- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दिपक मोहिते, भयानक वास्तव, विकासाच्या नावाखाली सुरू असलेला नंगानाच थांबवा, गेल्या महिन्याभरात राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन कृषिक्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे.या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन किंवा पीक विमा योजनेचा फायदा देऊनही तो पुन्हा उभा राहील,अशी स्थिती नाही.वर्षानुवर्षे हे असे चालत आले आहे.कर्जमाफी,नुकसान भरपाई व पीक विमा इ.उपाययोजना या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत.निसर्गाचे ऋतुचक्र का बिघडले आहे,याच्या खोलात जाऊन कारणे शोधण्याची गरज आहे.सरकार त्यादृष्टीने पावले उचलत नाही.त्यामुळे राज्यातील कृषिक्षेत्र लयाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जस जसे आपण एकविसाव्या शतकाकडे जाऊ लागलो तसे काळाच्या ओघात आपण खुप काही गमावत चाललो आहोत.वृक्षांची…
दीपक मोहिते, गडकरी यांचे आगमन ; देवेंद्र फडणवीस यांची पीछेहाट सुरू, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी याना पाचारण केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यास सुरुवात झाली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय नेत्यानी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव हा केंद्रीय नेतृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आखलेले डावपेच अंगाशी आल्यानंतर दिल्लीत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महायुतीच्या नेत्यानी केलेल्या बेलगाम वक्तव्यामुळे तर आगीत तेल ओतले गेले.विरोधकांनी सरकारवर एकामागोमाग जोरदार हल्ले चढवले.त्यामुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…
दीपक मोहिते, पंचनामा, जयदीप आपटे ; अटक कि शरणागती ? पोलिसांची भूमिका संशयास्पद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी फरार असलेला आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी त्याला अटक केली का तो स्वतः हुन शरण आला याविषयी आता गूढ निर्माण झाले आहे.कारण दहा दिवसापासून फरार झालेला आपटे हा अचानक पोलिसांच्या हाती लागतो,यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.कारण आपटे याच्या वकिलाने या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.त्यांनी,” जयदीप हा स्वतःहून शरण आला असून पोलिसांनी त्याला पकडले नसल्याचे सांगितले.या जयदीपला पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके तैनात केली होती.पण त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.या काळात जयदीप हा इंदोर येथे होता व तो आपल्या वकिलाच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गडचिरोली घटना ; राज्य सरकारला लाज वाटायला हवी, राज्यात सत्तास्पर्धेला सध्या प्रचंड वेग आला असून आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे.नोव्हे.महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.महाविकास आघाडी व महायुती या दोघांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.सत्ताधारी महायुतीचे नेते आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.त्यासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी फस्त केला आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांवर बदलापूर बलात्कार घटनेने पाणी फिरवले आहे.काल गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्यावर चांगलेच तोंडसुख घेतले,ते एका कार्यक्रमात काय म्हणाले ते पहा,” अर्थखाते हे नालायक खाते असून…
दीपक मोहिते, देवेंद्र फडणवीस यांनी शिवचरित्र वाचायला हवं, एका वृत्तवाहिनीने आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” महाराष्ट्राचा महासंकल्प,” हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.” राज्याचा विकास व राजकीय चढाओढ,” या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,छगन भुजबळ यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आले होते.त्यांना लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला व मी मध्यस्थी केल्याचे मान्य केले व या योजनेचे श्रेय एकट्याने कोणी घेऊ नये,अशा सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर मालवण येथील…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” दादाचा वादा,” नाही तर ” दादाचा वांदा,” होणार, महायुतीच्या घटक पक्षात आता बॅनरवॉर सुरू झाले आहे.श्रेयवादाच्या सुतळी बॉम्बची वात अजित पवार गटाने पेटवली आहे.त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भर बैठकीत अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.प्रकरण हातघाईवर येत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,त्यामुळे दुर्घटना टळली.फडणवीस यांनी यापुढे एकट्याने कोणीही श्रेय घेणार नाही,असे जाहीर केले.फडणवीस यांच्या मध्यस्थी व दिलेल्या आदेशानंतर अजित पवार गटाच्या मंत्र्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळावे,यासाठी अजित पवार हे सध्या नको ते उपदव्याप करत सुटले आहेत.गुलाबी जाकीट,गुलाबी रंगाच्या गाड्या,गुलाबी फेटे व टोप्या,यांची सध्या उधळण…
दीपक मोहिते, राजकीय विश्लेषण, उद्धव ठाकरे यांनी आततायीपणा करता कामा नये, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सध्या अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे.कोणाला किती जागा मिळणार,यावरून असलेला वाद पराकोटीला पोहोचला आहे.जागावाटपाचा तिढा समाधानकारकरित्या सुटावा,यासाठी घटक पक्षाचे नेते प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना शिवसेनेने ( उबाठा ) घेतलेली ताठर भूमिका महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे.काल काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी हे सांगलीच्या दौऱ्यावर आले होते.शिक्षणसम्राट कै. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत तसेच त्यांचे फायरब्रॅंड प्रवक्ते हे देखील फिरकले नाहीत.हे दोघे का फिरकले नाहीत,यामागे दोन कारणे होती.गेल्या लोकसभा निवडणुकीत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य अधोगतीच्या मार्गावर जात आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.राज्याचे गृह खाते सपशेल अपयशी ठरले असून पुण्यासारखे शहर आता गुंड टोळ्यांचे शहर झाले असून दररोज होणाऱ्या हत्या,कोयता गँगचा हैदोस व अमली पदार्थाचा व्यापार,अशा कारणामुळे पुणे शहर हे ” गुंडाचे शहर,” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याची जबाबदारी पेलता आली नाही,त्यामुळे विरोधकाकडून त्यांच्यावर सतत टीकेचा भडिमार होत आहे.बदलापूर बलात्कार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे,प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.सर्वसामान्य आरोपींना २४ तासात हुडकून काढणारे पोलीस,शाळेचे संस्थाचालक,मुख्याध्यापिका व शिल्पकार जयदीप आपटे,याना शोधू शकत नाहीत.गेल्या पंधरा…
दीपक मोहिते, त्यामुळे भाजपचे ” मिशन लोटस,” थंडावले… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले रेशीमबाग सध्या चिंताग्रस्त झाले आहे.महाराष्ट्रात महायुतीची पुन्हा सत्ता येईल,असे संघाच्या धुरीणांना वाटत नाही.त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो पराभव झाला तो केवळ अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे झाला,असे संघाचे ठाम मत झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ६५ ते ७० जागा मिळतील,असा संघाचा अंदाज आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बदलापूर बलात्कार व मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे.या दोन घटनांमुळे महायुती सरकारविरोधात निर्माण झालेले वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरेल,असे संघाला वाटतं.त्यामुळे भाजप,शिंदे व अजित पवार या तिन्ही गटांनी एकत्र निवडणूक…
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांची झोप उडवली, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांनी व त्यांचे विश्वासू सहकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप व अजित पवार गटातील आमदारांना तसेच जिल्ह्यातील नेत्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसापूर्वी शाहू घराण्याचे वारस व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांची झोप उडवून दिली आहे.घाटगे यांच्या प्रवेशावेळी झालेली सभा ही न भूतो,न भविष्यती,अशी भव्य दिव्य स्वरूपाची होती.त्या सभेला झालेली कागलवासीयांची गर्दी पाहून हसन मुश्रीफ यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.समरजीत घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील…
