- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” हिंदीची सक्ती ; भाजप व रा.स्व.संघाचे कुटील कारस्थान, आज शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचा वरळी येथे ऐतिहासिक विजयी मेळावा होत आहे.या मेळाव्याबाबत राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.हिंदी सक्तीच्या प्रश्नावर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली.त्या पार्श्वभूमीवर हा विजयी मेळावा होत आहे.सरकारकडून झालेली हिंदीची सक्ती व त्यावर मराठी भाषिक जनतेमध्ये उसळलेली संतापाची लाट,त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस या विजयी मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहे.हा विजयी मेळावा ऐतिहासिक होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काल पुणे येथे झालेल्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणाच्या शेवटी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” भारतीय संविधान मोडीत काढणे,कदापि शक्य होणार नाही… गेल्या काही वर्षांपासून भारतीय संविधानाला नख लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.” संविधान,” या शब्दाची आपल्या महायुती सरकारला ऍलर्जी असल्याचे पदोपदी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या एका महिला आमदाराने सभागृहात वारीमध्ये अर्बन नक्षलवादी संघटनाचा शिरकाव झाल्याचा सनसनाटी आरोप नुकताच केला. याविषयी उदाहरण देताना त्यांनी अर्बन नक्षलवाद्याच्या संघटनेचे नांव ” संविधान वारी,” असल्याचे सांगितले.या वारीच्या वारकरकऱ्यांनी वारीमध्ये संविधानाची पूजा केली,असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.गेल्या सात दशकात ” संविधान, ” या शब्दाची ऍलर्जी कोणालाच नव्हती. तसेच ” अर्बन नक्षलवाद,” शब्द देखील कुठून आला,हे तुम्हा-आम्हाला कळले देखील नाही. केंद्र व राज्यसरकार एकीकडे…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्या, महायुती आरामात खिश्यात घालणार, जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक शाखेने नूकताच जाहीर केला आहे.त्यामुळे निवडणुकीचे पडघम लवकरात लवकर वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार १४ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना,टप्पा प्रसिद्ध करणे, हरकती,सूचना व सुनावणी इ.सोपस्कार याच महिन्यात २८ जुलै रोजी पार पडणार आहे. अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक शाखेकडे सादर करणे, निर्वाचक गण अंतिम अधिसूचना १८ ऑगस्ट रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या…
दिपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” हलाखीचे जीवन जगणारा आमचा अन्नदाता व निर्लज्ज सरकार, देशाच्या विकासामध्ये शेतकरी व कामगार या दोन वर्गचे फार मोठे योगदान असल्याचे आपण सतत ऐकत असतो.या दोन वर्गापैकी एकाने आपली भूक मिटवली तर दुसऱ्या वर्गाने आपल्या कष्टाने रोजगार निर्मिती केली.त्यामुळे आपला देश कृषीप्रधान व उद्योगशील देश म्हणून ओळखला जाऊ लागला.पण आज हे दोन्ही वर्ग राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे हलाखीचे जीवन जगत आहेत.आज त्यांना कोणीच वाली उरलेले नाही. दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात एक शेतकरी त्याच्याकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या मानेवर हौद ठेवून नांगरणी करत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व सरकार खडबडून जागे झाले.अभिनेते सोनू सुद यांनी त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर…
जव्हार प्रतिनिधी, प्रयास फाउंडेशन ट्रस्टतर्फे मोहाचापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, जव्हारमधील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून प्रयास फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळा,मोहाचा पाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत शाळेच्या १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पाटी,पेन्सिल,शार्पनर,कंपास बॉक्स,खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष रजपूत,सहशिक्षक राजेंद्र महाजन,गोविंद वळवी,रावते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी ” प्रयास फाउंडेशन ट्रस्ट,” च्या या सामाजिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले व आभार मानले.शाळेच्या…
