Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जनता दरबारला लोकांचा किती प्रतिसाद मिळेल,हे सांगणे कठीणच आहे…. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ” सरकार आपल्या दारी,” या उपक्रमाचा चांगलाच सुळसुळाट झाला होता.कोट्यवधी रु.ची उधळपट्टी करत,असे अनेक इन्व्हेंट पार पडले.पण सरकार दरबारी दाखल झालेल्या लाखो तक्रारींपैकी किती तक्रारीचा निपटारा होऊ शकला,हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिंदे यांच्या ” शासन आपल्या दारी,” च्या धर्तीवर ” जनता दरबार,” आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.या दोन्ही उपक्रमाला गोरगरीब जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो,पण कालंतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळते,पण बिचारे काही करू शकत नाहीत.मंत्र्यांची भेट सहजासहजी मिळणे कठीण असते,त्यामुळे ते अशा उपक्रमाकडे धाव…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडी ; छातीत धडकी भरवणारी तपास यंत्रणा, ( भाग क्र.१ ) गेल्या काही वर्षात सक्त वसुली संचालनालय ( ईडी ),केंद्रीय गुन्हे अन्वेषण ( सीबीआय ) व आयकर विभाग ( आयटी ) या तीन केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत आपल्याला पाहायला मिळाली.ईडीच्या भितीने तर अनेक राजकीय नेत्यांचे धाबेच दणाणले,अटक टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी अक्षरशः लोटांगण घालत सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले.अनेकांच्या छातीत धडकी भरवणारा हा पीएमएलए कायदा नेमका काय आहे ? इतकी वर्षे ईडी हा विभाग कार्यरत असताना गेल्या बारा वर्षात तो इतका सक्रिय होण्यामागची नेमकी काय कारणे आहेत,यावर आपण आज प्रकाशझोत टाकणार आहोत. चला,तर सर्वप्रथम ईडी हा विभाग कधी…

Read More

वसंत भोईर,वाडा पळसाच्या पानांची पत्रावळ्या झाल्या जेवणावळीतून हद्दपार, विवाह सोहळा,सप्ताह,पूजा व धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी हल्ली हद्दपार झाल्याचे चित्र आता ग्रामीण भागातही सर्रास पहावयास मिळत आहेत.तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना समाजात अधिक पसंती मिळू लागली आहे. विवाह सोहोळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे.त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे, असा अल्प रोजगार देणारा व्यवसाय हा मागणी कमी होत असल्यामुळे भूतकाळात जमा झाला आहे. पुरातन काळापासून मंगलकार्याच्या जेवणावळीत पळसाच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या पत्रावळींचा वापर केला जात होता.आयुर्वेदीक…

Read More

वसंत भोईर,वाडा, पालसई ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या ( उबाठा )विभूती पाटील यांची बिनविरोध निवड, तालुक्यातील पालसई ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या विभूती पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, lपालसई विभाग प्रमुख विशाल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी उपसरपंच अंकिता पाटील यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. काल उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात विभूती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Read More

शुभांगी शिंदे, नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली आणि आसामी कवींना प्रदान, अँकर ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा २०२२ आणि २०२३ चा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिद्ध कवी अमिताभ गुप्ता यांना २०२२ साठी आणि असामी भाषेतील प्रसिद्ध कवी नीलम कुमार यांना २०२३ साठी विद्यापीठाचे कुलगुरू आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध कवी व अनुवादक तसेच निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह मानपत्र एक लाख रु.चा धनादेश व शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराच्या…

Read More

दीपक मोहिते, ” साहित्यिकांची मांदियाळी,” दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कार्यक्रमाची रेलचेल, मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात नुकताच ऐतिहासिक निर्णय झाला.या निर्णयामुळे सुखावलेला मराठी माणूस आता दिल्ली येथे २१ ते २३ जाने.दरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागला आहे.या संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती,संत साहित्याच्या गाढा अभ्यासक,संशोधक डॉ. तारा भवाळकर या आहेत.त्यांची साहित्याची वाटचाल ही दैदीप्यमान अशी असून गेल्या सहा दशकाच्या आपल्या साहित्य वाटचालीत संतसाहित्य,लोकसंस्कृती,नाट्यसंशोधन, ललितलेखन, लोककला,एकांकिका व लोकसाहित्य इ.विषयावर विपुल लेखन केले आहे.त्यांनी या काळात साहित्याचे अनेक पुरस्कार मिळवले,त्यामध्ये उत्कृष्ट ग्रंथनिर्मीती पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.मा.गोखले पुरस्कार,गौरव पुरस्कार,श्री.ना.बनहट्टी पुरस्कार,मुंबई विद्यापीठाचा डॉ.अ.ना.प्रियोळकर, सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा…

Read More

दीपक मोहिते, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; भाजप लागला कामाला.. इतर राजकीय पक्ष अद्याप निवांत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत चालल्या असून येत्या २५ फेब्रु.रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रभाग आरक्षणसंदर्भात सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सहमती दाखवल्यामुळे निवडणूक घेण्याच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे.वरील तारखेला निकाल जरी लागला तरी या निवडणुका ऑक्टो.किंवा नोव्हे.महिन्यात होतील,असा अंदाज आहे.न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर नागरिकाकडून हरकती/सूचना मागवणे व त्यावर निर्णय घेणे,इ.प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील.त्यानंतर मान्सून सुरू होईल,त्यामुळे या निवडणुका ऑक्टो.किंवा नोव्हें.दरम्यान होतील. महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची संख्या किती असावी,ही संख्या राज्य निवडणूक आयोगाने की राज्यसरकारने…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आता आत्मचिंतन करायला हवं, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या दोन पक्षातून आउटगोइंगला आता चांगलाच वेग आला आहे.भाजपच्या प्रभावासमोर गेल्या बारा वर्षात अनेक पक्षांची प्रचंड पडझड झाली.ज्या खासदार व आमदारांची हयात सेना व काँग्रेसमध्ये गेली,ते देखील भाजपच्या वळचणीला गेले,याचा पक्षाच्या धुरीणांनी विचार करायला हवा.मात्र आपली अशी अवस्था का झाली ? यामागची कारणे काय आहेत ? याविषयी या दोन्ही पक्षाचे नेते ते करायला तयार नाहीत.सत्तेच्या राजकारणात केवळ पहिल्या फळीला हाताशी धरून चालत नाही,तर बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी भाकरी फिरवावी लागते.ते न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची…

Read More

दीपक मोहिते, बुडाला आग, पवारांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार ; महाविकास आघाडीमध्ये ” मोडतोड तांबापितळ,” प्रक्रियेला वेग, काल शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केल्यामुळे शिवसेनेच्या ( उबाठा ) बुडाला चांगलीच आग लागली आहे.त्यांचे प्रवक्ते खा.संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ” महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार,” देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शरद पवार यांनी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.या…

Read More

संगीता लहाने,पालघर पालघर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, आज जिल्हा परिषद,पालघर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत रोहिदास ( १२६७–१३३५ [ १ ] ) हे १५ व्या व १६ व्या शतकातील भक्ती चळवळीचे भारतीय गूढ कवी-संत होते.उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान,गुजरात, महाराष्ट्र,मध्य प्रदेश,पंजाब आणि हरियाणा या आधुनिक प्रदेशांमध्ये गुरू (अध्यात्मिक शिक्षक ) म्हणून ते पूजनीय, कवी,समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.संत रोहिदास रोहिदास इ.स.१५ ते १६ व्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी…

Read More