Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” वास्तव, ” गेले अकरा वर्ष,कालचक्र उलट्या दिशेने फिरत राहिले, काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्यामुळे मोदीना आता त्यांची भिती वाटू लागली आहे.अधिवेशनात राहुल गांधी,प्रियांका गांधी व त्यांच्या टीमने भारतीय संविधान, वक्फ बोर्ड,वाढती महागाई, बेरोजगारी,रुपयाचे अवमूल्यन,अरुणाचल व लडाख भागात चीनची होणारी घूसखोरी,आदी ज्वलंत विषयावर संसदेत प्रखर हल्ले चढवले.या हल्ल्याना मोदी,अमित शहा यांची टीम समर्थपणे तोंड देऊ शकले नाही.या अधिवेशनात सरकार बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळाले. येत्या १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेची अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे.या एक तपाच्या वाटचालीत ते भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत.उलट…

Read More

महिलांना प्रवास तिकीट दरात ५०% सवलत मिळावी- आ.स्नेहा दुबे वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रवास तिकीट दरात ५०% सवलत देण्याची मागणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच आयुक्त पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडाळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५०% सवलत जाहीर केली असून महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच एम.एम.आर.डी.ए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका प्राधिकरणानेही अशी सवलत देण्यास सुरुवात केली आहे, असे असताना आपल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत अद्याप दिली नाही, याकडे आयुक्तांचं लक्ष…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ” सुंदर पालघर जिल्हा,” अभियानाचा शुभारंभ, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून“प्लास्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त आणि सुंदर पालघर जिल्हा हे विशेष अभियान जिल्ह्यात गत २८ मार्च २०२५ रोजी सुरू करण्यात आले. या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ आज ११ एप्रिल २०२५ रोजी जव्हार तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, लोकनियुक्त सरपंच संघटना अध्यक्ष एकनाथ दरोडा,सरपंच संदीप माळी, सरपंच कल्पेश राऊत, सरपंच सुदाम उंबरसाडा ,महिला सरपंच सुनंदा घाटाळ व विविध विभागांचे…

Read More

सचिन परब,विरार विरार पूर्व कारगिल नगर येथे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार, स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेकडून कारगिल नगर रिक्षा स्टँड ते जयदीप हायस्कूलपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे,या कामासाठी अंदाजपत्रकीय रु.५८ लाख ५१ हजार १७/– इतका निधी उपलब्ध झाला आहे. या कामास आयुक्तानी ८ जाने. २०२५ रोजी मंजुरी दिल्यानंतर या कामाचा शुभारंभ काल श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत राऊत,माजी नगरसेविका चिरायु चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील,संगीता भेरे,हेमांगी पाटील व स्थानिक बहुजन विकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते,संबंधित ठेकेदार,रहिवासी उपस्थित होते.

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गोरगरिबांच्या एसटीला खड्यात घालू नका, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी सध्या सुसाट वेगाने धावू लागली आहे.परिवहनमंत्री म्हणून सूत्रे हाती घेताच त्यांनी विविध योजना जाहीर करण्याचा धुमधडाका लावला आहे.नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी,६३ बस आगारांचा त्रिकुट पद्धतीने विकास,पालघर येथे आधुनिक पद्धतीचे बस टर्मिनल,आदीचा त्यामध्ये समावेश आहे.मात्र त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६ % च मिळणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे पैसा नसताना परिवहनमंत्री योजना जाहीर कशा करतात ? असा प्रश्न सर्वसामान्यजनासमोर उभा ठाकला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल अर्थखात्याच्या कारभारावर सडकून टीका केली.महिला व ज्येष्ठ नागरिकासाठी देण्यात आलेल्या ५० % सवलतीमुळे एसटीची आर्थिक घडी पार…

Read More

राजन अधिकारी,बोईसर, पालघर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी २२०० कोटीची गुंतवणूक, पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याकामी राज्य उद्योग व पालघर जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून तारापूर येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या या स्तुत्य अशा प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ,इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगासमवेत जवळपास २२०० कोटी रु.चे सामंजस्य करार करण्यात आले. पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १५८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.या प्रस्तावित गुंतवणुकीतून जिल्ह्यात अंदाजे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार असल्याचा दावा जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी गुंतवणूक परिषदेत…

Read More

उत्तर भारतीय विकास सेनेची मनसे विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, मनसेने गेल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे,असा फतवा जाहीर केल्यानंतर मनसे सैनिक प्रचंड आक्रमक झाले.त्यांनी निरनिराळ्या बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना दमबाजी केली.त्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या संघटनानीही सरकारला इशारा दिला. या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणी कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे जाहीर केल्यानंतर मनसे आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान उत्तर भारतीय विकास सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केल्यामुळे मनसेच्या संतापात भर पडली आहे. मनसेच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचा वापर व्हावा,अशी मागणी करण्यात…

Read More

दीपक मोहिते, विद्वेषाचे राजकारण, फुले चित्रपट : सरकार गप्प का ? छावा चित्रपटानंतर आता फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.” फुले, ” हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे.यामध्ये ” स्कॅम १९९२,” वेब सीरिज फेम प्रतिक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ” फुले,” या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता.या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकताना दाखवलं आहे.हा प्रकार दाखवण्यास आमचा विरोध नाही. मात्र फुले यांच्या शाळेला मदत करणारे ब्राम्हणच होते,हे या ट्रेलरमध्ये…

Read More

सचिन परब,वसई, गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे ( उबाठा )  वसई येथे आंदोलन… केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत रु.५० ने दरवाढ केली आहे.त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेच्या त्रासात भर पडली आहे. सर्वसामान्य जनतेवर कराचे ओझे वाढवणाऱ्या मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुक्र.११ एप्रिल २०२५ रोजी सायं.५.०० वाजता,नवघर बस स्टँड,वसई रेल्वे स्टेशन ( प. ), येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी या आंदोलनात आपण सर्व शिवसैनिक,महिला आघाडी,युवा सेना,तसेच संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा येथे विद्यार्थ्यांना दिले सायबर सुरक्षेचे धडे, वाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्त्तात्रेय किंद्रे,यांनी आज आय.टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,वाडा विद्यार्थ्यांसाठी ” सायबर सुरक्षा,” विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. यावेळी सायबर क्राईम सोबतच मुलं,मुली,आचरण, गुन्हे,शिक्षा,सोशल मीडियाचा वापर,यशस्वी जीवन, भविष्यातील करिअरच्या वेगवेगळ्या संधी इ.संलग्न विषयांवर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे आणि गोपनीय विभागाचे चेतन सोनावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना केवळ संगणक प्रशिक्षण मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास,हा उपक्रमामागील हेतू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे संचालक कल्पेश ठाणगे यांनी केले. सदर कार्यक्रम वाडा पोलीस ठाण्याच्या सभागृहात घेण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.

Read More