Author: दीपक मोहिते

शुभम सावंत,विरार, कामगार वर्गालाही सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे, -प्रा.उषाताई वाघ, समता शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जालिंदर अडसुळे यांच्या घरहक्क चळवळीतील अनुभवावर आधारित विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले लेख तसेच विविध परिषदांमध्ये मांडलेल्या दस्तऐवजाचे पुस्तक नुकतेच मुंबई प्रेसक्लब मध्ये प्रकाशित झाले. विलास वाघ मेमोरिअल फौंडेशनने पुरस्कृत केलेले डॉ.अडसुळे लिखित लोक साहित्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ” लाईफ,टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्स-थिअरी आणि एक्स्पिरियन्स,”या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. विलास वाघ मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाघ यांनी झोपड्यामध्ये राहणा-या कामगारवर्गानेच मुंबईसह सर्वच शहरवासियांचे जीवन सुसह्य केले.शहरातच हक्काचा निवारा मिळून त्यांचे जीवन आनंदमयी आणि सुखासमाधानाचे व्हायला हवे. असे…

Read More

दीपक मोहिते, राज्य विस्कळीत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न, ” सत्तेसाठी काहीही,” हा वाक्प्रचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजप, समाज आणि धर्माधर्मात तेढ निर्माण व्हावी,यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. घाटकोपर येथे मराठी कुटुंबियाना देण्यात आलेला त्रास,वक्फ कायद्यातील सुधारणा,राजभाषेवर राष्ट्र भाषेची कुरघोडी,या सर्व घडामोडीवरून भाजप महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या हालचाली करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. भाजप सत्तेसाठी जी खेळी करत आहे,ती विस्तवाशी खेळ करण्यासारखी आहे.घाटकोपर येथील गुजराती समाजाचे लोक ” आता बीजेपीची सत्ता आहे,” अशी जी धमकी मराठी कुटुंबाना धमकी देतात,हे कसले लक्षण आहे ? भाजप मधील आशिष शेलार,चन्द्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे या अशा ज्वलंत प्रश्नी मूग…

Read More

वसंत भोईर,वाडा वडवली येथील कारखान्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी, तालुक्यातील वडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या टायर सायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे या परिसरात वायु प्रदूषण, जलप्रदूषणामुळे पंचक्रोशीतील जनता त्रस्त झाली आहे.या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे वडवली,नारे,मुसारणे,चिंचघर या गावातील नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या कारखान्यांमुळे नागरिकांचे आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनाधिकृतरित्या सुरू असलेल्या या टायर कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. वडवली येथील या कंपन्यांमध्ये जुने टायर जाळून त्यापासून ऑइल तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नाल्यात सोडत असल्यामुळे नाल्यातील मासे मरून पडले…

Read More

संजय नेवे,विक्रमगड माकपतर्फे विविध मागण्यासाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला, विक्रमगड तालुक्यातील आदिवासींना आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात,यासाठी तालुक्याची निर्मिती झाली.पण आजही मूलभूत सुविधांसाठी स्थानिक भूमिपुत्रांना संघर्ष करावा लागत आहे.तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठ्याची कामे अत्यंत संथगतीने सुरु असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी व लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावे.तसेच घरकुले मंजूर झाली असून या घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांना लवकर मिळावी. तालुक्यातील महावितरणाचा सावळा गोंधळ कारभार सुरु असून तो दूर करावा,लोकांना तात्काळ मीटर द्यावे,फॉरेस्ट प्लॉट पती- पत्नीच्या नावे करावे,आरोग्य यंत्रणेत सुधारणा व्हावी, देहर्जा धरणातील विस्थापितांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, तालुक्यातील खराब रस्त्यांची लवकर लवकर दुरुस्ती करावी.…

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारा पाणीपुरवठा, विक्रमगड तालुक्याची पाणीटंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाने एक टँकर मंजूर केला आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. विक्रमगड तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण रूप धारण करत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.पाण्याची पातळी सतत कमी होत आहे.तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईला सुरुवात झाली असून खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा व साखरे ग्रामपंचायत हद्दीतील चिचपाडा,पागीपाडा,पाटील पाडा,येथील विहिरींनी तळ गाठला आहे.या भीषण पाणीlटंचाईमुळे भागातील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर व्हावी,यासाठी टँकरची मागणी केली होती,ती प्रशासनाने तात्काळ मान्य केली व एक टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे.जेणेकरून सध्या या भागातील नागरिकांना पाणी मिळत आहे.तालुक्याच्या तापमानात प्रचंड…

