- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” जम्मू-काश्मीर निवडणूक ; ” जमात,” मुळे हिंसाचार होण्याची शक्यता, लवकरच होत असलेल्या जम्मू-काश्मीर व हरयाणा या दोन राज्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.जम्मू-काश्मीर या राज्यात ३७० कलम हटवल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,भाजप,पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ( मेहबुबा मुफ्ती ) नॅशनल कॉन्फरन्स,( फारुख अब्दुल्ला ) पीपल्स डेमोक्रॅटिक आझाद पार्टी ( गुलाम नबी आझाद ) हे पाच राजकीय पक्ष एकमेकांना आव्हान देतील.पण आणखी एक कट्टर जातीयवादी पक्ष म्हणून ओळख असलेला जमात-ए-इस्लामी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे.केंद्र सरकारने दहशतवादी कारवायामधील सहभागामुळे या पक्षावर बंदी घातली आहे.त्यामुळे या पक्षाला निवडणूक लढवण्यास…
दीपक मोहिते, वास्तव, ” खेड्यातला भारत,” कधी पाहायला मिळणार ? देशवासीयांनी नुकताच ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.हा दिवस आपल्यासाठी एक उत्सवच असतो.आपल्या पूर्वजांनी इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व झोकून दिले,लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यांच्या या बलिदानानंतर तुमच्या आमच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवली.गेल्या ७८ वर्षात देशाने विविध क्षेत्रात प्रचंड भरारी घेतली.आज महासत्तांसोबत आपण स्पर्धेत उतरले आहोत.सहा महिन्यांपूर्वी आपण चंद्रावर स्वारी करू शकलो,ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.पण आजही आपल्या देशात गरीबी,बेरोजगारी व ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणे,या प्रश्नी मागासलेलेच आहोत.स्वातंत्र्योत्तर काळात विकासाचा प्रवाह केवळ शहरी भागातूनच वाहत राहीला.त्यामुळे ग्रामीण भाग कात टाकू शकला नाही. सात वर्षांपूर्वी मोखाडा…
दीपक मोहिते, सूर्यातीर, पेसा नोकरभरतीला स्थगिती ; सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, ग्रामपंचायतीच्या तरतुदी (अनुसूचित क्षेत्राचा विस्तार ) कायदा १९९६ ( पेसा ) हा २४ डिसें.१९९६ रोजी अंमलात आला.हा कायदा महाराष्ट्र,गुजरात,आंध्र प्रदेश,मध्यप्रदेश,झारखंड,ओरिसा,छत्तीसगड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व तेलंगणा अशा १० राज्यांना लागू करण्यात आला आहे.हा कायदा करण्यामागे अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास,त्यांची संस्कृती,प्रथा व परंपरा याचे संवर्धन करणे,असा उद्देश आहे.तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था अधिक बळकट करणे,हे या पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आहे.त्यासाठी अनु.क्षेत्रातील ग्रामसभेला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५४ ने व्यापक व विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.आपल्या राज्यात हा कायदा अहमदनगर,पुणे,ठाणे, पालघर,जळगाव, अमरावती,धुळे,यवतमाळ, नंदूरबार,नाशिक,नांदेड, चंद्रपूर…
दीपक मोहिते, शरद पवार यांनी जाळे फेकण्यास सुरुवात केली, या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व वरीष्ठ नेते शरद पवार हे दोघे अजित पवार यांना धक्के देण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटाचे खासदार व आमदारांच्या भेटी गाठी घेण्याचे सत्र या दोघांनी सुरू केले आहे.त्यांच्या या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश येत असल्याचे दिसून येत असून अनेक दिग्गज नेते भाजप व अजित पवार गटाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या तीन प्रमुख पक्षात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.आगामी निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही,हे लक्षात आल्यानंतर अनेक जण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा बरळले, आपण एका संविधानिक पदावर बसलो आहोत,याचा कायम विसर पडणाऱ्या अजित पवार यांनी एका जाहीर सभेत ” बलात्कार करणाऱ्या विकृत माणसांचे गुप्तांग कापून टाकायला पाहिजे,” अशी बेताल बडबड केली.त्यांच्या या बडबडीकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही.पण एका गोष्टीचे महाराष्ट्राला आश्चर्य वाटले,ते म्हणजे बदलापूर येथे जी घटना घडली ती १३ ऑगस्ट रोजी,आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांना तब्बल १० दिवसांनी उपरती व्हावी,व त्यांनी नको त्या गोष्टी कापून काढायची भाषा करावी. या घटनेचा उशीरा का होईना त्यांना इतका पुळका यावा,हेही नसे थोडके,असेच म्हणावे लागेल.तुम्हाला जे करावेसे वाटते,ते तुम्हीच करू शकता,कारण इतरांना ते शक्य नाही.बदलापूर येथे आंदोलन करणाऱ्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कंगनाने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, येत्या ६ सप्टें.