Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, हातबट्ट्याचा व्यवहार, ….अन्यथा एसटी महामंडळाच्या लाखमोलाच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात जातील.. व्यवसायिक जेंव्हा मंत्री होतो, तेंव्हा त्याचा व्यवसायिक दृष्टिकोन मात्र तसाच राहतो. आपण आता केवळ व्यवसायिक नसून लोकसेवक आहोत,याची त्यांना जाणीव नसते.राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.बिल्डर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहनमंत्री आल्या आल्या त्यांची वक्रदृष्टी एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जमिनीवर पडली व त्यांनी आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी या जमिनी विकण्याचा घाट घातला.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले.पण त्यानंतरही या प्रताप सरनाईकांचे प्रताप मात्र सुरूच आहेत. त्यांनी पुन्हा आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जमिनीवर २५० ठिकाणी व्यवसायिक तत्त्वावर…

Read More

दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायाच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठक, वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या काही महिन्यांपासून वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी अनेक विकासकामाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव आर्थिक निधीही दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील रस्ते,उड्डाणपूल,रिंगरुट, एसटी सेवेत नव्या वाहनाचा समावेश,गृहनिर्माण संस्थांना ओसी,सीसी उपलब्ध करणे,स्वयंपुनर्विकास व मासेमारी व्यवसायाच्या समस्या,याचा त्यामध्ये समावेश आहे. काल त्यांनी मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील मासेमारी प्रश्नासंदर्भात भेट घेतली व प्रदीर्घ चर्चा केली.मासेमारी व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याबद्दल त्यांनी राणे यांचे आभार मानले,तसेच मत्स्यव्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या,जेटी,नवीन रो रो सेवा सुरू करणे, मच्छीमारांच्या पारंपारिक जमिनी,मच्छीमारांच्या विविध मागण्या व प्रलंबित समस्या विषयी चर्चा केली.सदर बैठकीस…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” निवडणूक आयोगाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तूडवली… तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई,ठाणे, पालघर व उर्वरित राज्यातील मतदारांचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ समीप आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत गेल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अक्षरशः बोजवारा उडाला होता.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्व.निवडणुका आता लवकरच होत आहेत,त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रदीर्घ काळ प्रशासकीय राजवट राहणे,हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही,पण राजकीय पक्षाच्या दळभद्री राजकारणामुळे या निवडणुका सतत पुढे ढकलल्या गेल्या.काल राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्यातील एकूण २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.या निवडणुकीचे मतदान २…

Read More

दीपक मोहिते, भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने ? ” हल्लाबोल,” भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाशिक येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जे वक्तव्य केले,त्यावरून भविष्यात भाजपची वाटचाल कशी असेल,हे स्पष्ट होत आहे. नाशिक येथे झालेल्या भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चव्हाण,आपल्या भाषणात म्हणाले,” एक विचाराचं सरकार केंद्र,राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणे गरजेचे आहे.कारण,एक विचारांच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तर केंद्र व राज्याकडून येणारा विकास निधी योग्य लोकांच्या हाती जाऊन त्याचा सदुपयोग होईल.” वरकरणी,त्यांचे हे वाक्य साधं व विकासासंदर्भात असावे,असे वाटत असले तरी,या वाक्यामध्ये वेगळेपण दडले आहे.केंद्र सरकारची वाटचाल जी एकधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे,त्याला अनुसरून चव्हाण यांनी हे वक्तव्य केले…

