैकी वडिलांना बदलण्याची प्रक्रिया काही तथाकथित हिंदुत्ववादी नेत्याने सुरू केल्यामुळे आता सवाल – जबाबचा सिलसिला सुरू झाला आहे.शहर विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती देण्यात आल्यामुळे आधुनिक काळातील या थोर पुत्राने आपला बापच बदलून टाकला.त्यामुळे उद्दिग्न झालेल्या त्याच्या ओरिजिनल बापाने आणि थोरल्या भावाने आपल्या धाकल्या भावाचे कान चांगलेच उपटले आहेत.पण आपल्या नेत्याला बाप बनवण्याच्या धुंदीत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” निवडणुका पुन्हा लांबणीवर पडता कामा नये, दोन दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला.याविषयी अधिकृतपणे अधिसूचना जाहीर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात आता हालचालीना सुरुवात झाली आहे.सर्वप्रथम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर येणाऱ्या हरकती व सूचनावर सुनावणी होणार आहे.या सुनावणीनंतर तयार करण्यात येणारा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडण्यासाठी सगळे अडचणीचे मार्ग मोकळे होणार आहेत.अनेक वर्षे रखडलेल्या या निवडणुका आता मार्गी लागणार असल्यामुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शिवसेनेचे ( उबाठा ) मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ही अधिसूचना…
