- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात मराठी माणूस अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर… परराज्यातून मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात स्थानिक भूमिपुत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.ज्या प्रचंड वेगाने हे स्थलांतरण होत असल्यामुळे वसई,नालासोपारा,बोईसर भागात मराठी माणूस आता अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या वरील तीन विधानसभा मतदारसंघात परप्रांतियांच्या मतदानामुळे जिल्ह्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले.या निवडणुकीत परप्रांतियांची मते निर्णायक ठरली होती.पालघर जिल्ह्यात १९७० च्या दशकात उद्योग व कारखानदारीला वेग आला.तारापूर-बोईसर भागात महा.औद्यो.विकास महामंडळ तसेच वसई भागात लघुउद्योगाला चालना मिळाली,आणि रोजगारानिमित्त या भागात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली.कालांतराने बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्या परप्रांतियांची वाढती…
दीपक मोहिते, ” वास्तव, ” गेले अकरा वर्ष,कालचक्र उलट्या दिशेने फिरत राहिले, काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्यामुळे मोदीना आता त्यांची भिती वाटू लागली आहे.अधिवेशनात राहुल गांधी,प्रियांका गांधी व त्यांच्या टीमने भारतीय संविधान, वक्फ बोर्ड,वाढती महागाई, बेरोजगारी,रुपयाचे अवमूल्यन,अरुणाचल व लडाख भागात चीनची होणारी घूसखोरी,आदी ज्वलंत विषयावर संसदेत प्रखर हल्ले चढवले.या हल्ल्याना मोदी,अमित शहा यांची टीम समर्थपणे तोंड देऊ शकले नाही.या अधिवेशनात सरकार बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळाले. येत्या १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेची अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे.या एक तपाच्या वाटचालीत ते भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत.उलट…
महिलांना प्रवास तिकीट दरात ५०% सवलत मिळावी- आ.स्नेहा दुबे वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रवास तिकीट दरात ५०% सवलत देण्याची मागणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच आयुक्त पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडाळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५०% सवलत जाहीर केली असून महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच एम.एम.आर.डी.ए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका प्राधिकरणानेही अशी सवलत देण्यास सुरुवात केली आहे, असे असताना आपल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत अद्याप दिली नाही, याकडे आयुक्तांचं लक्ष…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ” सुंदर पालघर जिल्हा,” अभियानाचा शुभारंभ, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून“प्लास्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त आणि सुंदर पालघर जिल्हा हे विशेष अभियान जिल्ह्यात गत २८ मार्च २०२५ रोजी सुरू करण्यात आले. या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ आज ११ एप्रिल २०२५ रोजी जव्हार तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, लोकनियुक्त सरपंच संघटना अध्यक्ष एकनाथ दरोडा,सरपंच संदीप माळी, सरपंच कल्पेश राऊत, सरपंच सुदाम उंबरसाडा ,महिला सरपंच सुनंदा घाटाळ व विविध विभागांचे…
सचिन परब,विरार विरार पूर्व कारगिल नगर येथे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार, स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेकडून कारगिल नगर रिक्षा स्टँड ते जयदीप हायस्कूलपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे,या कामासाठी अंदाजपत्रकीय रु.५८ लाख ५१ हजार १७/– इतका निधी उपलब्ध झाला आहे. या कामास आयुक्तानी ८ जाने. २०२५ रोजी मंजुरी दिल्यानंतर या कामाचा शुभारंभ काल श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत राऊत,माजी नगरसेविका चिरायु चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील,संगीता भेरे,हेमांगी पाटील व स्थानिक बहुजन विकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते,संबंधित ठेकेदार,रहिवासी उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गोरगरिबांच्या एसटीला खड्यात घालू नका, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी सध्या सुसाट वेगाने धावू लागली आहे.परिवहनमंत्री म्हणून सूत्रे हाती घेताच त्यांनी विविध योजना जाहीर करण्याचा धुमधडाका लावला आहे.नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी,६३ बस आगारांचा त्रिकुट पद्धतीने विकास,पालघर येथे आधुनिक पद्धतीचे बस टर्मिनल,आदीचा त्यामध्ये समावेश आहे.मात्र त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६ % च मिळणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे पैसा नसताना परिवहनमंत्री योजना जाहीर कशा करतात ? असा प्रश्न सर्वसामान्यजनासमोर उभा ठाकला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल अर्थखात्याच्या कारभारावर सडकून टीका केली.महिला व ज्येष्ठ नागरिकासाठी देण्यात आलेल्या ५० % सवलतीमुळे एसटीची आर्थिक घडी पार…
राजन अधिकारी,बोईसर, पालघर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी २२०० कोटीची गुंतवणूक, पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याकामी राज्य उद्योग व पालघर जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून तारापूर येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या या स्तुत्य अशा प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ,इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगासमवेत जवळपास २२०० कोटी रु.चे सामंजस्य करार करण्यात आले. पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १५८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.या प्रस्तावित गुंतवणुकीतून जिल्ह्यात अंदाजे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार असल्याचा दावा जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी गुंतवणूक परिषदेत…
उत्तर भारतीय विकास सेनेची मनसे विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, मनसेने गेल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे,असा फतवा जाहीर केल्यानंतर मनसे सैनिक प्रचंड आक्रमक झाले.त्यांनी निरनिराळ्या बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना दमबाजी केली.त्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या संघटनानीही सरकारला इशारा दिला. या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणी कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे जाहीर केल्यानंतर मनसे आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान उत्तर भारतीय विकास सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केल्यामुळे मनसेच्या संतापात भर पडली आहे. मनसेच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचा वापर व्हावा,अशी मागणी करण्यात…
दीपक मोहिते, विद्वेषाचे राजकारण, फुले चित्रपट : सरकार गप्प का ? छावा चित्रपटानंतर आता फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.” फुले, ” हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे.यामध्ये ” स्कॅम १९९२,” वेब सीरिज फेम प्रतिक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ” फुले,” या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता.या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकताना दाखवलं आहे.हा प्रकार दाखवण्यास आमचा विरोध नाही. मात्र फुले यांच्या शाळेला मदत करणारे ब्राम्हणच होते,हे या ट्रेलरमध्ये…
सचिन परब,वसई, गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे ( उबाठा ) वसई येथे आंदोलन… केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत रु.५० ने दरवाढ केली आहे.त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेच्या त्रासात भर पडली आहे. सर्वसामान्य जनतेवर कराचे ओझे वाढवणाऱ्या मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुक्र.११ एप्रिल २०२५ रोजी सायं.५.०० वाजता,नवघर बस स्टँड,वसई रेल्वे स्टेशन ( प. ), येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी या आंदोलनात आपण सर्व शिवसैनिक,महिला आघाडी,युवा सेना,तसेच संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
