- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास आघाडीच्या नेत्यांना अवदसा आठवली, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे अभूतपूर्व यश मिळाले,ते यश त्यांच्या नेत्यांना पचवता येत नसल्याचे आघाडीत चालु झालेल्या कुरबुरीवरून स्पष्ट झाले आहे.आघाडीत सध्या मुख्यमंत्रीपद कोणाला ? यावरून नळावरचे भांडण सुरू झाले आहे.शरद पवार हे एकमेव नेते वगळता इतर घटक पक्षांच्या नेत्यांना आता एकमेकांची ऍलर्जी होऊ लागली आहे.जो तो आम्हीच मोठे,अशा आविर्भावात वावरू लागला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण/ बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही नाव जाहीर करावे,त्याला माझा पाठींबा राहील,असे जाहीर करून वादाला तोंड फोडले होते.त्यांच्या या…
दीपक मोहिते, सुर्यातीर,निवडणूक वार्तापत्र, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ- या मतदारसंघावर बविआचेच वर्चस्व राहणार… १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ असून येथे विविध जाती धर्माचे लोक राहतात.सन २००० नंतर या मतदारसंघात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व हे शहर पालघर जिल्ह्यात लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक १ चे शहर बनले.लोकसंख्या वाढीच्या तुलनेत पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.मात्र गेल्या चार ते पाच वर्षात परिस्थितीमध्ये बदल होत गेला.२००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत नव्याने या विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली.२००९,२०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विद्यमान आ.क्षितिज ठाकूर यांनी बाजी मारली.त्यांच्या मतांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली.या सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांनी त्यांच्या विरोधात हवा निर्माण केली होती.मात्र…
दीपक मोहिते, कशासाठी केला आम्ही ” स्वराज्याचा अट्टाहास ? ” तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ओडीशा राज्यात घडलेल्या एका घटनेने देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.या एका घटनेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या भारतीय संविधानाची राज्यकर्ते व नोकरशाहीने कशी मोडतोड केली आहे,हे आपल्याला पाहायला मिळाले.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करताना समता,सामाजिक बंधुभाव व समान न्याय यांस सर्वोच्च प्राधान्य दिले होते.त्यांच्या त्या दुरदृष्टीला छेद देणारी ती घटना होती.त्या दिवशी ” दाना माझी,” या व्यक्तीला आर्थिक चणचणीमुळे आपल्या पत्नीचा मृतदेह स्वतःच्या खांद्यावर वाहून न्यावा लागला.१२ कि.मी.अंतरावर असलेल्या स्मशानात तो व त्याची दहा वर्षाची मुलगी पायी चालत गेले.त्याच्या पत्नीचे प्रेत…
दीपक मोहिते, दिल्ली पोलिसांनी अल कायदा संघटनेच्या ११ जणांना केले जेरबंद, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे.पोलिसांनी अल कायदाच्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून ११ संशयितांना अटक केली आहे.तर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अल कायदाच्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून ११ संशयितांना अटक केली आहे,तर सुमारे अर्धा डझन लोकांची चौकशी सुरू आहे.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजस्थान,झारखंड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. अल कायदा मोड्यूलमधून अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी ६ जणांना राजस्थानमधील भिवडीतून, ४ जणांना रांचीतून,एकाला हजारीबागमधून आणि ४ जणांना यूपीतील अलीगढमधून ताब्यात घेण्यात आले आहे.यापैकी ११ जणांना…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये साईनाथ पारधीच्या पालकांचा सत्कार, वाडा-मनोरपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या कोहोज,या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी गोऱ्हे या आदिवासी गावातील पै.साईनाथ मोहन पारधी याने ( जॉर्डन ) येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल आज स्थायी समिती सभागृहात साईनाथ याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर,बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे,महीला व बाल कल्याण समिती सभापती रोहिणी शेलार,स्थायी समिती सदस्य,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते. साईनाथ हा कामानिमित्त पुणे येथे गेल्यामुळे त्याच्या…
