Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, भयानक परिस्थिती, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वसईची चारही शहरे बकाल, वसई-विरार उपप्रदेशात अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे.यावर नियंत्रण आणण्याकामी वसई-विरार शहर महानगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे.नालासोपारा रेल्वे स्थानक व तूळींज पोलीस ठाणे परिसराला अनधिकृत फेरीवाल्यानी वेढा घातला असून त्यांना हटवण्यासंदर्भात पोलीस यंत्रणा देखील हतबल झाली आहे.हे सर्व अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय असून त्यांना एका परप्रांतीय कुटुंबाचे संरक्षण आहे.या शहराच्या पूर्व भागातील तूळींज,आचोळे या दोन परिसरात करदात्यांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे.पदपथावर आक्रमण करणारे पोलीस,मनपा अधिकारी व माजी नगरसेवक व नगरसेविका यांना दरमहा ठराविक रक्कम देत असतात,त्यामुळे या ज्वलंत समस्येची आजवर उकल होऊ शकली नाही.हप्ते वसुली वरून…

Read More

दीपक मोहिते, हल्लाबोल, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे, गेल्या सात दशकात आपल्या देशाची आर्थिक स्थिती इतकी कधीच खालावली नव्हती,असे निती आयोगाच्या तज्ज्ञांच्या समूहाने म्हंटलं आहे.आपली अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असल्याचे निती आयोगाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. देशाचा अर्थसंकल्प नूकताच जाहीर झाला आहे.मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणूस किंवा लाखाचा पोशिंदा असलेला शेतकरी कुठेच पाहायला मिळत नाही.दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणसाच्या गरजेच्या वस्तू उदा.दूध,दही,सारख्या वस्तूवर जिएसटी लावणारे केंद्र सरकार हे आपले सरकार कधीच होणार नाही.अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प सरकारने आपल्या देशावर २६ % टॅरिफ लादून आपल्या प्रिय मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे आपले पंतपधान नरेंद्र मोदी आता अमेरिकेत जाऊन “…

Read More

सुरेश काटे,तलासरी बंधाऱ्याच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू अंघोळीसाठी बंधाऱ्याच्या पाण्यात उतरलेल्या एका इसमाचा नाका,तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाल्याची घटना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून याबाबत तलासरी पोलीस स्टेशनाला आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काल संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान दापचरी येथील महादेव मंदिरा समोर असलेल्या नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यात अंघोळ करण्या साठी उतरलेल्या भूपेंद्र चिमणलाल प्रजापती वय ५७ वर्ष रा.मदनवाड मिस्त्री चाळ तालुका बलसाड जिल्हा बलसाड राज्य गुजरात,यांचा बंधाऱ्यातील पाणी नाका तोंडात जाऊन मृत्यू झाला,याप्रकरणी तलासरी पोलीसानी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Read More

वसंत भोईर,वाडा पाण्यासाठी महिलांना रात्रभर लागते जागावे लागते ;. महिलांना विहीरी,नदीपात्रात पाण्यासाठी उतरावे लागते, वाडा तालुक्यापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर असलेल्या हरोसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण पाडा व उंबरोठे ग्रामपंचायत क्षेत्रातील नदीपाडा येथील विहीरींनी तळ गाठला आहे.दोन ते तीन हंडे पाण्यासाठी संपूर्ण रात्र जागरण करून येथील महिलांना पाणी भरावे लागत आहे.या गावपाड्यासाठी मंजूर असलेली जलजीवन योजनेची पाणी पुरवठा योजना अडीच वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी त्राही त्राही झाली आहे. वाडा शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर हरोसाळे ही ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण पाडा असून या पाड्याची लोकसंख्या तीनशेच्या आसपास आहे.या पाड्यासाठी एक विहीर असून पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.त्यामुळे गावात…

Read More

वसंत भोईर,वाडा माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न, वाडा तालुक्यातील आंबिस्ते हायस्कूल येथील १९९३-९४ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लेक फिशरिया ऐनशेत येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. सर्वच सवंगड्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाला दिला.तो काळ कठीण होता,रोजगाराची फारशी साधने नव्हती.त्यामुळे प्रत्येकाने हलाखीच्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आठवण अनेकांच्या मनोगतातून व्यक्त झाली.यावेळी उपस्थित भगिनींना उद्योजक जगदीश पाटील यांच्यातर्फे साड्यांची भेट देण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पाडण्याचे काम सर्व सहकाऱ्यांनी केले.