Read More

दिपक मोहिते, ” दारुण वास्तव,” सरकार व विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत, आपले मायबाप सरकार व धनदांडगे,ग्रामीण भागातील आपल्या अन्नदात्यांची कशी क्रूर चेष्टा करत असतात,हे पालघर जिल्ह्यात नुकतेच अनुभवायला मिळाले.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात वाडा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या ७ एकर शेतातील भाताचे पीक आडवे झाले.उद्दीग्न अवस्थेत सापडलेल्या या शेतकऱ्याने विमा कंपनीकडे नियमानुसार नुकसानभरपाईची मागणी केली.या मागणीनुसार पंचनामा करण्यात आला व बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात विमा कंपनीने झालेल्या नुकसानापोटी २ रु.३० पैसे जमा केले. सदर बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.सरकार व खाजगी विमा कंपन्या आम्हा शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतात,अशी भावना येथील शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.या अशा घटना राज्याच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे एसटी सेवा मृत्युशय्येवर… ग्रामीण भागाची जीवन वाहिनी,अशी ओळख असलेली आपली जिवाभावाची एसटी सेवा आता शेवटचे आचके देऊ लागली आहे.मृत्यूशय्येवर निपचित अवस्थेत पडलेल्या या सेवेला प्राणवायू मिळण्याची शक्यता आता धूसर बनत चालली आहे.आपल्या राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे चांगल्या सेवेची पार दुर्दशा झाली आहे.ग्रामीण भागातील जनता आजही या सेवेतील लालपरीला जीव लावत आहेत.तर दुसरीकडे आपले नालायक राज्यकर्ते या सेवेची तिरडी बांधू पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा ही एकेकाळी देशभरात नावारूपाला आलेली सेवा म्हणून ओळखली जात असे.आज त्या सेवेची अवस्था ” पाहवत नाही,आणि सहनही होत नाही,” अशी झाली आहे.नोकरशाही व राज्यकर्ते या दोघांनी या सेवेचे अक्षरशः…

Read More

दीपक मोहिते, ” जय्यत तयारी,” महाविकास आघाडीमध्ये सामील होणे ; बविआचा कपाळमोक्ष होऊ शकतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या बिहार राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर कोणत्याही क्षणी जाहीर होतील,अशी शक्यता गृहीत धरून भाजप व बहुजन विकास आघाडी या दोघांनी जोरदार तयारी चालवली आहे.गेल्या काही दिवसात भाजपने पक्षाच्या विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने विभागवार कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचा धुरळा उडवून दिला आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत मतदारांच्या मनात नेमके काय आहे ? याविषयी अनेक राजकीय पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहेत.या निवडणुकीत जो पक्ष आपल्या पक्षाच्या प्रचाराचा भर ” परिसर विकास,” या ज्वलंत विषयावर राबवेल,मतदार त्यालाच डोक्यावर घेतील,असा अंदाज…

Read More

वसंत भोईर,वाडा भातपिकाच्या नुकसानापोटी फक्त २ रू. ३० पैशांची भरपाई, वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे.सोन्यासारखे आलेले भातपिक अद्याप शेतात पडून आहे.त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहेत.हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून त्यावर सरकार देखील मीठ चोळण्याचे काम करत आहे. तालुक्याच्या शिल्लोत्तर येथील एका शेतक-याला नुकसानभरपाई म्हणून फक्त २ रू.३० पैसे बॅंक खात्यात जमा झाल्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून त्याला बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातपीक चांगले आले होते.सोन्यासारखे पीक…

Read More

वसईतील वाहतूक कोंडी ; आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न, वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटील व गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.महानगर पालिका क्षेत्रातील एस.टी.आगाराच्या जागेचा पी.पी.पी.तत्वावर विकास करून तेथे पे अँड पार्क व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे. वसई तालुक्यातील अपुरी आणि विस्कळीत सिग्नल व्यवस्था,पुरेसे गतिरोधक नसणे,झेब्रा क्रॉसिंग नसणे,यामुळे नागरिकांना विशेष करून वयोवृद्ध जेष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.या बैठकीमध्ये महानगर पालिका क्षेत्रातील…

Read More

दीपक मोहिते, ” खबरदारी,” इच्छुक उमेदवारांनो अर्ज दाखल करताना अशी काळजी घ्या… स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजले असून राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे.युती व आघाडी करण्यासंदर्भात प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.पण आपापल्या प्रभागात निवडणुकीचे चित्र कसे असेल,याविषयीची धाकधूक प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मनात सुरू झाली आहे.आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आवश्यक ती कागदपत्रे तयार असावीत,यासाठी अनेक इच्छुक सध्या विविध कामामध्ये गर्क आहेत.अनेकदा अर्धवट माहिती,अपुरी कागदपत्रे आदी कारणांमुळे आजवर अनेकांवर आपली उमेदवारी गमावण्याची पाळी आली आहे.तशी ती आपल्यावर येऊ नये,यासाठी इच्छुक उमेदवाराने दक्षता घेण्याची गरज आहे.त्यासाठी खालील निवडणूक…

Read More