- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” भागृहाचा सन्मान व गरिमा,सर्वांनीच जपायला हवा… काल कुणाल कामरा प्रकरणावर विधानसभा सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.अत्यंत पोटतिडकीने सभागृहाचा आदर व सन्मानाबाबत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.वास्तविक विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज हे भारतीय संविधानानूसार चालणे,अपेक्षित असते.पण हल्ली तसं होत नाही.भारतीय संविधानाला सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या लेखी आता काडीची किंमत नसल्याचे वेळोवेळी अनुभवायला मिळाले.सभागृहाचा अवमान व सभागृहाची गरीमा यावर फडणवीस हे आपल्या भाषणात बरंच काही बोलले.सभागृहा प्रती त्यांची आत्मीयता व संवेदना आपण समजू शकतो.पण गेल्या साडेतीन ते चार वर्षाच्या काळात सभागृहाच्या गरिमाला नख लावण्याचे काम कोणी केले,याची पडताळणी केली तर महायुतीचे अनेक…
सुरेश वैद्य,सफाळे पालघर जिल्हा परिषदेचा ₹ ७६.५४ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर, पालघर जिल्हा परिषदेचा ₹ ७६ कोटी ५४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सादर केला. २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प आणि २०२४-२५ चा सुधारित अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत,यंदा ६.५० % इतका वाढला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,लेखाधिकारी विकास पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य,शिक्षण,कृषी, पशुसंवर्धन,समाजकल्याण, महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण आणि लघु पाटबंधारे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” कुणाल कामराचे गाणे : शिंदे यांचा गेम नक्की कोणी केला? सध्या कुणाल कामरा यांनी सत्ताधाऱ्यांची झोप पार उडवली आहे.त्याच्या एका गाण्याने शिंदे गटाच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी त्याच्या स्टुडिओची प्रचंड नासधूस केली.वास्तविक शिंदे यांनी कामरावर निंदानालस्ती केल्या प्रकरणी न्यायालयात दावा ठोकायला हवा होता,ते न करता त्यांच्या पिल्लावळीने हिंसक मार्ग स्विकारत त्याचा स्टुडिओ व ज्या हॉटेलमध्ये कामरा याचा शो होता,त्या हॉटेलचे जवळपास २५ लाखाचे नुकसान केले.आता या हॉटेलचा मालक सरकारला ” या प्रकरणी आमचा दोष काय ? असा प्रश्न विचारत आहे.या प्रश्नाचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. या…
नाशिक प्रतिनिधी, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये चार श्रमसंहिता व जन सुरक्षा कायद्याची होळी, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी चौफुली जवळ केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारतर्फे १ एप्रिल २०२५ पासून नवीन लेबर कोड कायदा व महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा लागू करणार आहे.त्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात निदर्शने करण्यात आली. हे कायदे कामगार,शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाहीत,त्यास विरोध करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे कामगार एकत्र येऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी चार लेबर कोड व जनसुरक्षा कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.नासिक वर्कर्स युनियनचे चिटणीस कॉ. आत्माराम डावरे व सरचिटणीस कॉ.तुकाराम सोनजे यांनीयावेळी मार्गदर्शन केले.या आंदोलनामध्ये अरविंद…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग होण्याची शक्यता… राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरु असताना आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खा.संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला आहे.ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रायगडावरील या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.तसेच,वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती कुठून झाली, यावर त्यांनी भाष्य केलं आहे.एका नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं…
वसंत भोईर,वाडा सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाड्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था, गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामात नापीकीपणाचा सामना करावा लागत आहे.यंदाही खरीप हंगामात अतिवृष्टी व दोनदा आलेल्या महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले.हाती आलेले धानाचे पीक मातीमोल झाले आहे.नदी व नाल्यांच्या काठावरील शेती पिकांसह खरडून वाहून गेली.त्यातच लष्करी अळीसह कीड व रोगांनी पीक नेस्तनाबूत केले आहे. यंदा शासनाने तेवीसशे रु.चा हमीभाव जाहीर केला.परंतु दोन महिने उशिरा हमीभाव केंद्र सुरू झाले. आर्थिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रु.च्या भावाने धान विकावे लागले.सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यंदा माती पडली आहे.धानाची साडेसाती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.शासनाच्या मार्गदर्शनामध्ये शेतकरीवर्ग धानाच्या शेतीत विविध प्रयोग करत असतात.परंतु…
सुरेश काटे,तलासरी तलासरी येथे शहीद दिनानिमित्त मशाल रॅलीचे आयोजन, २३ मार्च १९३२ रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे आपल्या देशात २३ मार्च हा दिवस शहिद दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने काल सांय.डीवायएफआय,तलासरी तालुकातर्फे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ही रॅली तलासरी गावाच्या बाजारपेठेतून काढण्यात आली.आपल्या देशात दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिन साजरा करण्यात येतो.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांचे स्मरण दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी या दिवसाचे खास स्मरण केले जाते. २३ मार्च १९३२ रोजी लाहोर तुरुंगात,युवा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कुणाल कामरा प्रकरण : “आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” असे होता कामा नये, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे म्हणणाऱ्या कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड तोडफोड केली.या घटनेतील शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.कुणाल कामरा याने आपल्या गाण्यात थेट शिंदे यांना लक्ष्य केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना अनावर झाल्या व ही घटना घडली.कामरा याने आपल्या गाण्यात जिव्हारी लागेल, अशाप्रकारची टीका करणे,न्यायाला धरून नाही.पण,शिवसैनिकांनीही हिंसक कृती करणे,हे देखील समर्थनीय नाही,हेही तितकेच खरे आहे. पण हल्लीच्या काळात ” चुकीला माफी नाही,” हा नवीन फंडा अस्तित्वात आला आहे.” नो पोलीस,नो न्यायप्रक्रिया,” सिर्फ हम करेसो…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आधी पकडा आणि मग कोकला ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करून मुस्लिम देशात पळून जाणे,याला आपण नवा हिंदुत्ववाद म्हणायचे का ? राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ दररोज ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” अशा सिंहगर्जना करताना पाहायला मिळतात.त्यांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला.देवभाऊनी एक लक्षात घ्यायला हवे की ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” हे म्हणायला सोपे आहे.पण त्यांना सोडायला, सर्वप्रथम पकडा तरी… संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी हा देवाभाऊच्या पोलिसांना गेल्या चार महिन्यापासून सापडत नाही आणि भाऊ ” सोडणार नाही,” ची भाषा करत फिरत आहेत.नागपूर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी…
दीपक मोहिते, बाबर ते औरंगजेबाची कबर, हा प्रवास पुन्हा सुरु होणे, आपल्याला परवडणारे नाही… महाराष्ट्रात औरंगाजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसापासून प्रचंड गदारोळ उठला आहे.हा प्रश्न नेमका आताच उकरून काढण्यात का आला.या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून नागपूर सारख्या सुशिक्षित शहरामध्ये राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला काळे फासणाऱ्या समाजविघातक शक्ती कोण आहेत.यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.त्यासाठी दोन्ही बाजू समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या त्या कबरीची पुजा होते,तिच्यावर चादर चढवली जाते आणि तिच्यावर गुलाबाची फुले वाहिली जातात,ही खरी समस्या आहे.औरंगजेब फक्त हिंदवी स्वराज्याचा वैरी नव्हता,तर तो हिंदुचाही वैरी होता.इतिहास चाळून पाहिला तर…