सचिन पाटील,विरार विवा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती स्पर्धांचे आयोजन, विवा महाविद्यालय मिरा – भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्तालय आणि बोळींज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ‘तसेच ‘ नशा मुक्ती भारत ‘ या उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अँटी ड्रग स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे,सहा.पोलीस निरीक्षक जयचंद्र ठाकूर,सहा.पोलीस उपनिरीक्षक दीपक निकम, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे इ.मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी ” जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ” म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत संकल्पनेवर…
वसंत भोईर,वाडा वाड्यात भातलावणीला सुरुवात, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्हातील सर्वच तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.मात्र एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे वाडा तालुक्यात मजुरांची कमतरता भासू लागली आहे.त्यामुळे विक्रमगड, तलासरी,जव्हार,मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजुर आणावे लागत आहेत.ततसेच मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत.एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रू.सकाळी न्याहरी, दुपारी जेवण द्यावे लागते.यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खचिॅक व्यवसाय होऊ लागला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चिक शेती परवडत नाही. तालुक्यात १७६ गावे २०० हून अधिक पाडे असून १५ हजार हेक्टर क्षेत्र भातपीका खाली आहे.येथील शेती पावसावर अवलंबून आहे.येथे झिनी (वाडा कोलम),सुरती,सुवर्णा,जोरदार,वाय.एस.आर,मसुरी,एककाडी,गुजरात ११,गुजरात…
वसंत भोईर,वाडा रायकर पाडा येथील विद्यार्थी तराफ्यातून प्रवास करत गाठतात शाळा, तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रायकर पाडा हे वीस घरांचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तराफ्याच्या सहाय्याने वैतरणा नदीतून प्रवास करून सोनाळे गावातील शाळा गाठावी लागते.वारा,पाऊस व नदीच्या पाण्यात ओले कपडे वह्या, पुस्तकांची पार अवस्था होत असते.अशा परिस्थितीत डोक्यावर भितीची टांगती तलवार असतानाही हे विद्यार्थी जिद्दीने प्रवास करत शाळा गाठत असतात. गायकर पाडा या गावातील १५ विद्यार्थी सोनाला हायस्कूल,२ विद्यार्थी जि.प.शाळा कापरी,एक विद्यार्थी वाडा कॉलेज अशा एकूण १८ विद्यर्थ्यांना दररोज रोज शिक्षणासाठी हा प्रवास करावा लागततो.मात्र त्यासाठी पावसाळ्यात रुद्रावतार धारण करत असते.नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असा धोकादायक…
दिपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, बहुजन विकास आघाडीच्या ७० % नगरसेवकांना या निवडणुकीत धोका होऊ शकतो… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या कामाला वेग आला असून प्रभाग रचनेची कामे लवकरात लवकर हातावेगळी करण्यात येणार आहेत.ती पूर्ण झाली की राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ११५ जागांवर लढती झाल्या होत्या.आता होणाऱ्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यामध्ये आणखी काही जागा वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक तिसरी सार्वत्रिक निवडणूक ही २०२० मध्ये व्हायला हवी होती.पण कोरोना,त्यानंतर आरक्षण व प्रभागरचनेच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात गेलेले प्रकरण,त्यामुळे या निवडणूका…
दीपक मोहिते, भयावह वास्तव, आजही ग्रामीण भाग अंधारात चाचपडतोय… आपल्या देशाची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू झाली असून लवकरच आपली अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन होईल,असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात पावलोपावली सांगत सुटले आहेत.पण त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे,हे ग्रामीण भागातील स्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते.चालायला धड रस्ते नाही,प्यायला पाणी नाही,आरोग्य व वैद्यकीय सोयी- सुविधांचा अभाव,शिक्षणाचा झालेला बट्याबोळ व कृषी क्षेत्रावर सतत आदळणारी संकटे,विकासकामांच्या नावाखाली भूमीपुत्रांच्या जमिनी लुबाडणे,असे एक ना अनेक गैरप्रकार आपल्या पाचवीला पुजले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेले दावे किती पोकळ आहेत,हे दिसून आले आहे. मुंबई शहरापासून अवघ्या साठ की.मी.अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना…