रोजी माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर आधारीत ” इमर्जन्सी,” हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.या सिनेमात कंगना राणावत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही तीने पार पाडली आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना राणावत हीने आपल्या अकलेचे बरेच तारे तोडले आहेत.इंदिरा गांधी यांना तीने किती वाचलं आहे,देव जाणे,पण इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांनी इतिहासात डोकावून पाहायला हवे होते.कारण इंदिरा गांधी यांच्याविषयी बोलताना तीने जी बेताल वक्तव्ये केली आहेत,तशी ती केली नसती.” इंदिरा गांधी यांच्यामध्ये परिपक्वतेचा…
दीपक मोहिते, सूर्यातीर निवडणूक वार्तापत्र, १२९ बोईसर विधानसभा,अनु.ज. बोईसरमध्ये बविआ-शिवसेना ( शिंदे गट ) अशी सरळ लढत होईल, मतदारसंघाच्या फेररचनेनंतर बोईसर विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली.२००९,२०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीने बाजी मारली.या विधानसभा मतदारसंघात वसई,विरार व नालासोपारा भागातील अनेक गांवाचा समावेश आहे,प्रत्येक निवडणुकीत त्याचा फायदा बविआला होत असतो.इतर ठिकाणी बविआची जी पीछेहाट होते,त्याची कसर वसईतील ही गावे भरून काढत असतात.मात्र हे मतदार लोकसभा निवडणुकीत आपली मते राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकत असतात.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बविआने सलग तीनवेळा विजय मिळवला. गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांचे आ.विलास तरे यांनी बविआला सोडचिठ्ठी दिली व त्यांनी सेनेकडून उमेदवारी मिळवली.मात्र…
शिरीष भोईर,चारोटी/कासा चारोटी येथे आदिवासी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन ; वाहतूक दोन तास ठप्प, आज सकाळी अकरा वाजता डीवायएफवाय व विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येवून चारोटी नाका येथे रास्ता रोको केले. पेसा कायद्यांतर्गत थांबवण्यात आलेली भरती,पेसा क्षेत्रातील वनजमिनीच्या कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी करणे,आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी व सवलती लाभार्थ्यांना देणे व आदिवासींच्या हक्काच्या जागांवर असलेल्या बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करणे,इ.मागण्यासाठी मार्क्स.कम्यु.राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व अन्य संघटनांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले.यावेळी रस्त्यावर हजारो आदिवासी उतरले,त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली.त्यामुळे मुंबई व सुरतच्या दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्ग पेसा पद भरती व्हावी,यासाठी नाशिक…
शाम पुरोहित,पालघर, मोखाडा ग्रामस्थांची पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयास भेट, मोखाडा तालुक्यातील चार ते पाच अतिदुर्गम गावातील गावातील ग्रामस्थानी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय पाहण्यासाठी भेट दिली. शिवछत्रपती पाडा समिती सप्रेवाडी आणि परिवर्तन पाडा समिती बेडूकपाडा यांच्यातर्फे ग्रामस्थांसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यालयातील कार्यालये कशा स्वरूपाची आहेत, तसेच या कार्यालयातील कारभार कसा चालतो,हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी या ग्रामस्थांनी ही भेट दिली.यावेळी प्रत्येक कार्यालयात त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बसून गावकऱ्यांनी अध्यक्ष निकम यांच्या सोबत संवाद साधलाआणि विविध प्रश्नांवर चर्चा केली. पहिल्यांदाच मुख्यालयाची इमारत आणि अधिकारी आणि पदाधिकारी यांची दालने पाहून ग्रामस्थांनी…
पालघर, पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी ; शेतकरी आनंदात, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेला मान्सून काल रात्रीपासून पुन्हा सक्रिय झाला आहे.काल रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.तसेच सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. सुमारे दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने काल रात्री पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्हावासीयांना सुखद धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले होते.पावसाअभावी शेतीची शिल्लक कामे अनेक दिवसांपासून रखडली होती.तर दुसरीकडे शेतमजुरांना बसून पगार द्यावा लागत होता.त्यामुळे यंदा भातशेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो कि काय ? अशा मनःस्थितीत शेतकरी सापडले होते.शेतमजुरांना बसून पगार दिला नसता तर ते…