Read More

संगीता तावडे,मंत्रालय, चिंचोटी-भिंवडी राज्यमार्गाचा तिढा सुटण्याची शक्यता, चिंचोटी – कामण -भिवंडी राज्यमार्गाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांसोबत आ.स्नेहा दुबे पंडित यांची मंत्रालयात बैठक नुकतीच पार पडली. वसई तालुक्याचा भिवंडी तालूक्याशी जोडणाऱ्या चिंचोटी – कामण – भिवंडी या राज्य मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असून वसई-विरार परिसरातील नोकरदार – कामगार – उद्योजक यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. दरवर्षी हा रस्ता दुरुस्त करण्यात येतो.पण तो पुन्हा पुन्हा फुटतो व रस्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण होत असते. या प्रकरणी भाजपच्या आ.स्नेहाताई दुबे-पंडित यांनी विधानसभेच्या नागपूर येथील…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” सरकार मुर्दाड बनले आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्याला कोणाचीच गॅरंटी नाही… राज्याच्या कृषिक्षेत्रावर गेल्या दोन ते तीन दशकापासून अनेक संकटे आदळत आहेत. अवकाळी पाऊस,गारपीटी व नापिकी,अशा अस्मानी संकटामुळे आतापर्यंत दोन लाख शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.आजही ते दुष्टचक्र सुरूच आहे.दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यात माळसोन्ना या गावात सचिन जाधव या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली,हे दुःख सहन न झाल्यामुळे त्याची पत्नी ज्योती हीने देखील विषारी औषध घेवून आत्महत्या केली.राज्यात २०२४ मध्ये २ हजार ७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात बाजरी,मका,मिरची,सोयाबीनसह आंबा,द्राक्ष,डाळिंब व मोसंबी,या फळ उत्पन्नाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.मात्र सत्ताधारी मंडळी या लाखो बाधित शेतकऱ्यांना ” मोदींची…

Read More

दीपक मोहिते, कुणाल कामरा याला अटक करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलंय.त्याचा जवाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.कामराच्या जिवाला धोका असून तो मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असेल,असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे.त्यामुळे कामराला अटक करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न न्यायालयाच्या या निर्णयामुळे भंग पावले आहे. कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडीयन असून त्याने गेल्या महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून जोरदार टीका केली होती.त्याच्या गाण्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात प्रचंड गदारोळ उठला होता.शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओवर हल्ला चढवत तोडफोड केली…

Read More

दीपक मोहिते, काहीही हं… शिंदे गटाचा १०० % कपाळमोक्ष होणार… राजकारणात कधी काय होईल,याचा नेम नाही.कालचे शत्रू हे आज गळ्यात गळा घालताना पाहायला मिळतात.राजकारणात सोयीनुसार वागावे लागते,हेच खरं.या अशाच सोयीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर नुकतेच दाखल झाले होते.शिंदे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.त्याचवेळी सदा सरवणकर हे गालातल्या गालात हसत होते. मुंबई व ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.राज ठाकरे यांच्या आडमुठे धोरणामुळे शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना घरी बसावे लागले.या घटनेची उपमुख्यमंत्री शिंदे यांना अवघ्या चार महिन्यात विसर पडावा,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.त्यांचे माजी आ.राजू पाटील यांनी…

Read More

सचिन परब,वसई जूचंद्र येथील चंडिका देवीच्या यात्रेत रांगोळी प्रदर्शनाला यात्रेकरूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जूचंद्र गावाची ग्रामदेवी असलेल्या चंडिकादेवीच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली.या यात्रेत जूचंद्र गावातील तरुणांनी काढलेल्या रांगोळ्यांचे दरवर्षी प्रदर्शन भरवण्यात येते. यंदाही रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.त्याला चित्ररसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वसई तालुक्यातील जूचंद्र आणि पंचक्रोशीतील कलाकार रांगोळी काढण्यात नावारूपाला आले आहेत. देवीच्या यात्रेत वेगवेगळ्या विषयावर काढलेल्या रांगोळ्या रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.यामध्ये महाकुंभ मेळा,छत्रपती शिवाजी महाराज,दुष्काळाची दाहकता,ज्योतिबा,मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा,छावा मधील संभाजी अशा अनेक रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.या रांगोळ्या शैलेश केदारनाथ पाटील,पंकज पाटील, प्रसाद पाटील, प्रविण भोईर, केतन पाटील,संजय पाटील,भारत प्रधान,मिनार पाटील,संजित पाटील,करण वटार ,गणेश सालियन,प्रणित भोईर,स्नेहा…

Read More