दीपक मोहिते, महाराष्ट्राचे दुर्देव, मालवण येथे शिवपुतळा कोसळला,शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप, ४ डिसें.२०२३ रोजी मालवण राजकोट समुद्रकिनारी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते.तो भव्य पुतळा आज दुपारी अचानक कोसळला.या घटनेचा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेने संताप व्यक्त केला आहे. सुमारे ५ कोटी रु.खर्च करून उभारण्यात आलेला हा पुतळा ४३ फूट उंच होता.जमिनीपासून १५ फूट व त्यावर २८ फूट अशा पद्धतीने या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले होते.ज्या महाराजांनी राज्यात अनेक किल्ले उभारले,त्या बांधकामाची उदाहरणे देऊन गौरव केला जातो,त्या महाराजांचा पुतळा पत्याच्या बंगल्यासारखा कोसळतो,यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.अवघ्या नऊ महिन्यात पुतळा कोसळल्याची…
दीपक मोहिते, गणेशोत्सव ; मूर्तिकार अखेरचा हात फिरवण्यात गर्क, गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवरआला असून गणपतीच्या कारखान्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मूर्ती तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून मूर्तीना रंग देण्याच्या कामात कारागीर सध्या व्यस्त आहेत.त्यासाठी त्यांनी आपले कारखाने तीन पाळ्यात सुरू ठेवले आहेत. सुबक मूर्ती,हिरे,मोती व आकर्षक रंग वापरून मूर्तीला सजवण्यात येत आहे. कारागिरांची उणीव व ग्रामीण भागात सतत होणारा विजेचा लपंडाव इ.अडचणी कारखानदारांना सतावत असल्यामुळे अनेक कारखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आगावू नोंदणी कारखानदारांकडे केली आहे.७ सप्टें.पासून गणेशोत्सव सुरू होत आहे.गेल्या चार महिन्यांपासून कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पराभवाच्या भितीमुळे मुंबई -गोवा मार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, कोकणातील लाडक्या बहिणी व त्यांच्या कुटुंबियाचा गणेशोत्सवासाठी होणारा प्रवास सुखद व्हावा,यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लवाजम्यासह आज पनवेल ते माणगाव दरम्यान असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पळस्पे नाक्यावर दाखल झाले होते.त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचे दिवस करत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले आणि रस्तेदेखील चकाचक केले.पण हे रस्ते किती दिवस टिकतील,हे मात्र सांगता येणार नाही. आज करण्यात आलेली ही कार्यवाही केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. हा दौरा करताना एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार व कॅमेरामन यांना पाचारण केले होते.१५००/- रु.वाटुनही लाडक्या बहिणी…
दीपक मोहिते, युक्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला,इमारतीला ड्रोन धडकलं, रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.आज सकाळी युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या तीन शहरावर ड्रोनच्या साहाय्याने जोरदार हल्ले चढवले.हा हल्ला अमेरिकेच्या ९/११ सारखा होता.हा हल्ला दहशतवाद्याने नाही तर युक्रेनच्या लष्कराने केला आहे.९/११ च्या हल्ल्यात दोन विमानांनी अमेरिकेतीच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या इमारतीला धडक दिली होती.त्यामध्ये सुमारे तीन हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते.आज रशियावर झालेल्या या हल्ल्यात एक ड्रोन उंच इमारतीला धडकलं आहे.रशियाच्या सेराटोव्हमध्ये सर्वात उंच इमारतीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.या घटनेने रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय एंगेल्स शहरातही इमारतीनाही युक्रेनच्या ड्रोनने धडक दिली आहे.रशियाच्या आरोग्य…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” ” स्वच्छ भारत अभियान,” आता इतिहासजमा २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्या आल्या दोन उपक्रम जाहीर केले.एक ” स्वच्छ भारत अभियान ” व दुसरं ” काँग्रेस मुक्त भारत,” मात्र हे दोन्ही उपक्रम त्यांना यशस्वीपणे राबवता आले नाहीत. “स्वच्छ भारत अभियाना ” ची नौटंकी आता जवळपास इतिहास जमा झाली आहे.सुरुवातीच्या काळात अनेक मंत्री,खासदार व आमदार सकाळच्या रामप्रहरी गल्लीबोळात झाडू घेऊन फिरताना पाहायला मिळत असत.पण आता तसे चित्र पाहायला मिळत नाही.वास्तविक हे अभियान देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असे होते.पण या अभियानात केवळ नौटंकीच होत होती.त्यामुळे भारत स्वच्छ झालाच नाही,मात्र तुमच्या आमच्या पैश्याची मात्र प्रचंड उधळपट्टी झाली.…