Read More

शशिकांत ठाकूर,कासा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी ; वाहनचालक त्रस्त, डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला गेल्या शनिवारपासून सुरुवात झाली असून दर्शन व जत्रेकरीता गुजरात वरून येणाऱ्या भाविकांमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला १२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.ही जिल्ह्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. १५ दिवस चालणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेत मुंबई,ठाणे,गुजरात व आजूबाजूच्या शहरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे तसेच जत्रेचा दुसरा दिवस असल्याने गुजरात तसेच राजस्थान येथून मोठ्या प्रमाणावर भाविक आले आहेत. त्यामुळे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने…

Read More

शशिकांत ठाकूर,कासा महालक्ष्मी यात्रेत दोन दिवसापासून भाविकांची प्रचंड गर्दी,दर्शनासाठी लांबच लांब रांगा, पालघर जिल्ह्यातील विवळवेढे – डहाणु येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या पंधरा दिवसीय यात्रेला चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.पहिल्या दोनच दिवसात लाखो भाविकांनी भेट दिली. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.वीकेंड आणि त्यासोबत आलेल्या सुट्टी आल्यामुळे आजही भाविकांचा ओघ सुरूच होता.यात्रेनिमित्त स्थानिक प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून भक्तांच्या सोयी सुविधेकडे लक्ष दिले जात आहे. दरम्यान रूढी व परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेपासून यात्रेचे आयोजन केले जाते, यात्राकाळात महालक्ष्मी देवीला आकर्षक व नवीन शृंगार करण्याची पद्धत आहे. तर मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांच्या आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.पहिल्याच दिवशी मातेचे दर्शन घेण्यासाठी…

Read More

अविनाश मढवी,नालासोपारा ४० दिवसांची फज्र की नमाज पूर्ण करणाऱ्या मुलांना  सायकलीचे वाटप, नालासोपारा येथील झेडपी जकेरिया शाळेत हजरत बिलाल फाउंडेशनतर्फे सलग ४० दिवस ” तकबीर ए उला के साथ फजर की नमाज,” पूर्ण करणाऱ्या लहान मुलांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सदर नमाज पढण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता मशिदीत जावे लागते,विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये धर्माविषयी जागृती व्हावी,तसेच त्यांना सकाळी उठण्याचे चांगली सवय लागावी.जेणेकरून त्यांचा शारीरिक आणि शैक्षणिक फायदा होईल,या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमास सोपारा विभागातील मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.एकूण ४७५ मुले या उपक्रमात सहभागी होते.परंतु सलग ४० दिवस नमाज पूर्ण करण्यामध्ये १९३ मुले यशस्वी झाले होते.या सर्व…

Read More

दीपक मोहिते, भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश, विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत. भूषण गवई नेमके कोण आहेत ? त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द कशी होती याविषयी आपण जाणून घेऊया.म     महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहे.ते ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते,माजी आमदार,खासदार आणि बिहार,सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेले…

Read More

नवीन पाटील,सफाळे येत्या १८ ते २० एप्रिल दरम्यान ५ व्या केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी असलेल्या केळवे येथे दरवर्षी केळवा बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत असतो.यंदाही हा महोत्सव केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ व ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त सहकार्याने १८ ते २० एप्रिल दरम्यान ५ वा केळवे बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आजवर झालेल्या महोत्सवात दरवर्षी कार्पोरेट,सेमी कॉर्पोरेट,स्थानिक मच्छीमार, वाडवळ,आगरी,भंडारी मुस्लिम,आदिवासी समाजातील महिला विविध प्रकारचे पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावत असतात. कार्पोरेट व सेमी कॉर्पोरेट विभागाचेही १०० हून अधिक स्टॉल्स महोत्सवात मांडण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे पारंपारिक नृत्य,विविध प्रांतातील…

Read More