- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
संजय लांडगे,वाडा वाडा एसटी आगारात पाणपोईची सोय, वाडा बस आगाऱात असलेली पाणपोई नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.याविषयी माध्यमामध्ये वृत्त झळकल्यानंतर त्याची दखल चार्मोद्याग कामगार सेनेचे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड यांनी घेतली.जगदंबा कंपनीचे मालक मालपाणी यांच्याकडून वॉटर कूलर आरो सिस्टम उपलब्ध करून दिला. या पाणपोईमुळे नागरिक व प्रवाश्यांना २४ तास थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे. आज कामगार दिनाचे औचित्या साधून पाणपोईचे लोकार्पण जगदंबा कंपनीचे व्यवस्थापक सुशील तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.या यावेळी वाडा आगाराचे कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मनिष धानू,डहाणू महाराष्ट्र दिनी ५ लाख सीड बोल्स निर्मितीचा संकल्प, महाराष्ट्र दिनानिमित्त ” पर्यावरण वाचवा,” वसुंधरा सजवा,” या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात नवीन प्रयोगाला सुरूवात झाली आहे.या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते,खासदार डॉ.हेमंत सवरा,जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.विजेत्यांना प्रशस्तीपत्रासह ” सीड बॉलचा डबा,” देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,संगीता भागवत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये चर्चेत येणारे नाव म्हणजे ” सीडबॉल मॅन,” दीपक देसले यांचे.जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा, कोसबाड ( ता. डहाणू )…
संजय लांडगे,वाडा वाड्यात अक्षय तृतीया निमित्त आयोजित शिवजयंती उत्साहात साजरी, शिवसेना ( उबाठा ) वाडा शाखेतर्फे अशोकगड येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शिवपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवचरित्राचा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचवणे, त्यांचे विचार,त्यांचा इतिहास प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असल्याचे मत ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले. स्व.धर्मवीर आनंद दिघे यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा चालू केली.वाडा शहर शाखेतर्फे दरवर्षी ती उत्साहात साजरी केली जाते. ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष…
संजय लांडगे,वाडा कामगाराच्या हस्ते झेंडावंदन संपन्न, आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे या आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सन्मानासाठी पुढाकार घेऊन विविध संकल्पना राबवत असतात. आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयातील झेंडावंदन करण्याचे दायित्व त्यांनी गावातील जेष्ठ कामगार तथा गावातील प्रतिष्टीत व्यक्तिमत्व ह.भ.प. सतीश दूंदाराम पाटील ( भाऊ ) यांच्याकडे सोपवले.ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच साक्षी साठे तसेच उपसरपंच सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांनी प्रथम त्यांचे स्वागत करून सत्कार केला व त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवण्यात आला. सोबत माध्यमिक विद्यामंदिर अबिटघर येथे सरपंच साक्षी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी माध्यमिक विद्यालय…
नवीन पाटील,सफाळे विनयभंग करणा-या आरोपीस एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा, पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलिस ठाणे हद्दीतील केळवा रोड धोंदलपाडा भागात एका महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या ओमकार संतोष जाधव रा. पिलाजीनगर,केळवा रोड पूर्व याला पालघर न्यायालयाने एक वर्षाची कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पिडीत फिर्यादी या धोंदलपाडा,केळवे रोड पूर्व येथे टिकलीला स्टोन लावण्याचा कच्चा माल घेवून जात असतांना आरोपी ओमकार संतोष जाधव या तरुणाने पिडीत महिलेच्या मानेला पकडले.त्यावेळी त्या महिलेने त्यास जोरात झटका देवून स्वतः ला सोडवून घेवून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पिडीत महिलेची साडी…
संजय ठाकूर,चहाडे कुणबी सेनेने केलेल्या मागणीला यश – अविनाश पाटील, गेल्या पंचवीस वर्षापासून म कुणबी सेनेने संघटनेच्या स्थापनेपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती.ती मागणी आता मार्गी लागल्यामुळे कुणबी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या २५ वर्षात संघटनेने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन ठिकाणी आरक्षण परिषदा घेतल्या होत्या. या तिन्ही ठिकाणी झालेल्या परिषदांमध्ये जातनिहाय जनगणना करावी,ही प्रमुख मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने याबाबत आता निर्णय घेतला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भारतात जनगणनेला सुरुवात ब्रिटिशांच्या काळात झाली होती १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना केली गेली १९३१ पर्यंत करण्यात आलेल्या…
नदीम शेख,पालघर शरीर स्वास्थासाठी प्रत्येकाने खेळायला हवे – जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, आपलं शरीर सुदृढ राहावे, यासाठी प्रत्येकाने खेळामध्ये रुची दाखवली पाहिजे.खेळामुळे व्यक्तिमत्व खुलते,बुद्धिमत्ता तरल होते.मानसिक स्वास्थही सुदृढ राहते.त्यासाठी प्रत्येकाने खेळायला हवे.असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींना दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघरतर्फे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर करण्यात आले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गिरीश इरनाक,आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर अभिजीत गुरव व जयवंती देशमुख आदी उपस्थित होते. प्रत्येक मुलाने दरवर्षी एक नवीन खेळ खेळायला शिकले पाहिजे.खेळल्यामुळे…
वसंत भोईर,वाडा, कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन, आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामविकास संघर्ष समितीतर्फे कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर उद्या सकाळी १०.३०वाजता आपल्या न्याय हक्कांसाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कुयलू ग्रामपंचायत हद्दीतील प्रदूषणकारी टायर कंपन्यांचे सर्व काम तात्काळ थांबवण्यात यावे,बंद पडलेली जलस्वराज्य व नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्यात यावी,रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी तातडीने मजुरांना देण्यात यावी,घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी बांधकामासाठी निधी द्यावा, महीला ग्रामसभा न घेता फक्त सह्या घेतल्या जातात,याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी,ग्रामस्थांच्या माहीती अधिकार अर्जावर मुदतीत उत्तर दिले जात नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी.अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामविकास संघर्ष समितीचा कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले…
संजय लांडगे,वाडा महिलांसाठी मोफत शिवणकला केंद्र, वाडा तालुक्यातील वावेघर येथील स्वामी समर्थ मंदिर येथे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मोफत शिवण कला शिकता यावी,या उद्धेशाने काल स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिवणकला केंद्राचे उद्घाटन स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपचे करण्यात आले. सदर शिवणकला केंद्राच्या उदघाटन प्रसंगी स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, समाजिक कार्यकर्ते श्याम ठाकरे,गोवर्धन पटेल, सानिका गगे शिवणकला शिक्षिका आदी उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा स्वागतार्ह निर्णय, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती दिली.केंद्रसरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती.स्वातंत्र्योत्तर काळात होत असलेली ही पहिलीच जातनिहाय जनगणना आहे.यापूर्वी १९३१ मध्ये अशी जातनिहाय जनगणना झाली होती. आपल्या देशात ब्रिटिशांच्या काळात सर्वप्रथम १८७२ मध्ये जनगणना सुरू झाली.सन १९३१ पर्यंत ज्या ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली.त्यामध्ये जातीसंदर्भातील माहितीची नोंदणी करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या…
